ETV Bharat / city

Dangerous Buildings in Mumbai : मुंबईतील अति धोकादायक इमारती पोलिसांच्या मदतीने करण्यात येणार रिकाम्या

author img

By

Published : Jul 8, 2022, 10:53 PM IST

जोरदार पावसात मुंबईतील इमारती त्यांचे भाग कोसळण्याच्या घटना घडत असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या. अतिधोकादायक इमारतीतील रहिवासी सूचना देऊनही इमारती रिकाम्या करीत नाहीत. त्यामुळे अशा इमारती पोलिसांच्या मदतीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ( Extremely dangerous buildings will be emptied )

Dangerous Buildings in Mumbai
अति धोकादायक इमारती

मुंबई - मुंबईतील धोकादायक इमारतीतील ( Dangerous Buildings in Mumbai ) काही रहिवाशांना सूचना देऊनही अद्याप इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असल्याने या इमारती तात्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने अशा इमारतींची यादी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. ( Dangerous Buildings will be emptied in Mumbai )

अतिधोकादायक इमारती खाली करणार - मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची पावसाळ्या दरम्यानची विशेष समन्वय बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत मुंबईतील अतिधोकादायक इमारती तसेच डोंगर उतारावरील झोपड्यांबाबत आढावा घेण्यात आला. जोरदार पावसात मुंबईतील इमारती त्यांचे भाग कोसळण्याच्या घटना घडत असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या. अतिधोकादायक इमारतीतील रहिवासी सूचना देऊनही इमारती रिकाम्या करीत नाहीत. त्यामुळे अशा इमारती पोलिसांच्या मदतीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ( Extremely dangerous buildings will be emptied )

हे होते उपस्थित - या बैठकीसाठी महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

इतक्या इमारती धोकादायक - मुंबईत अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारती आहेत. या ३३७ इमारतींपैकी १०२ इमारतींचे लाईट पाणी कापले आहे. तर १०९ रिकाम्या केल्या आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यानंतरही नागरिक इमारती खाली करत नसल्याने पोलिसांच्या मदतीने या इमारती खाली केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - Cloudburst In Amarnath Cave Area: अमरनाथ गुहा परिसरात ढगफुटीमुळे 10 जणांचा मृत्यू, 40 यात्रेकरू बेपत्ता

मुंबई - मुंबईतील धोकादायक इमारतीतील ( Dangerous Buildings in Mumbai ) काही रहिवाशांना सूचना देऊनही अद्याप इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारतीत वास्तव्य करणे धोकादायक असल्याने या इमारती तात्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने अशा इमारतींची यादी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. ( Dangerous Buildings will be emptied in Mumbai )

अतिधोकादायक इमारती खाली करणार - मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची पावसाळ्या दरम्यानची विशेष समन्वय बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत मुंबईतील अतिधोकादायक इमारती तसेच डोंगर उतारावरील झोपड्यांबाबत आढावा घेण्यात आला. जोरदार पावसात मुंबईतील इमारती त्यांचे भाग कोसळण्याच्या घटना घडत असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या. अतिधोकादायक इमारतीतील रहिवासी सूचना देऊनही इमारती रिकाम्या करीत नाहीत. त्यामुळे अशा इमारती पोलिसांच्या मदतीने रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ( Extremely dangerous buildings will be emptied )

हे होते उपस्थित - या बैठकीसाठी महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

इतक्या इमारती धोकादायक - मुंबईत अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारती आहेत. या ३३७ इमारतींपैकी १०२ इमारतींचे लाईट पाणी कापले आहे. तर १०९ रिकाम्या केल्या आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. त्यानंतरही नागरिक इमारती खाली करत नसल्याने पोलिसांच्या मदतीने या इमारती खाली केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - Cloudburst In Amarnath Cave Area: अमरनाथ गुहा परिसरात ढगफुटीमुळे 10 जणांचा मृत्यू, 40 यात्रेकरू बेपत्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.