मुंबई शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एका बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत असतानाच, दुसरीकडे या सर्व घडामोडींकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक संधी म्हणून पाहताना दिसते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अतिशय महत्त्वाची बैठक आज मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी करण्याचे आदेश सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच सध्या ज्या काही गोष्टी पेरल्या जात आहेत. त्या तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. या भावनिक राजकारणाला बळी पडू नका, असे सूचना देखील राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्वबळाची तयारी करा या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, येणारी निवडणुक स्वबळावर लढायची आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये निवडणुका लागतील. आपल्याकडे आता ५ महीने आहेत. त्यासाठी तुमचं पाॅझीटीव्ह माईंड असलं पाहीजे. राज्यातील राजकारण खालच्या थराला जातंय. जे पेरलं जातंय, ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये. असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता कार्यकर्ते आपापल्या भागात स्वबळाची तयारी करत आहेत.
लाखो लोकांनी दसरा मेळावा पाहिला नाही तर सध्याच्या राजकारणावर व बंधू उद्धव ठाकरेंवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे सहानभुती जातेय. कसली सहानभुती या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली. वातावरण तसं नाही आहे. लाखो लोकांनी हे दसरे मेळावे पाहिले सुद्धा नाहीत. अनेकांनी दसरे मेळावे पाहिले नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे, आपण सत्तेत पोहचु. असे म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस दिले आहेत.
तुम्हाला लोकसभा विधानसभेत पाठवतो उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार नाही. असे म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. महापालिकेचा न भुतो असं यश मिळवायचे आहे. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार लोकसेभत सत्तेत खासदार म्हणुन बसवणार फक्त तुम्ही थिंक पाॅझीटीव्ह रहा. आपले नाक्यानाक्यावरं झेंडे लागले पाहीजेत. पुढेच 5 महीने रात्रभर काम केलं पाहिजे. लोकांना तुम्ही जो पर्यंत कवेत घेणार नाही, तो पर्यंत लोकं कवेत तुम्हाला घेणार नाहीत. विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांनी नेत्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.