ETV Bharat / city

26/11 Attack : 13 वर्षांनंतरही अंगावर येतो काटा....वाचा 26/11 हल्यातील साक्षीदार देविका रोटवानीची खास मुलाखत

author img

By

Published : Nov 23, 2021, 3:45 PM IST

Updated : Nov 26, 2021, 9:46 AM IST

तेव्हा कसाबनं झाडलेली गोळी माझ्या पायात लागली. मी खाली पडले बेशुद्ध झाले. देविका सांगत होती. 13 वर्षांनंतरही तो क्षण देविकाच्या अंगावर काटा आणतो त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये देविकावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आणि ती पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. इतकंच नाही तर देविकानं धीर एकवटून कोर्टात कसाब विरोधात साक्षही दिली.

26/11 Attack
26/11 Attack

मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान (26/11 Mumbai terrorist attack) देविकाच्या पायाला गोळी लागली होती. ही जखम मला सतत दिसत राहते जाणवत राहते. मला तो दिवसही अजून आठवतो. मी कधी मरेपर्यंत विसरू शकणार नाही असे देविका रोटावन सांगितले. 26 /11 ला आज 13 वर्ष होऊन सुद्धा तो दिवस मी विसरू शकत नाही आज देखील माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते.

प्रतिक्रिया

13 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री दहा हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेलं कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नरिमन हाऊस या ज्यू सेंटरवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर साठ तास चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले होते. सगळं जगच त्या हल्ल्यानं हादरून गेलं होतं.

पायाला लागलेली गोळी
देविका तेव्हा फक्त नऊ वर्षांची होती. वडील नटवरलाल रोटावन आणि भाऊ जयेशसोबत ती CSMT वरून पुण्याची ट्रेन पकडणार होती. तेवढ्यातच, रात्री साडे नऊच्या सुमारास अजमल कसाब आणि इस्माईल खान CSMT वर दाखल झाले होते. त्यांच्या हाती मशीनगन होत्या. अचानक गोळीबार सुरू झाला आणि देविकाचं जगच बदललं. गोळी झाडल्याचा आवाज आला. सगळे इकडे तिकडे पळू लागले, पळताना एकमेकांवर पडत होते. आम्ही पण तिथून पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कसाबनं झाडलेली गोळी माझ्या पायात लागली. मी खाली पडले बेशुद्ध झाले. देविका सांगत होती. 13 वर्षांनंतरही तो क्षण देविकाच्या अंगावर काटा आणतो त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये देविकावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आणि ती पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. इतकंच नाही तर देविकानं धीर एकवटून कोर्टात कसाब विरोधात साक्षही दिली.

धैर्य एकवटून साक्ष
26/11च्या हल्ल्यात (26/11 Mumbai terrorist attack) जिवंत अटक झालेला अजमल कसाब एकमेव दहशतवादी होता. त्याच्याविरूद्ध साक्ष देणारी, कोर्टात त्याची ओळख पटवून देणारी देविका ही सर्वांत लहान साक्षीदार होती. कोर्टात साक्ष देण्याच्या निर्णयावर देविका आणि तिचे वडील अगदी ठाम होते. देविका पुढे सांगते जेव्हा गोळी लागली तेव्हाच माझं लहानपण हरवलं. पण असंही वाटलं, ठीक आहे, मी देशासाठी उभी राहू शकले. मीडियानं आणि जनतेनं देविकानं त्यावेळी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं. खटल्याचा निकाल लागला आणि कसाब फासावरही लटकला. पण साक्ष देणाऱ्या देविकाचं जगणं आणखी कठीण बनलं.

हेही वाचा - st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव

कसाबविरुध्द दिली साक्ष
अतिरेकी तिच्या मागावर येतील, या भीतीनं समाजातील अनेकांनी देविका आणि तिच्या कुटुंबीयांपासून चार हात लांब राहणं पसंत केलं. मी अतिरेक्याविरोधात साक्ष दिली होती. कोणी मला कसाबची मुलगीच म्हणालं लोकांनी काय काय नावं ठेवली हे देविका सांगत होती. देविकाच्या कुटुंबीयांना घरही बदलावं लागलं. सध्या ती आपले वडील आणि भावासोबत वांद्रे येथील सुभाषनगरात एका बैठ्या चाळीतील छोट्या घरात राहते.

