ETV Bharat / city

Jayant Patil on Cm Thackeray resignation : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ मनात राहतील - जयंत पाटील

author img

By

Published : Jun 30, 2022, 7:15 AM IST

Updated : Jun 30, 2022, 8:45 AM IST

उद्धव ठाकरे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेच्या ( Jayant Patil on Uddhav Thackeray resignation ) मनात राहतील. एक चांगले सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले ( Jayant Patil NCP ) सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार ( Uddhav Thackeray resigns as cm ) काम करत होते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

Jayant Patil on uddhav thackeray resignation
उद्धव ठाकरे राजीनामा

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 30 जूनला महाविकास आघाडी सरकार विश्‍वासदर्शक ( Jayant Patil on Uddhav Thackeray resignation ) ठरावाला सामोरे जाईल असे वाटत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray resigns as cm ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपला राजीनामा दिला. यावर उद्धव ठाकरे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात राहतील. एक चांगले सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार काम करत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे देशभरात मुख्यमंत्री कसे काम करू शकतात याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil NCP ) यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना जयंत पाटील

हेही वाचा - Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती

संख्याबळ नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले असले तरी दीर्घकाळ ते लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढले. तसेच, काल मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधल्यानंतर राजीनामा देतील याबाबतची कल्पना शरद पवार यांना नव्हती, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत होते. मुख्यमंत्र्यांना हे सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शेवटपर्यंत पाठिंबा दिला. अगदी शेवटच्या वेळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. म्हणूनच येणाऱ्या काळात एकत्र बसून चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.

अर्थमंत्र्यांनी निधी दिला नाही म्हणणे चुकीचे - एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवत मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी निधीच दिला नसल्याचा आरोप सातत्याने केला. मात्र, आरोप करणारे बंडखोर आमदार खोटे बोलत असून, त्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात किती निधी देण्यात आला याबाबतची यादीच जयंत पाटील यांनी दाखवली. त्यामुळे, केवळ सरकार पाडण्यासाठी काहीतरी कारण हवे असल्याने बंडखोर आमदारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप केला जात असल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले.

हेही वाचा - Uddhav Thackeray Resign Video : राजीनाम्याची घोषणा करताच मुख्यमंत्री झाले भावूक; मानले सर्वांचे आभार पाहा व्हिडिओ

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 30 जूनला महाविकास आघाडी सरकार विश्‍वासदर्शक ( Jayant Patil on Uddhav Thackeray resignation ) ठरावाला सामोरे जाईल असे वाटत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray resigns as cm ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपला राजीनामा दिला. यावर उद्धव ठाकरे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात राहतील. एक चांगले सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार काम करत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे देशभरात मुख्यमंत्री कसे काम करू शकतात याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil NCP ) यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना जयंत पाटील

हेही वाचा - Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती

संख्याबळ नसल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले असले तरी दीर्घकाळ ते लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत काढले. तसेच, काल मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधल्यानंतर राजीनामा देतील याबाबतची कल्पना शरद पवार यांना नव्हती, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत होते. मुख्यमंत्र्यांना हे सरकार चालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शेवटपर्यंत पाठिंबा दिला. अगदी शेवटच्या वेळेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. म्हणूनच येणाऱ्या काळात एकत्र बसून चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.

अर्थमंत्र्यांनी निधी दिला नाही म्हणणे चुकीचे - एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवत मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी निधीच दिला नसल्याचा आरोप सातत्याने केला. मात्र, आरोप करणारे बंडखोर आमदार खोटे बोलत असून, त्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात किती निधी देण्यात आला याबाबतची यादीच जयंत पाटील यांनी दाखवली. त्यामुळे, केवळ सरकार पाडण्यासाठी काहीतरी कारण हवे असल्याने बंडखोर आमदारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप केला जात असल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले.

हेही वाचा - Uddhav Thackeray Resign Video : राजीनाम्याची घोषणा करताच मुख्यमंत्री झाले भावूक; मानले सर्वांचे आभार पाहा व्हिडिओ

Last Updated : Jun 30, 2022, 8:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.