ETV Bharat / city

सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी आता केजीबी किंवा मोसादसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सींद्वारे करावी, राऊत यांचा टोला

सुशांतचा खून झाला नसून त्याने आत्महत्या केली होती, असा निष्कर्ष एम्सच्या अहवालात करण्यात आला आहे. आता सीबीआय चौकशीसह एम्सच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता केजीबी किंवा मोसादसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून करावा, असा टोला संजय राऊत यांनी मारला.

author img

By

Published : Oct 5, 2020, 7:30 PM IST

ssr-case-now-doubts-over-cbi-probe-and-aiims-report-too-says-sanjay-raut
सुशांतसिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र होते- संजय राऊत

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी दिली. तसेच आता सीबीआय चौकशी आणि एम्सच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे आर्श्चय वाटते, असेही ते म्हणाले.

सुशांतचा खून झाला नसून त्याने आत्महत्या केली होती, असा निष्कर्ष डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने केलेल्या तपासणी अहवालात करण्यात आला आहे. आता सीबीआय चौकशीवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे, तसेच एम्सच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता केजीबी किंवा मोसादसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून किंवा हेग मधल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे करावी, असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीदेखील एम्सच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले होते. "मी एम्सचा अहवाल बघून अत्यंत हैराण आहे. नव्याने फॉरेन्सिक टीम गठीत करण्याची विनंती सीबीआय संचालकांना केली आहे. मृतदेहाच्या अनुपस्थितीत एम्सची टीम निर्णायक अहवाल कसा देऊ शकते, तसेच कूपर रुग्णालयाने केलेल्या पोस्टमॉर्टमवर मृत्यूच्या वेळेचा उल्लेख का नाही" असे प्रश्न सिंह यांनी ट्विट करत विचारले होते.

सुशांत 14 जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती आणि तसेच बॉलिवूडमधील अमली पदार्थांच्या जाळ्याची चौकशी सुरू केली होती, ज्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमवारी दिली. तसेच आता सीबीआय चौकशी आणि एम्सच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे आर्श्चय वाटते, असेही ते म्हणाले.

सुशांतचा खून झाला नसून त्याने आत्महत्या केली होती, असा निष्कर्ष डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने केलेल्या तपासणी अहवालात करण्यात आला आहे. आता सीबीआय चौकशीवरदेखील संशय व्यक्त केला जात आहे, तसेच एम्सच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता केजीबी किंवा मोसादसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून किंवा हेग मधल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे करावी, असा टोलादेखील संजय राऊत यांनी लगावला.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीदेखील एम्सच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले होते. "मी एम्सचा अहवाल बघून अत्यंत हैराण आहे. नव्याने फॉरेन्सिक टीम गठीत करण्याची विनंती सीबीआय संचालकांना केली आहे. मृतदेहाच्या अनुपस्थितीत एम्सची टीम निर्णायक अहवाल कसा देऊ शकते, तसेच कूपर रुग्णालयाने केलेल्या पोस्टमॉर्टमवर मृत्यूच्या वेळेचा उल्लेख का नाही" असे प्रश्न सिंह यांनी ट्विट करत विचारले होते.

सुशांत 14 जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती आणि तसेच बॉलिवूडमधील अमली पदार्थांच्या जाळ्याची चौकशी सुरू केली होती, ज्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 20 जणांना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.