नातलगांनी संबंध तोडले
रोटावन परिवार मूळचा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुमेरपूरचा. गावच्या नातलगांनीही देविकाच्या कुटुंबीयांना दूर केलं आहे. काही समारंभ असेल, लग्न असेल तर आम्हाला सहसा बोलावत नाहीत. लोकांना भीती वाटते आमच्यामागे अतिरेकी येतील, आम्हाला मारतील. आम्ही आमच्या गावी गेलो तरी हॉटेलमध्ये थांबावं लागतं. आम्हाला घरी थांबू देत नाहीत आता कुठे आम्हाला समाजामध्ये आणि आमचे नातेवाईकांमध्ये आम्ही जाऊ येऊ शकतो आणि ते देखील आम्हाला आता त्यांच्या कार्यक्रमात पण बोलतात मात्र गेल्या अकरा वर्षापासून आमच्याशी सर्व नातलगांनी संबंध तोडले होते हेदेखील देविकाने बोलतांनी सांगितले.

IPS बनण्याचे स्वप्न
देविकाला साक्ष दिल्यानंतर शिक्षण देखील घेता येत नव्हतं तिला कुणीही शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला देखील तयार नव्हतं त्यावेळी तिच्या पाठीशी एक विद्यार्थी संघटना उभी राहिली आणि देविकाला अखिल आपले स्वप्न पूर्ण करण्याकरिता शाळेचे दरवाजे उघडण्यात आल आज तरीदेखील देविका खंबीरपणे उभी आहे, अभ्यास करते आहे आणि नवी स्वप्नंसुद्धा पाहते आहे. मला शिकून IPS ऑफिसर बनायचं आहे. कसाबसारख्या अतिरेक्यांना संपवायचं आहे असे ती सांगते. 26/11च्या हल्ल्यामागे दोषी असलेल्या सर्वांनाच शिक्षा मिळेल अशी तिला आशा वाटते. म्हणूनच तिला आपली जखम आणि तो दिवस विसरायचा नाही. आम्ही विसरलो तर याचा अर्थ होईल, की मी अतिरेक्यांना माफ केलं आहे. पण मी त्यांना माफ करू शकत नाही, जिवंत असेपर्यंत नाही. असे देविकाने म्हटले आहे.

पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला एकदा भेटायचे इच्छा असल्याची देविकाचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. पंतप्रधान मोदी हे एक मेल केला तरी लोकांना त्याचे उत्तर देतात. मी पंतप्रधानांना ट्विटरवर मेसेज पाठवला. मात्र, तरीही काही रिप्लाय आला नसल्याचे देविकाने सांगितले. त्यांना एकदा भेटण्याची इच्छा आहे तिने व्यक्त केली आहे.

हेही वाचा - 26/11 Attack : काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते; मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकात मनमोहन सरकारवर टीका

मुंबई - 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान (26/11 Mumbai terrorist attack) देविकाच्या पायाला गोळी लागली होती. ही जखम मला सतत दिसत राहते जाणवत राहते. मला तो दिवसही अजून आठवतो. मी कधी मरेपर्यंत विसरू शकणार नाही असे देविका रोटावन सांगितले. 26 /11 ला आज 13 वर्ष होऊन सुद्धा तो दिवस मी विसरू शकत नाही आज देखील माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते.

प्रतिक्रिया

13 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री दहा हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेलं कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नरिमन हाऊस या ज्यू सेंटरवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर साठ तास चाललेल्या चकमकीत 174 जणांना प्राण गमवावे लागले होते. सगळं जगच त्या हल्ल्यानं हादरून गेलं होतं.

पायाला लागलेली गोळी
देविका तेव्हा फक्त नऊ वर्षांची होती. वडील नटवरलाल रोटावन आणि भाऊ जयेशसोबत ती CSMT वरून पुण्याची ट्रेन पकडणार होती. तेवढ्यातच, रात्री साडे नऊच्या सुमारास अजमल कसाब आणि इस्माईल खान CSMT वर दाखल झाले होते. त्यांच्या हाती मशीनगन होत्या. अचानक गोळीबार सुरू झाला आणि देविकाचं जगच बदललं. गोळी झाडल्याचा आवाज आला. सगळे इकडे तिकडे पळू लागले, पळताना एकमेकांवर पडत होते. आम्ही पण तिथून पळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कसाबनं झाडलेली गोळी माझ्या पायात लागली. मी खाली पडले बेशुद्ध झाले. देविका सांगत होती. 13 वर्षांनंतरही तो क्षण देविकाच्या अंगावर काटा आणतो त्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये देविकावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. आणि ती पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. इतकंच नाही तर देविकानं धीर एकवटून कोर्टात कसाब विरोधात साक्षही दिली.

