ETV Bharat / city

'हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला'; शिवसेनेचा केंद्राला टोला

author img

By

Published : Jul 9, 2021, 8:07 AM IST

Updated : Jul 9, 2021, 8:36 AM IST

हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते. ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.' असे म्हणत शिवसेनेने अटलबिहारी सरकारमध्येही मंत्री राहिलेल्या प्रसाद यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

अतिक्रमणाचा जमाना अवतरला
अतिक्रमणाचा जमाना अवतरला

मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनाही मोदी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, तर डॉ. हर्षवर्धन यांचाही आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यासोबतच स्मृती इराणी यांच्याकडील वस्त्रोद्याग, पीयूष गोयल यांच्याकडूनही रेल्वे खाते काढून घेण्यात आले आहे. यावर शिवसेनेने चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या अशी खरमरीत टिप्पणी केली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केंद्राने सहकार मंत्रालय हे नवीन खाते निर्माण केले आहे. त्यावर शिवसेनेने हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत असल्याचे सांगत, हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे, असा केंद्राला टोला लगावला आहे.

शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला आहे. मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडकेच आहेत. भारतीय जनता पक्षाचा किंवा 'एनडीए'चा गाभा मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोठेच दिसत नाही, पण सरकार चालविण्याची क्षमता असलेल्या लोकांची निवड पंतप्रधानांनी पारखूनच केली असणार, असा टोला 'नवे मंत्रिमंडळ: काय करणार?' या शिर्षकांच्या अग्रलेखातून लगावला आहे.

मेणबत्त्या पेटवून, थाळ्या वाजवून कोरोना पळवा, हे निर्णय कोणी घेतले होते?

'मंत्रिमंडळ विस्तारास 'मेगा सर्जरी'ची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळय़ात आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे तो तसा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी गुजरातचे मनसुख मांडवीय यांची नेमणूक केली. हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते. ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.' असे म्हणत शिवसेनेने अटलबिहारी सरकारमध्येही मंत्री राहिलेल्या प्रसाद यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

'चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या'

'आधीच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांना इतके महत्त्वाचे खाते जेव्हा दिले तेव्हाच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने आवंढा गिळला होता. जे खाते पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या तज्ञांनी सांभाळले होते, ते पोखरीयाल यांना देताना भान ठेवायला हवे होते. रमेश पोखरीयाल यांना 'बिग्री'च्या शिक्षण व्यवस्थेचेही ज्ञान नसताना मनुष्यबळ विकास मंत्रालयात बसवले हीच राजकीय चूक होती. आता तेथे धर्मेंद्र प्रधान यांना आणले व त्यांचे पेट्रोलियम खाते हरदीप पुरी यांना दिले. प्रधान यांच्याच काळात पेट्रोल-डिझेलच्या अनिर्बंध दरवाढीने लोकांना घाम फोडला. पेट्रोल तर शंभरी पार करून पुढे गेले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरूनही देशात पेट्रोलचे भाव उतरले नाहीत. आता प्रधान शिक्षणात तर पुरी हे पेट्रोल खात्यात काय दिवे लावतात ते पाहायचे. पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांना दिले. श्री. गोयल यांना हा धक्काच आहे. चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या. त्या किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार आहे.' अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

'राणे धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत'

'स्मृती इराणी यांचे महत्त्व कमी केले असे दिसते. आधी मनुष्यबळ विकास, नंतर वस्त्र्ााsद्योग व आता महिला व बालकल्याण असे त्यांच्याबाबतीत झाले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना हवाई वाहतूक खाते मिळाले आहे. त्या खात्यात ते किती व कशा भराऱया मारतात ते पाहायचे. महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.' राणे यांच्या निवडीवर असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.

'पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव'

'भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे.' असेही शिवसेनेने म्हटले आहे.

'अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला'

'केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्ताराआधी केंद्र सरकारने एक 'सहकार खाते' निर्माण केले. 'सहकार' हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण आता 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरू नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळे करणार काय? केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देऊन मागील पानावरून पुढे जाणे इतकेच आपल्या हाती आहे.' असे म्हणत शिवसेनेने नवीन मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनाही मोदी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, तर डॉ. हर्षवर्धन यांचाही आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यासोबतच स्मृती इराणी यांच्याकडील वस्त्रोद्याग, पीयूष गोयल यांच्याकडूनही रेल्वे खाते काढून घेण्यात आले आहे. यावर शिवसेनेने चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या अशी खरमरीत टिप्पणी केली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केंद्राने सहकार मंत्रालय हे नवीन खाते निर्माण केले आहे. त्यावर शिवसेनेने हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत असल्याचे सांगत, हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे, असा केंद्राला टोला लगावला आहे.

शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला आहे. मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडकेच आहेत. भारतीय जनता पक्षाचा किंवा 'एनडीए'चा गाभा मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोठेच दिसत नाही, पण सरकार चालविण्याची क्षमता असलेल्या लोकांची निवड पंतप्रधानांनी पारखूनच केली असणार, असा टोला 'नवे मंत्रिमंडळ: काय करणार?' या शिर्षकांच्या अग्रलेखातून लगावला आहे.

मेणबत्त्या पेटवून, थाळ्या वाजवून कोरोना पळवा, हे निर्णय कोणी घेतले होते?

'मंत्रिमंडळ विस्तारास 'मेगा सर्जरी'ची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळय़ात आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे तो तसा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी गुजरातचे मनसुख मांडवीय यांची नेमणूक केली. हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते. ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.' असे म्हणत शिवसेनेने अटलबिहारी सरकारमध्येही मंत्री राहिलेल्या प्रसाद यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

'चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या'

'आधीच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांना इतके महत्त्वाचे खाते जेव्हा दिले तेव्हाच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने आवंढा गिळला होता. जे खाते पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या तज्ञांनी सांभाळले होते, ते पोखरीयाल यांना देताना भान ठेवायला हवे होते. रमेश पोखरीयाल यांना 'बिग्री'च्या शिक्षण व्यवस्थेचेही ज्ञान नसताना मनुष्यबळ विकास मंत्रालयात बसवले हीच राजकीय चूक होती. आता तेथे धर्मेंद्र प्रधान यांना आणले व त्यांचे पेट्रोलियम खाते हरदीप पुरी यांना दिले. प्रधान यांच्याच काळात पेट्रोल-डिझेलच्या अनिर्बंध दरवाढीने लोकांना घाम फोडला. पेट्रोल तर शंभरी पार करून पुढे गेले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरूनही देशात पेट्रोलचे भाव उतरले नाहीत. आता प्रधान शिक्षणात तर पुरी हे पेट्रोल खात्यात काय दिवे लावतात ते पाहायचे. पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांना दिले. श्री. गोयल यांना हा धक्काच आहे. चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या. त्या किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार आहे.' अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

'राणे धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत'

'स्मृती इराणी यांचे महत्त्व कमी केले असे दिसते. आधी मनुष्यबळ विकास, नंतर वस्त्र्ााsद्योग व आता महिला व बालकल्याण असे त्यांच्याबाबतीत झाले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना हवाई वाहतूक खाते मिळाले आहे. त्या खात्यात ते किती व कशा भराऱया मारतात ते पाहायचे. महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.' राणे यांच्या निवडीवर असा खोचक टोला शिवसेनेने लगावला आहे.

'पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव'

'भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे.' असेही शिवसेनेने म्हटले आहे.

'अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला'

'केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्ताराआधी केंद्र सरकारने एक 'सहकार खाते' निर्माण केले. 'सहकार' हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण आता 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरू नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळे करणार काय? केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देऊन मागील पानावरून पुढे जाणे इतकेच आपल्या हाती आहे.' असे म्हणत शिवसेनेने नवीन मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

Last Updated : Jul 9, 2021, 8:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.