ETV Bharat / city

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी व्यापारी हसन अली खान विरोधात अजामीनपात्र वॉरंट

author img

By

Published : Apr 6, 2022, 5:13 PM IST

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुणे येथील व्यापारी हसन अली खान याला 2011 मध्ये ईडीने अटक केली होती. देशातील सर्वात मोठे 37 हजार कोटी गैरव्यवहार प्रकरणात हसन अली खान अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये हसन अली खानला जामीन देखील मिळाला होता.

Hasan Ali khan
हसन अली खान

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुणे येथील व्यापारी हसन अली खान याला 2011 मध्ये ईडीने अटक केली होती. देशातील सर्वात मोठे 37 हजार कोटी गैरव्यवहार प्रकरणात हसन अली खान अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये हसन अली खानला जामीन देखील मिळाला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयासमोर हजर होत नसल्याने आज मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

हसन अली खानवर जवळपास 37 हजार कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने खानवर 2007 मध्ये धाड टाकून कारवाई केली होती. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून हसन अली खान हा गेल्या अनेक महिन्यापासून न्यायालयात सुनावणी किंवा इतर कारवाई दरम्यान उपस्थित राहत नसल्याने ईडीने मुंबई सत्र न्यायालयात त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे विनंती केली होती. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी अजामीनपात्र वारंट जारी करण्याचा आदेश दिला आहे.

हसन अली खान कोण आहे - 13 वर्षांपूर्वी त्याच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकण्यापूर्वी, 65 वर्षीय खान त्याच्या व्यावसायिक वर्तुळाबाहेर फारसे ओळखत नव्हते. 2000 च्या सुमारास पुण्यात स्थायिक होण्यापूर्वी खान आपल्या बहिणी आणि भावासह हैदराबादमध्ये राहत होता. त्याचे वडील उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी होते.

खानने हैद्राबादमध्ये कार भाड्याने देण्याची सेवा सुरू केली, एक धातू व्यापार कंपनी सुरू केली आणि वित्ताशी संबंधित आणखी एक फर्म सुरू केली ज्यावर नंतर काही बँकांची फसवणूक केल्याचा आरोप झाला. हैदराबाद पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये खान विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचे 6 गुन्हे आहेत, हे सर्व 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990 च्या सुरुवातीला नोंदवले गेले होते. हैदराबाद पोलिसांनी खानवर बँकेची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्‍या एका प्रकरणात, त्याच्यावर 4 लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यांच्याकडून त्याने कमिशन म्हणून डॉलर्सचे आश्वासन देऊन एकूण 70 लाख रुपये घेतले होते. घोड्यांची शर्यत हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा विषय राहिला आणि तो नियमितपणे मुंबई आणि पुण्याला जात असे आणि शर्यतींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावत होते.

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुणे येथील व्यापारी हसन अली खान याला 2011 मध्ये ईडीने अटक केली होती. देशातील सर्वात मोठे 37 हजार कोटी गैरव्यवहार प्रकरणात हसन अली खान अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2015 मध्ये हसन अली खानला जामीन देखील मिळाला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयासमोर हजर होत नसल्याने आज मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

हसन अली खानवर जवळपास 37 हजार कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने खानवर 2007 मध्ये धाड टाकून कारवाई केली होती. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून हसन अली खान हा गेल्या अनेक महिन्यापासून न्यायालयात सुनावणी किंवा इतर कारवाई दरम्यान उपस्थित राहत नसल्याने ईडीने मुंबई सत्र न्यायालयात त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे विनंती केली होती. आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी अजामीनपात्र वारंट जारी करण्याचा आदेश दिला आहे.

हसन अली खान कोण आहे - 13 वर्षांपूर्वी त्याच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकण्यापूर्वी, 65 वर्षीय खान त्याच्या व्यावसायिक वर्तुळाबाहेर फारसे ओळखत नव्हते. 2000 च्या सुमारास पुण्यात स्थायिक होण्यापूर्वी खान आपल्या बहिणी आणि भावासह हैदराबादमध्ये राहत होता. त्याचे वडील उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी होते.

खानने हैद्राबादमध्ये कार भाड्याने देण्याची सेवा सुरू केली, एक धातू व्यापार कंपनी सुरू केली आणि वित्ताशी संबंधित आणखी एक फर्म सुरू केली ज्यावर नंतर काही बँकांची फसवणूक केल्याचा आरोप झाला. हैदराबाद पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये खान विरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचे 6 गुन्हे आहेत, हे सर्व 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990 च्या सुरुवातीला नोंदवले गेले होते. हैदराबाद पोलिसांनी खानवर बँकेची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्‍या एका प्रकरणात, त्याच्यावर 4 लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यांच्याकडून त्याने कमिशन म्हणून डॉलर्सचे आश्वासन देऊन एकूण 70 लाख रुपये घेतले होते. घोड्यांची शर्यत हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा विषय राहिला आणि तो नियमितपणे मुंबई आणि पुण्याला जात असे आणि शर्यतींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे लावत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.