मुंबई - मराठा आरक्षण संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आम्हाला काही निर्देश दिले आहेत. माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल 31 मे पर्यंत सरकारला प्राप्त होईल.सुप्रीम कोर्टाचे जे 550 पानांचे जजमेंट आलेले आहे त्यावर अभ्यास करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण यांनी सांगितले, की आम्ही राज्यपालांना विनंती केली होती, आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. त्याप्रमाणे राष्ट्रपतींकडे त्यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. मराठा आरक्षणाप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी मदत करण्याचे आवाहन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान उद्या मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांना आमची विनंती राहील की, त्यांनी देखील पंतप्रधानांना भेटावे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून समिती गठित.. ३१ मे पर्यंत येणार अहवाल - माजी न्यायमूर्ती भोसले
मराठा आरक्षण संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आम्हाला काही निर्देश दिले आहेत. माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल 31 मे पर्यंत सरकारला प्राप्त होईल.अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
![Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून समिती गठित.. ३१ मे पर्यंत येणार अहवाल maratha reservation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11808225-292-11808225-1621345999037.jpg?imwidth=3840)
मुंबई - मराठा आरक्षण संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आम्हाला काही निर्देश दिले आहेत. माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्याचा अहवाल 31 मे पर्यंत सरकारला प्राप्त होईल.सुप्रीम कोर्टाचे जे 550 पानांचे जजमेंट आलेले आहे त्यावर अभ्यास करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण यांनी सांगितले, की आम्ही राज्यपालांना विनंती केली होती, आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. त्याप्रमाणे राष्ट्रपतींकडे त्यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी केली होती. मराठा आरक्षणाप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी मदत करण्याचे आवाहन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान उद्या मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांना आमची विनंती राहील की, त्यांनी देखील पंतप्रधानांना भेटावे.