ETV Bharat / city

Sanjay Raut : संजय राऊत यांना आजही दिलासा नाहीच..जामीन अर्जावर 'या' दिवशी होणार सुनावणी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली ( Hearing on Sanjay Raut bail application adjourned ) आहे. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी ( Hearing on Sanjay Raut bail application on 27th ) होणार आहे.

author img

By

Published : Sep 21, 2022, 12:46 PM IST

Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली ( Hearing on Sanjay Raut bail application adjourned ) आहे. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी ( Hearing on Sanjay Raut bail application on 27th ) होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राऊत यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला - पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत ( Sanjay Raut judicial custody extended ) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 ऑक्टोबरपर्यंत Sanjay Raut judicial custody extended till 4 Octoberवाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी आज संपल्यानंतर त्यांना आज हजर करण्यात आले होते. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम 4 ऑक्टोंबर पर्यंत वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात आर्थिक गैरववार प्रकरणे ईडी कडून अटक करण्यात आले होते आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असल्याने त्यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना न्यायधीस एम जी देशपांडे यांनी 4 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा न्यायालय कोठडी वाढवून दिली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यास आली होती आज कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी- संजय राऊत यांच्या आज सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांचे समर्थनात मुंबई सत्र न्यायालयात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेने गर्दी केली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मोठा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. संजय राऊत यांची गाडी सत्र न्यायालयाच्या गेटवर आली असता शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीदेखील करण्यात आली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना आज न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्र सत्र न्यायालयमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली आहे.

पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.

पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल, तसंच म्हाडासाठी घरं बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारलं नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.

खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली -जीएपीसीएलकडून भाडं भरलं जात नसल्याची तसंच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं भाडं भरेल, असं करारात नमूद करण्यात आलं होतं, पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडं भरलं. याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडं न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचं कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली, पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यामुळे प्रोजेक्ट ठप्प झालं.

सदस्यीय कमिटी स्थापन 2020 साली महाराष्ट्र सरकारने निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी स्थापन केली. ही कमिटी पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं पुनर्वसन कसं करायचं आणि घराची भाडी कशी द्यायची, याबाबत सल्ला देणार होती. जून 2021 साली राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आणि जुलै 2021 साली सरकारने याबाबतचा ठराव मांडला. फेब्रुवारी 2022 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पत्रा चाळीचं ठप्प पडलेलं बांधकाम पुन्हा एकदा सुरू झालं.

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली ( Hearing on Sanjay Raut bail application adjourned ) आहे. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी ( Hearing on Sanjay Raut bail application on 27th ) होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राऊत यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला - पत्राचाळ प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनवणी पूर्ण होणार असून त्यानंतर संजय राऊत ( Sanjay Raut judicial custody extended ) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 ऑक्टोबरपर्यंत Sanjay Raut judicial custody extended till 4 Octoberवाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी आज संपल्यानंतर त्यांना आज हजर करण्यात आले होते. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम 4 ऑक्टोंबर पर्यंत वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात आर्थिक गैरववार प्रकरणे ईडी कडून अटक करण्यात आले होते आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपली असल्याने त्यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना न्यायधीस एम जी देशपांडे यांनी 4 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा न्यायालय कोठडी वाढवून दिली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यास आली होती आज कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी- संजय राऊत यांच्या आज सुनावणी होणार असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांचे समर्थनात मुंबई सत्र न्यायालयात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेने गर्दी केली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मोठा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. संजय राऊत यांची गाडी सत्र न्यायालयाच्या गेटवर आली असता शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीदेखील करण्यात आली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना आज न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेचे नेते राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्र सत्र न्यायालयमध्ये संजय राऊत यांची भेट घेतली आहे.

पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.

पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल, तसंच म्हाडासाठी घरं बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारलं नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.

खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली -जीएपीसीएलकडून भाडं भरलं जात नसल्याची तसंच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं भाडं भरेल, असं करारात नमूद करण्यात आलं होतं, पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडं भरलं. याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडं न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचं कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली, पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यामुळे प्रोजेक्ट ठप्प झालं.

सदस्यीय कमिटी स्थापन 2020 साली महाराष्ट्र सरकारने निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी स्थापन केली. ही कमिटी पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं पुनर्वसन कसं करायचं आणि घराची भाडी कशी द्यायची, याबाबत सल्ला देणार होती. जून 2021 साली राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आणि जुलै 2021 साली सरकारने याबाबतचा ठराव मांडला. फेब्रुवारी 2022 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पत्रा चाळीचं ठप्प पडलेलं बांधकाम पुन्हा एकदा सुरू झालं.

For All Latest Updates

TAGGED:

Sanjay Raut
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.