ETV Bharat / city

विद्यार्थी रडतायेत; आत्महत्येची मागणी करताहेत तरी, या सरकारला पाझर फुटेना

राज्यातील तरुणांच्या पंखांना बळ देण्याऐवजी हे सरकार ते छाटण्याचे काम करत आहे, असा आरोप करत सरकार लोकशाहीला मारक असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

author img

By

Published : Sep 10, 2019, 7:58 PM IST

अजित पवार

मुंबई - आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी सोमवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती, याबाबत अजित पवार यांनी ट्विटरवर सरकारविरोधात तीव्र टीका केली आहे.

  • जनतेच्या भावनांची,समस्यांची यांना जाण नाही.दाराशी आलेल्या मराठा तरुणांना पोलिसांकरवी हुसकावलं. विद्यार्थी रडतायेत;आत्महत्येची मागणी करताहेत तरी,या सरकारला पाझर फुटत नाही.पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार!२०१४ च्या जीआरनुसार पात्र सर्वांना नोकरी मिळालीच पाहिजे.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटण्याचे काम करणारे हे सरकार लोकशाहीला मारक असल्याची जोरदार टीका अजित पवारांनी केली आहे.

हेही वाचा... आरटीओ भरतीत निवड होऊनही नोकरी न मिळाल्याने उमेदवारांनी चंद्रकांत पाटलांना घेरले

हेही वाचा... वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय

काय आहे प्रकरण ?

राज्यातील सहायक मोटार वाहन परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना वगळल्याबाबत परीक्षार्थी संतप्त होते. राज्य शासनाच्या 2014 च्या निर्णयाप्रमाणे खुल्या वर्गातील तरुणांना शिफारसपत्र देण्यात आले होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. आता 2018 मधील नव्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणामधील खुल्या वर्गात राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने 135 मराठा तरुणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे मराठा परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन जाब विचारण्याचे ठरवले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची हे सरकार फसवणूक करत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा... महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टीस देते कौशल्य विकासाचा मंत्र

हेही वाचा... वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी १५ लाखांची मागणी; वेळीच लक्षात आली फसवणूक

मुंबई - आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी सोमवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती, याबाबत अजित पवार यांनी ट्विटरवर सरकारविरोधात तीव्र टीका केली आहे.

  • जनतेच्या भावनांची,समस्यांची यांना जाण नाही.दाराशी आलेल्या मराठा तरुणांना पोलिसांकरवी हुसकावलं. विद्यार्थी रडतायेत;आत्महत्येची मागणी करताहेत तरी,या सरकारला पाझर फुटत नाही.पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार!२०१४ च्या जीआरनुसार पात्र सर्वांना नोकरी मिळालीच पाहिजे.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटण्याचे काम करणारे हे सरकार लोकशाहीला मारक असल्याची जोरदार टीका अजित पवारांनी केली आहे.

हेही वाचा... आरटीओ भरतीत निवड होऊनही नोकरी न मिळाल्याने उमेदवारांनी चंद्रकांत पाटलांना घेरले

हेही वाचा... वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय

काय आहे प्रकरण ?

राज्यातील सहायक मोटार वाहन परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना वगळल्याबाबत परीक्षार्थी संतप्त होते. राज्य शासनाच्या 2014 च्या निर्णयाप्रमाणे खुल्या वर्गातील तरुणांना शिफारसपत्र देण्यात आले होते. तरीही त्यांना वगळण्यात आले. आता 2018 मधील नव्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणामधील खुल्या वर्गात राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने 135 मराठा तरुणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे मराठा परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर जाऊन जाब विचारण्याचे ठरवले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची हे सरकार फसवणूक करत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा... महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टीस देते कौशल्य विकासाचा मंत्र

हेही वाचा... वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी १५ लाखांची मागणी; वेळीच लक्षात आली फसवणूक

Intro:पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार! - अजित पवार

mh-mum-ncp-ajitpavar-tweet-7201153

मुंबई, ता. १० :

राज्यातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार! असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी ट्वीट करुन केली आहे.
आरटीओ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण - तरुणींनी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. मात्र त्यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यात आली. याबाबत अजितदादा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जनतेच्या भावनांची, समस्यांची यांना जाण नाही.दाराशी आलेल्या मराठा तरुणांना पोलिसांकरवी हुसकावलं. विद्यार्थी रडतायेत, आत्महत्येची मागणी करताहेत तरी,या सरकारला पाझर फुटत नाही अशा शब्दात अजितदादा पवार यांनी ट्वीट करुन नाराजी व्यक्त केली आहे.
२०१४ च्या जीआरनुसार पात्र सर्वांना नोकरी मिळालीच पाहिजे. सहाय्यक मोटार वाहन परीक्षेला राखीव प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, त्यात दुमत नाही. पण खुल्या वर्गातल्या १३५ विद्यार्थ्यांना वगळलं, हा अन्याय आहे असेही अजितदादा पवार यांनी म्हटले आहे. गाऱ्हाणं मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचं
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं असंही अजितदादा पवार यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे.Body:पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे लोकशाहीमारक सरकार! - अजित पवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.