ETV Bharat / city

देशाची व महाराष्ट्राची मान उंचावली, वर्षा गायकवाड यांनी केले डिसले यांचे अभिनंदन

author img

By

Published : Dec 4, 2020, 5:55 PM IST

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीत डिसले यांना जाहीर झाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून डिसले यांचे अभिनंदन केले.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांनी मिळाला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला गेला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. दरम्यान, डिसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून डिसले यांचे अभिनंदन केले.

जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता-

गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, या पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातून प्राप्त झालेल्या 12 हजार नामांकनांमधून आपली निवड झाली. ही बाब अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळविणारे आपण पहिले भारतीय शिक्षक ठरले आहात. पुरस्काराबरोबर मिळालेल्या 7 कोटी रकमेतून अर्धी रक्कम आपण अंतिम फेरीतील विविध देशातील 9 शिक्षकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून आपली शिक्षणविषयक तळमळ व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता दिसून येते. आपल्याकडील दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते.

देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली-

“अंतिम यादीतील सगळ्या शिक्षकांकडे एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त निमित्त आहे. दुसरे म्हणजे अंतिम यादीतील 9 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील तेव्हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडेल.” हे आपले म्हणणे व कृती आपल्या देशाच्या महान परंपरेला साजेशी आहे. यामुळे देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित-

प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळागाळातल्या मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी आपण अथक व विषेश प्रयत्न केल्यामुळे मुलींची शाळेतील गळती थांबली व बाल विवाहांना आळा बसला. क्युआर कोडचा वापर करून पाठ्यपुस्तकातील कविता व पाठाबद्दल अधिकची माहिती मिळविता येते. या आपल्या नावीन्यपूर्ण कल्पकतेला मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. आपणासारखे आपल्या कामावर निष्ठा असणारे, विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे आणि तन मन धनाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी नेटाने प्रयत्न करूया-

भविष्यात शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये समन्वय वाढवून राज्यातील तसेच देशातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करूया. जागतिक दर्जाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले पुन:श्च हार्दिक अभिनंदन! यापुढेही आपण अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करावी, ही अपेक्षा व्यक्त करून रणजीत सिंह डिसले यांच्या पुढील वाटचालीस वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या एक वर्षाच्या कामावर जनतेकडून शिक्कामोर्तब - शरद पवार

हेही वाचा- पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला शून्य जागा

मुंबई - शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’ म्हणून ओळखला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांनी मिळाला. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला गेला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. दरम्यान, डिसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून डिसले यांचे अभिनंदन केले.

जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता-

गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, या पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातून प्राप्त झालेल्या 12 हजार नामांकनांमधून आपली निवड झाली. ही बाब अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळविणारे आपण पहिले भारतीय शिक्षक ठरले आहात. पुरस्काराबरोबर मिळालेल्या 7 कोटी रकमेतून अर्धी रक्कम आपण अंतिम फेरीतील विविध देशातील 9 शिक्षकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून आपली शिक्षणविषयक तळमळ व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता दिसून येते. आपल्याकडील दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते.

देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली-

“अंतिम यादीतील सगळ्या शिक्षकांकडे एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त निमित्त आहे. दुसरे म्हणजे अंतिम यादीतील 9 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील तेव्हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडेल.” हे आपले म्हणणे व कृती आपल्या देशाच्या महान परंपरेला साजेशी आहे. यामुळे देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली आहे, असे गायकवाड म्हणाल्या.

महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित-

प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळागाळातल्या मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी आपण अथक व विषेश प्रयत्न केल्यामुळे मुलींची शाळेतील गळती थांबली व बाल विवाहांना आळा बसला. क्युआर कोडचा वापर करून पाठ्यपुस्तकातील कविता व पाठाबद्दल अधिकची माहिती मिळविता येते. या आपल्या नावीन्यपूर्ण कल्पकतेला मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. आपणासारखे आपल्या कामावर निष्ठा असणारे, विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे आणि तन मन धनाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी नेटाने प्रयत्न करूया-

भविष्यात शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये समन्वय वाढवून राज्यातील तसेच देशातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करूया. जागतिक दर्जाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले पुन:श्च हार्दिक अभिनंदन! यापुढेही आपण अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करावी, ही अपेक्षा व्यक्त करून रणजीत सिंह डिसले यांच्या पुढील वाटचालीस वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- महाविकास आघाडीच्या एक वर्षाच्या कामावर जनतेकडून शिक्कामोर्तब - शरद पवार

हेही वाचा- पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला शून्य जागा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.