ETV Bharat / city

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर शिक्षण विभागाची धावपळ; दहावीच्या निकालासंदर्भात महाधिवक्त्यांसोबत बैठक

author img

By

Published : May 24, 2021, 7:56 PM IST

Updated : May 24, 2021, 8:08 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आज राज्याच्या शिक्षण सचिवांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली.

दहावीच्या निकालासंदर्भात शिक्षण विभागाची महाधिवक्त्यांसोबत बौठक
दहावीच्या निकालासंदर्भात शिक्षण विभागाची महाधिवक्त्यांसोबत बौठक

मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आज राज्याच्या शिक्षण सचिवांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणी वेळी दहावीची परीक्षा घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार असा सवाल देखील उपस्थित केला होता. दरम्यान राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असून, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे ? आणि न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाकडून कसे उत्तर द्यायचे याबाबत राज्याच्या शिक्षण सचिवांनी आज महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली असून, आता पुढे काय होणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येत आहे.

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम ?

काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सागितले की, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मूल्यमापन हा त्यातील एक मार्ग आहे. आम्ही न्यायालयासमोर आमचे म्हणणे मांडू, दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून, तो न्यायालयासमोर मांडणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीमध्ये न्यायालय देखील सहानभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभाग लागला कामाला

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी निकालाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. 'तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का ? असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावल्यानंतर, आता राज्य सरकराच्या दहावी मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच दहावीची परीक्षा घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे आज शिक्षण सचिवांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळासोबत काल झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना परिस्थिती आणि मुलांची मानसिक तयारी याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी करत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते, असे सूचित करण्यात आले. इतकेच नव्हे तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच शिक्षण सचिवांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली आहे. आता वर्षा गायकवाड या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत दहावीच्या निकालाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - प्रेमी युगलाला एकांतात पकडलं, बेदम मारहाण केली अन् लग्न लावून दिलं

मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आज राज्याच्या शिक्षण सचिवांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणी वेळी दहावीची परीक्षा घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार असा सवाल देखील उपस्थित केला होता. दरम्यान राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असून, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे ? आणि न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाकडून कसे उत्तर द्यायचे याबाबत राज्याच्या शिक्षण सचिवांनी आज महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली असून, आता पुढे काय होणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसून येत आहे.

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम ?

काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सागितले की, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. अंतर्गत मूल्यमापन हा त्यातील एक मार्ग आहे. आम्ही न्यायालयासमोर आमचे म्हणणे मांडू, दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. याबाबत राज्य सरकार लवकरच शासन निर्णय जाहीर करून, तो न्यायालयासमोर मांडणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीमध्ये न्यायालय देखील सहानभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभाग लागला कामाला

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी निकालाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. 'तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का ? असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावल्यानंतर, आता राज्य सरकराच्या दहावी मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच दहावीची परीक्षा घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे आज शिक्षण सचिवांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळासोबत काल झालेल्या बैठकीत, राज्यातील कोरोना परिस्थिती आणि मुलांची मानसिक तयारी याबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी करत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे धोकादायक ठरू शकते, असे सूचित करण्यात आले. इतकेच नव्हे तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. तसेच शिक्षण सचिवांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली आहे. आता वर्षा गायकवाड या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत दहावीच्या निकालाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - प्रेमी युगलाला एकांतात पकडलं, बेदम मारहाण केली अन् लग्न लावून दिलं

Last Updated : May 24, 2021, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.