ETV Bharat / city

मुंबईमध्ये कृत्रिम तलावात गणपती विसर्जनाचे प्रमाण घटले

author img

By

Published : Sep 10, 2022, 7:01 PM IST

मुंबईत कृत्रीम तलावात मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार मूर्तींचे विसर्जन कमी झाले आहे. कृत्रिम तलावात गणपती विसर्जनाचे प्रमाण घटले आहे. (immersion in artificial ponds decreased in Mumbai). यामुळे मुंबईकर भाविकांनी यंदा कृत्रिम तलावाला कमी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा दिवसात १ लाख ९३ हजार ६२ घरगुती, सार्वजनिक गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यापैकी ६६ हजार १२७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे (Ganesh visarjan 2022).

मुंबईमध्ये कृत्रिम तलावात गणपती विसर्जनाचे प्रमाण घटले
मुंबईमध्ये कृत्रिम तलावात गणपती विसर्जनाचे प्रमाण घटले

मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे उत्सव निर्बंधांमध्ये साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे मागील वर्षीपेक्षा स्थापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची संख्या वाढली आहे. मुंबईत कृत्रीम तलावात मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार मूर्तींचे विसर्जन कमी झाले आहे. यामुळे मुंबईकर भाविकांनी यंदा कृत्रिम तलावाला कमी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे (Ganesh visarjan 2022).

मूर्ती वाढल्या कृत्रिम तलावाला प्रतिसाद कमी - मुंबईमध्ये ३१ ऑगस्टला लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली. भाविकांकडून बाप्पाचे मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर दीड, पाच, सहा, सात आणि दहा दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसात १ लाख ९३ हजार ६२ घरगुती, सार्वजनिक गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यापैकी ६६ हजार १२७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागीलवर्षी म्हणजेच २०२१ मध्ये १ लाख ६५ हजार ४० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ८२ हजार ६१ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी स्थापना करण्यात आलेल्या मूर्तींचे संख्या वाढली आहे. तर कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या घटली आहे (immersion in artificial ponds decreased in Mumbai).



असे झाले विसर्जन - मुंबईत यावर्षी गेल्या १० दिवसात सार्वजनिक ९ हजार ९६७, घरगुती १ लाख ७६ हजार ३००, हरतालीला आणि गौरी ६७९५ अशा एकूण १ लाख ९३ हजार ०६२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक १८२२, घरगुती ६१ हजार ९८५, हरतालिका गौरी २३२० अशा एकूण ६६ हजार १२७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मागीलवर्षी २०२१ मध्ये सार्वजनिक ८०४९, घरगुती १ लाख ५० हजार ४५४, हरतालिका गौरी ६५३७ अशा एकूण १ लाख ६५ हजार ०४० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी सार्वजनिक ३४९८, घरगुती ७२ हजार ३४७, हरतालिका गौरी ६२१६ अशा एकूण ८२ हजार ०६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.


पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी नियोजन - मुंबईमध्ये पालिकेने गणेश विसर्जन करण्यासाठी ७३ नैसर्गिक स्थळी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. १६२ ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पुढीलवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी दरवर्षी पेक्षा लवकर नियोजन केले जाईल अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे उत्सव निर्बंधांमध्ये साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे मागील वर्षीपेक्षा स्थापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तींची संख्या वाढली आहे. मुंबईत कृत्रीम तलावात मागील वर्षाच्या तुलनेत १६ हजार मूर्तींचे विसर्जन कमी झाले आहे. यामुळे मुंबईकर भाविकांनी यंदा कृत्रिम तलावाला कमी प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे (Ganesh visarjan 2022).

मूर्ती वाढल्या कृत्रिम तलावाला प्रतिसाद कमी - मुंबईमध्ये ३१ ऑगस्टला लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली. भाविकांकडून बाप्पाचे मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर दीड, पाच, सहा, सात आणि दहा दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसात १ लाख ९३ हजार ६२ घरगुती, सार्वजनिक गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यापैकी ६६ हजार १२७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागीलवर्षी म्हणजेच २०२१ मध्ये १ लाख ६५ हजार ४० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ८२ हजार ६१ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी स्थापना करण्यात आलेल्या मूर्तींचे संख्या वाढली आहे. तर कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या घटली आहे (immersion in artificial ponds decreased in Mumbai).



असे झाले विसर्जन - मुंबईत यावर्षी गेल्या १० दिवसात सार्वजनिक ९ हजार ९६७, घरगुती १ लाख ७६ हजार ३००, हरतालीला आणि गौरी ६७९५ अशा एकूण १ लाख ९३ हजार ०६२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात सार्वजनिक १८२२, घरगुती ६१ हजार ९८५, हरतालिका गौरी २३२० अशा एकूण ६६ हजार १२७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मागीलवर्षी २०२१ मध्ये सार्वजनिक ८०४९, घरगुती १ लाख ५० हजार ४५४, हरतालिका गौरी ६५३७ अशा एकूण १ लाख ६५ हजार ०४० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी सार्वजनिक ३४९८, घरगुती ७२ हजार ३४७, हरतालिका गौरी ६२१६ अशा एकूण ८२ हजार ०६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.


पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी नियोजन - मुंबईमध्ये पालिकेने गणेश विसर्जन करण्यासाठी ७३ नैसर्गिक स्थळी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. १६२ ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते. कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पुढीलवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी दरवर्षी पेक्षा लवकर नियोजन केले जाईल अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.