ETV Bharat / city

Navneet Rana And Ravi Rana : नवनीत राणा रवी राणांना दिलासा, या प्रकरणात सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष PMLA कोर्टाने दिलासा दिला आहे. राणा दाम्पत्यांना खार पोलिसांकडून अटक ( Arrested ) करण्यात आली होती.

author img

By

Published : Jul 7, 2022, 2:19 PM IST

राणा दाम्पत्यांना कोर्टाने दिलासा दिला
राणा दाम्पत्यांना कोर्टाने दिलासा दिला

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष PMLA कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हनुमान चालीसा प्रकरण ( Hanuman Chalisa case ) दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा केल्या प्रकरणात खार पोलिसांकडून ( Khar Police Station ) 353 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या होता. या प्रकरणात आज राणा दांपत्यांना ( Rana couple ) अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात आज सरकारी वकील प्रदीप घरात आणि राणा दांपत्य यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी बाजू मांडली होती दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्य यांना काही अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. राणा दाम्पत्यांना खार पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर त्यांना 50 जातमुचलक्यावर सोडण्यात यावे असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहे.



काय आहेत अटी व शर्ती -

- अर्जदारांनी तपास संस्थेला सहकार्य करावे

- अर्जदारांनी प्रकरणातील तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही प्रलोभन, धमकी किंवा वचन देऊ नये, जेणेकरुन त्याला न्यायालय किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला तथ्ये उघड करण्यापासून परावृत्त करता येईल आणि पुराव्याशी छेडछाड करू नये.

- या न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय अर्जदार भारत सोडू शकत नाहीत.

-अटकपूर्व जामिनावर असताना अर्जदारांनी तत्सम गुन्हा करू नये.

- कोणत्याही अटींचा भंग केल्यास अटकपूर्व जामीन त्वरित रद्द केला जाईल .

काय आहे प्रकरण - नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्री बाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं, आणि या नाट्यावर पडदा पडला.

पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली होती. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

हेही वाचा - पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष PMLA कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हनुमान चालीसा प्रकरण ( Hanuman Chalisa case ) दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा केल्या प्रकरणात खार पोलिसांकडून ( Khar Police Station ) 353 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या होता. या प्रकरणात आज राणा दांपत्यांना ( Rana couple ) अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात आज सरकारी वकील प्रदीप घरात आणि राणा दांपत्य यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी बाजू मांडली होती दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्य यांना काही अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. राणा दाम्पत्यांना खार पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर त्यांना 50 जातमुचलक्यावर सोडण्यात यावे असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहे.



काय आहेत अटी व शर्ती -

- अर्जदारांनी तपास संस्थेला सहकार्य करावे

- अर्जदारांनी प्रकरणातील तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही प्रलोभन, धमकी किंवा वचन देऊ नये, जेणेकरुन त्याला न्यायालय किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला तथ्ये उघड करण्यापासून परावृत्त करता येईल आणि पुराव्याशी छेडछाड करू नये.

- या न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय अर्जदार भारत सोडू शकत नाहीत.

-अटकपूर्व जामिनावर असताना अर्जदारांनी तत्सम गुन्हा करू नये.

- कोणत्याही अटींचा भंग केल्यास अटकपूर्व जामीन त्वरित रद्द केला जाईल .

काय आहे प्रकरण - नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्री बाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं, आणि या नाट्यावर पडदा पडला.

पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली होती. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

हेही वाचा - पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.