ETV Bharat / city

RS Election 2022 : महाविकास आघाडीची 3 मतं बाद करण्याची भाजपची मागणी पीठासन अधिकाऱ्यांनी फेटाळली

author img

By

Published : Jun 10, 2022, 1:46 PM IST

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असताना भाजपने महाविकास आघाडीची तीन मते बाद करण्याची मागणी केली ( Exclude 3 votes of Mahavikas Aghadi ) आहे. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी दिली ( presiding officer rejected bjps demand ) आहे.

Exclude 3 votes of Mahavikas Aghadi: BJP's demand
महाविकास आघाडीची 3 मतं बाद करा : भाजपची मागणी

मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार अनिल बोंडे यांचे पोलिंग एजंट अतुल सावे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीची तीन मतं बाद करण्याची मागणी त्यांनी केली ( Exclude 3 votes of Mahavikas Aghadi ) आहे. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची ( presiding officer rejected bjps demand ) माहिती मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या आमदार व मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपलं मत देताना तो पेपर त्यांच्या अधिकृत पोलिंग एजंटच्या हातात दिला असा आक्षेप आमदार पराग अळवणी यांनी घेतला आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही त्याच पद्धतीने मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असा आक्षेप आमदार अतुल सावे यांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा मतदान करण्यापूर्वी ती मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असेही त्यांनी म्हटले आहे. यावरून आता या प्रकरणाची चौकशी करून त्यांची मतं बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे.


काय आहे नियम? : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण ज्या कुणाला मत देत आहोत तो मतदानाचा बॅलेट पेपर फक्त पोलिंग एजंटला दाखवायचा असतो. तेसुद्धा ठराविक अंतरावरून. परंतु यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड व सुहास कांदे या आमदारांनी पेपर लांबून न दाखवता पोलिंग एजंटच्या हातात दिला. त्या कारणास्तव भाजपने आक्षेप घेतलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारीही भाजपने ठेवलेली आहे. म्हणूनच आता हा नवीन वाद निर्माण झालेला आहे.

हेही वाचा : RS Election 2022 : महाविकास आघाडीला 'बूस्टर डोस'.. एमआयएमचा पाठिंबा.. भाजपचा 'खेळ' बिघडणार

मुंबई - राज्यसभेच्या ६ जागांसाठी होत असलेली निवडणूक अटीतटीच्या अंतिम टप्प्यावर आलेली असताना आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचे पोलिंग एजंट आमदार पराग अळवणी, त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार अनिल बोंडे यांचे पोलिंग एजंट अतुल सावे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या मतांवर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीची तीन मतं बाद करण्याची मागणी त्यांनी केली ( Exclude 3 votes of Mahavikas Aghadi ) आहे. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याची ( presiding officer rejected bjps demand ) माहिती मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी दिली आहे.

काँग्रेसच्या आमदार व मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपलं मत देताना तो पेपर त्यांच्या अधिकृत पोलिंग एजंटच्या हातात दिला असा आक्षेप आमदार पराग अळवणी यांनी घेतला आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनीही त्याच पद्धतीने मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असा आक्षेप आमदार अतुल सावे यांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा मतदान करण्यापूर्वी ती मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली असेही त्यांनी म्हटले आहे. यावरून आता या प्रकरणाची चौकशी करून त्यांची मतं बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे.


काय आहे नियम? : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण ज्या कुणाला मत देत आहोत तो मतदानाचा बॅलेट पेपर फक्त पोलिंग एजंटला दाखवायचा असतो. तेसुद्धा ठराविक अंतरावरून. परंतु यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड व सुहास कांदे या आमदारांनी पेपर लांबून न दाखवता पोलिंग एजंटच्या हातात दिला. त्या कारणास्तव भाजपने आक्षेप घेतलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारीही भाजपने ठेवलेली आहे. म्हणूनच आता हा नवीन वाद निर्माण झालेला आहे.

हेही वाचा : RS Election 2022 : महाविकास आघाडीला 'बूस्टर डोस'.. एमआयएमचा पाठिंबा.. भाजपचा 'खेळ' बिघडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.