ETV Bharat / city

Restrictions more Relaxed : राज्यातील चौदा जिल्ह्याच्या निर्बंधात आणखी शिथिलता, 'ही' ठिकाणे पूर्णतः खुली

author img

By

Published : Mar 2, 2022, 6:57 PM IST

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने ( Third Wave of Corona ) राज्य सरकारने निर्बंध अधिक शिथिल केले ( Restrictions more Relaxed ) आहेत. मंगळवारी (दि. 2 मार्च) नवी नियमावली जाहीर केली. त्यात 14 जिल्ह्यातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा मैदान, धार्मिक स्थळे पूर्णतः खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 25 टक्के क्षमतेच्या किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिल्याचे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने ( Third Wave of Corona ) राज्य सरकारने निर्बंध अधिक शिथिल केले ( Restrictions more Relaxed ) आहेत. मंगळवारी (दि. 2 मार्च) नवी नियमावली जाहीर केली. त्यात 14 जिल्ह्यातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 25 टक्के क्षमतेच्या किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिल्याचे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने नोव्हेंबरच्या अखेरीस डोकेवर काढले. दिवसागणिक झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली. ओमायक्रॉन व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. राज्य सरकारने खबरदारी घेत, नववर्षांच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू केली. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः बंद ठेवण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी संमेलन, लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थितीस बंदी घातली. लोकल प्रवासाकरिता दोन डोस अनिवार्य केले होते.

आता कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काही दिवसांपासून राज्यभरातील रुग्ण संख्येत मोठी घसरण झाली आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यात लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. तसेच पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आयसीयूमधील ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश अ श्रेणीत करून त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे राज्य शासनाने अधिसूचनेत नमूद केले आहे. त्यानुसार आज 14 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत.

या 14 जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रम संबंधित हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे. लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचाही यात समावेश आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशूगटांचे वर्गही सुरू करण्यास संमती दिली आहे. होम डिलिव्हरी सेवाही सुरू करण्यात परवानगी दिल्याचे यात नमूद आहे.

शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क आदी ठिकाणांनाही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ गटात नसलेल्या जिल्ह्यांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल. तर खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांनाही पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे, होम डिलीव्हरी करणारे, सार्वजनिक वाहतूक सेवेतील कर्मचारी, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, पर्यटन ठिकाणे, रेस्टॉरंट, क्रीडा मैदाने या ठिकाणी येणारे अशा सगळ्यांना पूर्ण लसीकरण अर्थात लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असतील. तसेच जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकृत झालेल्या व्यक्तीला परवानगी असेल. पूर्ण लसीकृत नसलेल्या व्यक्तीला निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल प्रवासासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • या चौदा जिल्ह्याती निर्बंध झाले शिथिल
  1. मुंबई शहर
  2. मुंबई उपनगर
  3. पुणे
  4. भंडारा
  5. सिंधुदुर्ग
  6. नागपूर
  7. रायगड
  8. वर्धा
  9. रत्नागिरी
  10. सातारा
  11. सांगली
  12. गोंदिया
  13. चंद्रपूर
  14. कोल्हापूर

हेही वाचा - IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या पर्वासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने ( Third Wave of Corona ) राज्य सरकारने निर्बंध अधिक शिथिल केले ( Restrictions more Relaxed ) आहेत. मंगळवारी (दि. 2 मार्च) नवी नियमावली जाहीर केली. त्यात 14 जिल्ह्यातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 25 टक्के क्षमतेच्या किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिल्याचे राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने नोव्हेंबरच्या अखेरीस डोकेवर काढले. दिवसागणिक झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली. ओमायक्रॉन व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. राज्य सरकारने खबरदारी घेत, नववर्षांच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच 10 जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू केली. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटनस्थळे, रेस्टॉरंट्स, क्रीडा स्पर्धा, धार्मिक स्थळे पूर्णतः बंद ठेवण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी संमेलन, लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थितीस बंदी घातली. लोकल प्रवासाकरिता दोन डोस अनिवार्य केले होते.

आता कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काही दिवसांपासून राज्यभरातील रुग्ण संख्येत मोठी घसरण झाली आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यात लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. तसेच पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आयसीयूमधील ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश अ श्रेणीत करून त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे राज्य शासनाने अधिसूचनेत नमूद केले आहे. त्यानुसार आज 14 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत.

या 14 जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा उत्सवाशी संबंधित कार्यक्रम संबंधित हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे. लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचाही यात समावेश आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशूगटांचे वर्गही सुरू करण्यास संमती दिली आहे. होम डिलिव्हरी सेवाही सुरू करण्यात परवानगी दिल्याचे यात नमूद आहे.

शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनाची ठिकाणे, मनोरंजन पार्क आदी ठिकाणांनाही 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ गटात नसलेल्या जिल्ह्यांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल. तर खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांनाही पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे, होम डिलीव्हरी करणारे, सार्वजनिक वाहतूक सेवेतील कर्मचारी, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, पर्यटन ठिकाणे, रेस्टॉरंट, क्रीडा मैदाने या ठिकाणी येणारे अशा सगळ्यांना पूर्ण लसीकरण अर्थात लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असतील. तसेच जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकृत झालेल्या व्यक्तीला परवानगी असेल. पूर्ण लसीकृत नसलेल्या व्यक्तीला निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल प्रवासासाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • या चौदा जिल्ह्याती निर्बंध झाले शिथिल
  1. मुंबई शहर
  2. मुंबई उपनगर
  3. पुणे
  4. भंडारा
  5. सिंधुदुर्ग
  6. नागपूर
  7. रायगड
  8. वर्धा
  9. रत्नागिरी
  10. सातारा
  11. सांगली
  12. गोंदिया
  13. चंद्रपूर
  14. कोल्हापूर

हेही वाचा - IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या पर्वासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.