ETV Bharat / city

मुंबई शहरासह उपनगरात 'गुलाब'चा प्रभाव.. दिवसभर पावसाची मुसळधार

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:21 PM IST

मुंबईत सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मध्य रात्री बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आता शमले आहे.

Heavy rains in Mumbai
Heavy rains in Mumbai

मुंबई - मुंबईत सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मध्य रात्री बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आता शमले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.

Heavy rains in Mumbai
मुंबईत पावसाची संततधार
आज गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच मुंबईत विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत आहे. अजून रिमझिम पाऊस सुरूच आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्याचा सुरुवात झाली आहे. पूर्व उपनगरात देखील काही भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल, रस्ते वाहूतुकीवर झाला नाही आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Heavy rains in Mumbai
मुंबईत पावसाची संततधार
येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.


हे ही वाचा -VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नगर, पुणे येथे ऑरेंज अलर्ट आणि सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम येथे येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई - मुंबईत सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मध्य रात्री बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आता शमले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.

Heavy rains in Mumbai
मुंबईत पावसाची संततधार
आज गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच मुंबईत विविध भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत आहे. अजून रिमझिम पाऊस सुरूच आहे. यामुळे सखल भागात पाणी भरण्याचा सुरुवात झाली आहे. पूर्व उपनगरात देखील काही भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकल, रस्ते वाहूतुकीवर झाला नाही आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे.

Heavy rains in Mumbai
मुंबईत पावसाची संततधार
येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.


हे ही वाचा -VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नगर, पुणे येथे ऑरेंज अलर्ट आणि सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम येथे येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.