ETV Bharat / city

Hanuman Chalisa Controversy : हनुमान चालीसावरून राज्यातील राजकारण ढवळले; पाहा, आज दिवसभरात काय घडलं?

author img

By

Published : Apr 16, 2022, 9:10 PM IST

राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Recitation) आणि अजान यावरून राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका घेत आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022 Celebration) मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात हनुमान चालीसा, अजान आणि लाऊडस्पीकरचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

file photo
फाईल फोटो

मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Recitation) आणि अजान यावरून राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका घेत आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022 Celebration) मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात हनुमान चालीसा, अजान आणि लाऊडस्पीकरचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यानंतर लगेचच आज हनुमान जयंती असल्यामुळे सर्वाच राजकीय पक्षांसाठी हा मुद्दा अग्रस्थानी होता. यावरून आज अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले.

मनसे अन् शिवसेनेत जुंपली - पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात मनसेकडून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. अजान अन् हनुमान चालीसाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलल्यामुळे आज त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, यावरून मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम बी आणि सी टीम करत आहे. हिंदुत्व ही श्रद्धेची गोष्ट आहे. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व करत नाही. 'रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये,' हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. मात्र, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी आणि सी टीमला जनतेने जास्त महत्त्व देऊ नये, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला आहे.

हेही वाचा - Hanuman Chalisa At Matoshree : मातोश्री आमचे श्रद्धास्थान, आव्हान द्याल तर जशास तसे उत्तर देऊ.. राणा दाम्पत्याला शिवसैनिकांचा इशारा

शिवसेना अन् राणा दाम्पत्यामध्ये रंगली - यात राणा दाम्पत्य यांनीदेखील उडी घेतली होती. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. तसेच त्यांनी हनुमान चालीसा पठण केली नाही तर, मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही राणा दाम्पत्यांनी दिला होता. यावरून शिवसेनेनेही राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. येथे येऊन कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. याला परत नवनीत राणा यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, इतकीच अपेक्षा मी त्यांच्याकडून केली आहे. माझ्या या मागणीवरून मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकत्र आले. मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही असेच मला शिवसैनिकांना सांगायचे आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Navneet Rana Criticized Shivsena : 'मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही', खासदार नवनीत राणांची शिवसेनेवर टीका

काँग्रेसचा मनसे, भाजपला टोला - मनसेकडून (MNS) होत असलेले हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa Recitation) म्हणजे भक्तीचे बाजारीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भोंगा वाजवायचा (Loudspeakers) असेल तर महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाबद्दल वाजवा, असा सल्ला पटोले यांनी भाजपला दिला.

राष्ट्रवादीची सावध भूमिका - भारतात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. प्रत्येकाच्या सणाचे, जयंतीचा आदर केलाच पाहिजे. ही लहानपणापासूनची आम्हाला शिकवण आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन आरती म्हणणे त्यात चुकीचे काहीच नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. तसेच यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. प्रत्येक धर्मात मानवतेची शिकवण दिली जाते. प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार प्रथा पाळतात. आज हनुमान जयंती ( Hanuman Jayanti 2022 ) आहे. आमच्या धर्मातील सर्व बाबी आम्ही पाळतो, श्रद्धा करतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या धर्माबाबत श्रद्धा ठेवण्याची मुभा आहे. आपण कोणत्याही धर्माच्या रुढी, परंपरा, श्रद्धा व आस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नाही. झालाच तर ते निव्वळ राजकारणासाठी केला जातो, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर टीका केली.

हेही वाचा - Aaditya Thackeray On MNS : राजकीय स्टेजवर दाखवायची श्रद्धा नसते, ती हृदयात असते; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Recitation) आणि अजान यावरून राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका घेत आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022 Celebration) मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात हनुमान चालीसा, अजान आणि लाऊडस्पीकरचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यानंतर लगेचच आज हनुमान जयंती असल्यामुळे सर्वाच राजकीय पक्षांसाठी हा मुद्दा अग्रस्थानी होता. यावरून आज अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले.

मनसे अन् शिवसेनेत जुंपली - पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात मनसेकडून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. अजान अन् हनुमान चालीसाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलल्यामुळे आज त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, यावरून मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम बी आणि सी टीम करत आहे. हिंदुत्व ही श्रद्धेची गोष्ट आहे. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व करत नाही. 'रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये,' हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. मात्र, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी आणि सी टीमला जनतेने जास्त महत्त्व देऊ नये, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला आहे.

हेही वाचा - Hanuman Chalisa At Matoshree : मातोश्री आमचे श्रद्धास्थान, आव्हान द्याल तर जशास तसे उत्तर देऊ.. राणा दाम्पत्याला शिवसैनिकांचा इशारा

शिवसेना अन् राणा दाम्पत्यामध्ये रंगली - यात राणा दाम्पत्य यांनीदेखील उडी घेतली होती. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. तसेच त्यांनी हनुमान चालीसा पठण केली नाही तर, मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही राणा दाम्पत्यांनी दिला होता. यावरून शिवसेनेनेही राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. येथे येऊन कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. याला परत नवनीत राणा यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, इतकीच अपेक्षा मी त्यांच्याकडून केली आहे. माझ्या या मागणीवरून मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकत्र आले. मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही असेच मला शिवसैनिकांना सांगायचे आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Navneet Rana Criticized Shivsena : 'मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही', खासदार नवनीत राणांची शिवसेनेवर टीका

काँग्रेसचा मनसे, भाजपला टोला - मनसेकडून (MNS) होत असलेले हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa Recitation) म्हणजे भक्तीचे बाजारीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भोंगा वाजवायचा (Loudspeakers) असेल तर महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नाबद्दल वाजवा, असा सल्ला पटोले यांनी भाजपला दिला.

राष्ट्रवादीची सावध भूमिका - भारतात वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. प्रत्येकाच्या सणाचे, जयंतीचा आदर केलाच पाहिजे. ही लहानपणापासूनची आम्हाला शिकवण आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन आरती म्हणणे त्यात चुकीचे काहीच नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. तसेच यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. प्रत्येक धर्मात मानवतेची शिकवण दिली जाते. प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार प्रथा पाळतात. आज हनुमान जयंती ( Hanuman Jayanti 2022 ) आहे. आमच्या धर्मातील सर्व बाबी आम्ही पाळतो, श्रद्धा करतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या धर्माबाबत श्रद्धा ठेवण्याची मुभा आहे. आपण कोणत्याही धर्माच्या रुढी, परंपरा, श्रद्धा व आस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नाही. झालाच तर ते निव्वळ राजकारणासाठी केला जातो, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर टीका केली.

हेही वाचा - Aaditya Thackeray On MNS : राजकीय स्टेजवर दाखवायची श्रद्धा नसते, ती हृदयात असते; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.