मुंबई - 100 कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते अखेर मुंबईत (Param Bir Singh landed in Mumbai)परतले आहेत. आज ते किला न्यायालयात ( Killa Court) दाखल होण्याची शक्यता आहे. आपल्याविरोधातील फरार आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
परमबीर सिंग यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी.भाजीपाले ( Additional Chief Metropolitan Magistrate SB Bhajipale ) यांच्यासमोर अधिवक्ता गुंजन मंगला यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. आपल्याविरोधातील फरार घोषित करणारा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांना अर्जात केली आहे.
100 कोटी वसूली प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केले ( Declared Absconding ) होते. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर आरोप लावल्यानंतर तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणानंतर ते दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील ( Extortion Case ) गोरेगाव येथील प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी कांदिवली गुन्हे शाखेच्या ( Kandivali Crime Branch ) कार्यालयात गेले. त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. चौकशीला परमबीर सिंग यांनी पूर्ण सहकार्य केले असल्याची प्रतिक्रिया देखील परमबीर सिंग यांच्या वकिलांनी दिली आहे.
काय आहेत सिंग यांच्यावर आरोप -
अँटिलिया स्फोटके ( Antilia Blast Case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर ( Mansukh Hiren Murder Case ) परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर काल तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आले.