ETV Bharat / city

Maharashtra Weather Update : मुंबईसह विदर्भात थंडीचा जोर वाढला

author img

By

Published : Jan 26, 2022, 11:54 AM IST

Updated : Jan 26, 2022, 3:05 PM IST

गेल्या दोन दिवसांत पारा घसरल्याने मुंबईच्या थंडीत वाढ झाली ( Mumbai Cold Wave Increased ) आहे. तसेच, नागपूर आणि विदर्भातही पार घसरला ( Vidarbha Cold Wave Increased ) आहे. येत्या चार दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

मुंबई/नागपूर - मुंबईतील तापमानात अचानक घट झाल्याने थंडी वाढली ( Mumbai Cold Wave Increased ) आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पारा ७ अंशांनी घसरला असून त्यामुळे थंडी अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आज मुंबईतील कुलाबा परिसरात १५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर सांताक्रूझमध्ये १३.४ अंशांच्या जवळपास होते.

हवामान तज्ञ माहिती देताना

मुंबईत साधारणपणे पार इतका खाली घसरत नाही. मात्र, थंडीत अचानक वाढ झाल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गोरेगाव परिसरात थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेताना दिसत होते. तर मुंबईच्या रस्त्यावरही उबदार कपडे घातलेल्या लोकांची संख्या मोठी होती. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, मुंबईतील थंडीत अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे निरभ्र आकाश आणि उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी. या बर्फवृष्टीमुळे थंड वारे मुंबईच्या दिशेने येत असल्याने गारवा वाढला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत पारा फारसा घसरण्याची शक्यता नाही. एक दोन दिवसांत तापमानात केवळ 0.2 अंश सेल्सिअसची घट अपेक्षित आहे. त्यानंतर मुंबईतील हवामान पुर्वपदावर येईल.

नागपूरासह विदर्भात थंडीचा जोर वाढला

गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरसह विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला होता. ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा प्रभाव कमी होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील आकाश स्वच्छ झाले असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला ( Vidarbha Cold Wave Increased ) आहे. तर पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भात थंडीची लाट येणार असून, तापमान दोन ते तीन अंशाने खाली येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Video : ITBP जवानांची उणे तापमानात परेड; सीमेवर साजरा केला प्रजासत्ताक दिन

मुंबई/नागपूर - मुंबईतील तापमानात अचानक घट झाल्याने थंडी वाढली ( Mumbai Cold Wave Increased ) आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत पारा ७ अंशांनी घसरला असून त्यामुळे थंडी अधिक जाणवत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आज मुंबईतील कुलाबा परिसरात १५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर सांताक्रूझमध्ये १३.४ अंशांच्या जवळपास होते.

हवामान तज्ञ माहिती देताना

मुंबईत साधारणपणे पार इतका खाली घसरत नाही. मात्र, थंडीत अचानक वाढ झाल्याने लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. गोरेगाव परिसरात थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेताना दिसत होते. तर मुंबईच्या रस्त्यावरही उबदार कपडे घातलेल्या लोकांची संख्या मोठी होती. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, मुंबईतील थंडीत अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे निरभ्र आकाश आणि उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी. या बर्फवृष्टीमुळे थंड वारे मुंबईच्या दिशेने येत असल्याने गारवा वाढला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत पारा फारसा घसरण्याची शक्यता नाही. एक दोन दिवसांत तापमानात केवळ 0.2 अंश सेल्सिअसची घट अपेक्षित आहे. त्यानंतर मुंबईतील हवामान पुर्वपदावर येईल.

नागपूरासह विदर्भात थंडीचा जोर वाढला

गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूरसह विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला होता. ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा प्रभाव कमी होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील आकाश स्वच्छ झाले असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला ( Vidarbha Cold Wave Increased ) आहे. तर पुढील तीन ते चार दिवसांत विदर्भात थंडीची लाट येणार असून, तापमान दोन ते तीन अंशाने खाली येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Video : ITBP जवानांची उणे तापमानात परेड; सीमेवर साजरा केला प्रजासत्ताक दिन

Last Updated : Jan 26, 2022, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.