ETV Bharat / city

'उदयनराजे दिवस-रात्र काय करतात जनतेला ठाऊक, मतदारच त्यांना जागा दाखवतील'

author img

By

Published : Sep 14, 2019, 6:21 PM IST

Updated : Sep 14, 2019, 10:08 PM IST

आम्ही ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जसा त्यांचा पराभव केला. तसाच पराभव यावेळीही करू, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले.

उदयनराजे भोसले

मुंबई - उदयनराजे दिवस-रात्र काय करतात, याची माहिती साताऱ्यातील मतदारांना आहे, त्यामुळे ते त्यांना जागा दाखवतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

उदयनराजे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

हेही वाचा - उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे

उदयनराजे यांनी आज (शनिवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उदयनराजे यांनी कायम पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले. आम्ही ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जसा त्यांचा पराभव केला तसा पराभव यावेळी करू, असे वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - 'बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं'

काय घडलं होत १९९९ साली -

उदयनराजे हे पूर्वी भाजपमध्ये होते, ते राज्यमंत्री असताना 1999 मध्ये राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी पवारांना विनंती करुन तिकीट द्यायला लावले आणि ते खासदार झाले, अशी माहिती मलिक यांनी दिली.

मुंबई - उदयनराजे दिवस-रात्र काय करतात, याची माहिती साताऱ्यातील मतदारांना आहे, त्यामुळे ते त्यांना जागा दाखवतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

उदयनराजे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

हेही वाचा - उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे

उदयनराजे यांनी आज (शनिवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, उदयनराजे यांनी कायम पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले. आम्ही ही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जसा त्यांचा पराभव केला तसा पराभव यावेळी करू, असे वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - 'बालिश चाळ्यांना पाठीशी घातलं, पोटच्या पोरावाणी प्रेम केलं, सांगा साहेब काय मिळालं'

काय घडलं होत १९९९ साली -

उदयनराजे हे पूर्वी भाजपमध्ये होते, ते राज्यमंत्री असताना 1999 मध्ये राष्ट्रवादीने त्यांचा पराभव केला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी पवारांना विनंती करुन तिकीट द्यायला लावले आणि ते खासदार झाले, अशी माहिती मलिक यांनी दिली.

Last Updated : Sep 14, 2019, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.