ETV Bharat / city

गिरणी कामगारांच्या घरांची सोडत दिवाळीनंतर होण्याची शक्यता : म्हाडा अध्यक्षांचे संकेत

author img

By

Published : Sep 19, 2019, 5:24 AM IST

शहरातील गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून, या घरांची सोडत विधानसभा निवडणुकीनंतर होण्याचे संकेत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

मुंबई - शहरातील गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यांच्या घरांची सोडत विधानसभा निवडणुकीनंतर होण्याचे संकेत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिले आहेत.

गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. यामधील अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सध्या याबाबत प्रक्रिया सुरू असून, दिवाळी दरम्यान या घरांची सोडत काढण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, म्हाडाची राज्यभरातील 17 हजार घरे जास्त किमतीमुळे पडून होती. विकासकापेक्षा अधिक किंमत आकारली जात असल्याने या घरांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र, आम्ही या घरांची किंमत 20 ते 45 टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर जवळपास सर्व घरांची विक्री झाल्याची माहिती म्हाडा अध्यक्षांनी दिली. विरार परिसरातील घरांना राजकीय कारणांमुळे पाणी नाकारले जात होते. परंतु, आता बैठकीत निर्णय झाल्याने या इमारतींना पाण्याची सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

या ठिकाणच्या घरांमध्ये पत्रकारांना किंमतीत विशेष सवलत देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच बुधवार (दि.18सप्टेंबर)ला म्हाडाच्या बैठकीत ठाण्यातील 56 पत्रकारांना घरे देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. म्हाडा वसाहतींमधील वाढीव शुल्क कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, त्याचा अहवाल लवकरच अहवाल येणार असल्यचे त्यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत व्याज व सेवाशुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.

सेवाशुल्क भरताना ग्राहकांवर बोजा नको म्हणून 4 वर्षांची मुदत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, विरार, पालघरसहीत कोकण परिसरात पुढील दोन वर्षांत म्हाडा 7 ते 8 हजार घरे बांधणार आहे. प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकणार असून, पुनर्विकासाचे संमतीपत्र मिळाल्यास म्हाडा कंत्राटदार म्हणूनही काम करेल, असे सामंंत म्हणाले.

मुंबई - शहरातील गिरणी कामगारांच्या प्रलंबित घरांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यांच्या घरांची सोडत विधानसभा निवडणुकीनंतर होण्याचे संकेत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिले आहेत.

गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. यामधील अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सध्या याबाबत प्रक्रिया सुरू असून, दिवाळी दरम्यान या घरांची सोडत काढण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, म्हाडाची राज्यभरातील 17 हजार घरे जास्त किमतीमुळे पडून होती. विकासकापेक्षा अधिक किंमत आकारली जात असल्याने या घरांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र, आम्ही या घरांची किंमत 20 ते 45 टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर जवळपास सर्व घरांची विक्री झाल्याची माहिती म्हाडा अध्यक्षांनी दिली. विरार परिसरातील घरांना राजकीय कारणांमुळे पाणी नाकारले जात होते. परंतु, आता बैठकीत निर्णय झाल्याने या इमारतींना पाण्याची सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

या ठिकाणच्या घरांमध्ये पत्रकारांना किंमतीत विशेष सवलत देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच बुधवार (दि.18सप्टेंबर)ला म्हाडाच्या बैठकीत ठाण्यातील 56 पत्रकारांना घरे देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. म्हाडा वसाहतींमधील वाढीव शुल्क कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, त्याचा अहवाल लवकरच अहवाल येणार असल्यचे त्यांनी सांगितले. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत व्याज व सेवाशुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहेत, असे ते म्हणाले.

सेवाशुल्क भरताना ग्राहकांवर बोजा नको म्हणून 4 वर्षांची मुदत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, विरार, पालघरसहीत कोकण परिसरात पुढील दोन वर्षांत म्हाडा 7 ते 8 हजार घरे बांधणार आहे. प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकणार असून, पुनर्विकासाचे संमतीपत्र मिळाल्यास म्हाडा कंत्राटदार म्हणूनही काम करेल, असे सामंंत म्हणाले.

Intro:मुंबई :

मुंबईतील गिरणी कामगारांची प्रलंबित घराची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून गिरणी कामगारांच्या घरांची सोडत विधानसभा निवडणुकीनंतर होण्याचे संकेत म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिले. गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून यामध्ये अर्जदारांचे कागदपत्र छाननी करून न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत प्रक्रिया सुरू असून दिवाळीच्या सुमारास गिरणी कामगारांसाठीच्या घरांची सोडत काढण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.Body:मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे अध्यक्ष . नरेंद्र वि. वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले.
म्हाडाची राज्यभरातील 17 हजार घरे जास्त किमतीमुळे पडून होती. विकासकापेक्षा जास्त किंमत आकारली जात असल्याने या घरांना ग्राहक मिळत नव्हते. मात्र आम्ही त्याची किंमत 20 ते 45 टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर जवळपास सर्व घरांची विक्री झाली आहे. विरार परिसरातील घरांना राजकीय कारणांमुळे पाणी नाकारले जात होते. मात्र आता बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला असून या इमारतींना पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे. मध्यमवर्गाला परवडणाऱ्या किमतीत याठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाला यश आले आहे. याठिकाणच्या घरांमध्ये पत्रकारांना विशेष सवलत म्हणून दर कमी करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. बुधवारी म्हाडाच्या बैठकीत ठाण्यातील 56 पत्रकारांना घरे देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

म्हाडाच्या वसाहतींमधील वाढीव शुल्काबाबत लोकांची छळवणूक होत असल्याने समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच येईल, मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत व्याजासहीत सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सेवाशुल्क भरताना ग्राहकांवर बोजा नको म्हणून 4 वर्षांची मुदत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. विरार, पालघरसहीत कोकण परिसरात पुढील दोन वर्षांत 7 ते 8 हजार घरे तयार होतील, असे ते म्हणाले. सुरक्षित व स्वच्छ वातावरणात म्हाडावासीय राहावेत, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे विकासक प्रकल्प अर्धवट सोडून ग्राहकांना रस्त्यावर आणतात अशांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. पुनर्विकास करताना संमतीपत्र मिळाल्यास म्हाडा कंत्राटदार म्हणून काम करेल, असे ते म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.