ETV Bharat / city

मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो

author img

By

Published : Jul 25, 2019, 6:31 PM IST

तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

तानसा तलाव

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलावानंतर ‘तानसा’ तलाव आज दुपारी 'ओव्हरफ्लो' झाला. गेल्या काही दिवसात तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तलावांच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने मुंबईकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. सातही तलावात सध्या ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून मुंबईला २३२ दिवस पुरेल इतका आहे.

तानसा तलाव

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा, अशा ७ तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावात मिळून ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला पुढील २३२ दिवस पुरेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव १२ जुलैला तर तानसा तलाव आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. सध्या सुरु असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरुन वाहू लागतील, असा अंदाज जलविभागाकडून व्यक्त केला जातो आहे.

  • पाण्याचा साठा
  1. अप्पर वैतरणा - ३३६०५ दशलक्ष लिटर
  2. मोडक सागर - १०८३३३ दशलक्ष लिटर
  3. तानसा - १३७४६५ दशलक्ष लिटर
  4. मध्य वैतरणा - १४४५६२ दशलक्ष लिटर
  5. भातसा - ३८६६२४ दशलक्ष लिटर
  6. विहार - १८७५९ दशलक्ष लिटर
  7. तुळशी - ८०४६ दशलक्ष लिटर

एकूण - ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलावानंतर ‘तानसा’ तलाव आज दुपारी 'ओव्हरफ्लो' झाला. गेल्या काही दिवसात तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तलावांच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने मुंबईकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. सातही तलावात सध्या ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून मुंबईला २३२ दिवस पुरेल इतका आहे.

तानसा तलाव

मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा, अशा ७ तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावात मिळून ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला पुढील २३२ दिवस पुरेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव १२ जुलैला तर तानसा तलाव आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. सध्या सुरु असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरुन वाहू लागतील, असा अंदाज जलविभागाकडून व्यक्त केला जातो आहे.

  • पाण्याचा साठा
  1. अप्पर वैतरणा - ३३६०५ दशलक्ष लिटर
  2. मोडक सागर - १०८३३३ दशलक्ष लिटर
  3. तानसा - १३७४६५ दशलक्ष लिटर
  4. मध्य वैतरणा - १४४५६२ दशलक्ष लिटर
  5. भातसा - ३८६६२४ दशलक्ष लिटर
  6. विहार - १८७५९ दशलक्ष लिटर
  7. तुळशी - ८०४६ दशलक्ष लिटर

एकूण - ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर

Intro:फ्लॅश / ब्रेक
- *मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा तलाव ओव्हरफ्लो*
- काही दिवसांपूर्वीच तुळशी तलाव भरून वाहू लागला होता
- तुळशी नंतर तानसा तलाव भरून वाहू लागला
- तानसामधून मुंबईकरांना दिवसाला 450 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातोBody:फ्लॅशConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.