मुंबई - अहिल्यादेवी होळकर Ahilyabai Holkar यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील Ahmednagar District जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' Philosopher Queen म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. त्याआधारे अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, ( १३ ऑगस्ट, १७९५ ) म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची १३ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी Ahilyadevi Holkar Punyatithi आहे.
वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले - धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी, 'खंडेरावांशी' झाले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव Khanderao कुंभेरी Kumbheri येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.
अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले - आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. 'बाई काय राज्य कारभार करणार?' ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता अशी झाली, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. त्यांनी राज्यकारभारात अनेक बदल घडवून आणले. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. तर इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
हेही वाचा : Indian Independence Day मुंबईमधील ही संग्रहालय आहेत पर्यटकांचे आकर्षण केंद्रे