ETV Bharat / city

6 हजार 500 'सेवा निवृत्त एसटी कर्मचारी संकटात; हक्काचे पैसे महामंडळाने थकविले

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 2019 पासून राज्यभरातील तब्बल 6 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 160 कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. असे एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

author img

By

Published : Jun 6, 2021, 2:14 PM IST

Updated : Jun 6, 2021, 3:55 PM IST

MSRTC did not pay pending salary to employees
एसटी

मुंबई- संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडे सहा हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, आतापर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाही. परिणामी गेल्या अडीच वर्षात 50 पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीरंग बरगे - एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस

कामगारांमध्ये संतापाची लाट-

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 2019 पासून राज्यभरातील तब्बल 6 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 160 कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. असे एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

कोरोना पैशांची चणचण-

सेवा निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पैकी, अंदाजे 51 कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्या मुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्याना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. व अजूनही काहीजण उपचार घेत आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही.

परिवहन मंत्र्यांना पत्र-

आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणली जाते. तरीही २०१९ पासून ६ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळालेली आहे. मात्र, आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी महाराष्ट्र, एसटी. कर्मचारी कॉग्रेसकडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

मुंबई- संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या साडे सहा हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, आतापर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाही. परिणामी गेल्या अडीच वर्षात 50 पेक्षा जास्त निवृत्त कामगारांचा मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीरंग बरगे - एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस

कामगारांमध्ये संतापाची लाट-

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 2019 पासून राज्यभरातील तब्बल 6 हजार 500 निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 160 कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. असे एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

कोरोना पैशांची चणचण-

सेवा निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना पैकी, अंदाजे 51 कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्या मुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कम सुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्याना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. व अजूनही काहीजण उपचार घेत आहेत. त्यांना औषध उपचारासाठी सुद्धा रक्कम कामी आलेली नाही.

परिवहन मंत्र्यांना पत्र-

आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणली जाते. तरीही २०१९ पासून ६ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळालेली आहे. मात्र, आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी महाराष्ट्र, एसटी. कर्मचारी कॉग्रेसकडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.