ETV Bharat / city

मुख्यमंत्री ठाकरे महाड दौऱ्यावर रवाना, तळई गावाला देणार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. या दौऱ्यात ते तळई येथील दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ,एसडीआरएफ, लष्कर आणि नौदलासह वायूदलाच्या तुकड्याही याकार्यात सहभागी झाल्या आहेत.

author img

By

Published : Jul 24, 2021, 12:08 PM IST

Updated : Jul 24, 2021, 12:41 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे महाड दौऱ्यावर रवाना,
मुख्यमंत्री ठाकरे महाड दौऱ्यावर रवाना,

मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये दुर्दैवाने 76 जणांचा बळी गेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईमध्ये 32 घरांवरती दरड कोसळल्याने तब्बल 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवारी) महाडच्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्त घटनास्थळाचा पाहणी दौरा करणार आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. या दौऱ्यात ते तळई येथील दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ,एसडीआरएफ, लष्कर आणि नौदलासह वायूदलाच्या तुकड्याही याकार्यात सहभागी झाल्या आहेत.

तळई गावाला देणार भेट
तळई गावाला देणार भेट

अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास महाड येथील वरंध घाट परिसरातील तळई गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ मार्फत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी १२ वाजता, मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावाकडे निघणार आहेत. दुपारी 1.30 वाजता तळई येथे पोहोचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करुन दुपारी 3.20 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून देण्यात आली

राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिली. आणखी एक-दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तळई गावाला देणार भेट
तळई गावाला देणार भेट

मृतांच्या नातेवाईंकांना 5 लाखांची मदत-

दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच, यामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये दुर्दैवाने 76 जणांचा बळी गेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईमध्ये 32 घरांवरती दरड कोसळल्याने तब्बल 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवारी) महाडच्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्त घटनास्थळाचा पाहणी दौरा करणार आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. या दौऱ्यात ते तळई येथील दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ,एसडीआरएफ, लष्कर आणि नौदलासह वायूदलाच्या तुकड्याही याकार्यात सहभागी झाल्या आहेत.

तळई गावाला देणार भेट
तळई गावाला देणार भेट

अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास महाड येथील वरंध घाट परिसरातील तळई गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ मार्फत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी १२ वाजता, मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावाकडे निघणार आहेत. दुपारी 1.30 वाजता तळई येथे पोहोचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करुन दुपारी 3.20 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून देण्यात आली

राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिली. आणखी एक-दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

तळई गावाला देणार भेट
तळई गावाला देणार भेट

मृतांच्या नातेवाईंकांना 5 लाखांची मदत-

दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच, यामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

Last Updated : Jul 24, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.