धैर्य एकवटून साक्ष
26/11च्या हल्ल्यात (26/11 Mumbai terrorist attack) जिवंत अटक झालेला अजमल कसाब एकमेव दहशतवादी होता. त्याच्याविरूद्ध साक्ष देणारी, कोर्टात त्याची ओळख पटवून देणारी देविका ही सर्वांत लहान साक्षीदार होती. कोर्टात साक्ष देण्याच्या निर्णयावर देविका आणि तिचे वडील अगदी ठाम होते. देविका पुढे सांगते जेव्हा गोळी लागली तेव्हाच माझं लहानपण हरवलं. पण असंही वाटलं, ठीक आहे, मी देशासाठी उभी राहू शकले. मीडियानं आणि जनतेनं देविकानं त्यावेळी दाखवलेल्या धैर्याचं कौतुक केलं. खटल्याचा निकाल लागला आणि कसाब फासावरही लटकला. पण साक्ष देणाऱ्या देविकाचं जगणं आणखी कठीण बनलं.

हेही वाचा - st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव

कसाबविरुध्द दिली साक्ष
अतिरेकी तिच्या मागावर येतील, या भीतीनं समाजातील अनेकांनी देविका आणि तिच्या कुटुंबीयांपासून चार हात लांब राहणं पसंत केलं. मी अतिरेक्याविरोधात साक्ष दिली होती. कोणी मला कसाबची मुलगीच म्हणालं लोकांनी काय काय नावं ठेवली हे देविका सांगत होती. देविकाच्या कुटुंबीयांना घरही बदलावं लागलं. सध्या ती आपले वडील आणि भावासोबत वांद्रे येथील सुभाषनगरात एका बैठ्या चाळीतील छोट्या घरात राहते.

नातलगांनी संबंध तोडले
रोटावन परिवार मूळचा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सुमेरपूरचा. गावच्या नातलगांनीही देविकाच्या कुटुंबीयांना दूर केलं आहे. काही समारंभ असेल, लग्न असेल तर आम्हाला सहसा बोलावत नाहीत. लोकांना भीती वाटते आमच्यामागे अतिरेकी येतील, आम्हाला मारतील. आम्ही आमच्या गावी गेलो तरी हॉटेलमध्ये थांबावं लागतं. आम्हाला घरी थांबू देत नाहीत आता कुठे आम्हाला समाजामध्ये आणि आमचे नातेवाईकांमध्ये आम्ही जाऊ येऊ शकतो आणि ते देखील आम्हाला आता त्यांच्या कार्यक्रमात पण बोलतात मात्र गेल्या अकरा वर्षापासून आमच्याशी सर्व नातलगांनी संबंध तोडले होते हेदेखील देविकाने बोलतांनी सांगितले.

IPS बनण्याचे स्वप्न
देविकाला साक्ष दिल्यानंतर शिक्षण देखील घेता येत नव्हतं तिला कुणीही शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला देखील तयार नव्हतं त्यावेळी तिच्या पाठीशी एक विद्यार्थी संघटना उभी राहिली आणि देविकाला अखिल आपले स्वप्न पूर्ण करण्याकरिता शाळेचे दरवाजे उघडण्यात आल आज तरीदेखील देविका खंबीरपणे उभी आहे, अभ्यास करते आहे आणि नवी स्वप्नंसुद्धा पाहते आहे. मला शिकून IPS ऑफिसर बनायचं आहे. कसाबसारख्या अतिरेक्यांना संपवायचं आहे असे ती सांगते. 26/11च्या हल्ल्यामागे दोषी असलेल्या सर्वांनाच शिक्षा मिळेल अशी तिला आशा वाटते. म्हणूनच तिला आपली जखम आणि तो दिवस विसरायचा नाही. आम्ही विसरलो तर याचा अर्थ होईल, की मी अतिरेक्यांना माफ केलं आहे. पण मी त्यांना माफ करू शकत नाही, जिवंत असेपर्यंत नाही. असे देविकाने म्हटले आहे.

पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला एकदा भेटायचे इच्छा असल्याची देविकाचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. पंतप्रधान मोदी हे एक मेल केला तरी लोकांना त्याचे उत्तर देतात. मी पंतप्रधानांना ट्विटरवर मेसेज पाठवला. मात्र, तरीही काही रिप्लाय आला नसल्याचे देविकाने सांगितले. त्यांना एकदा भेटण्याची इच्छा आहे तिने व्यक्त केली आहे.

हेही वाचा - 26/11 Attack : काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते; मनीष तिवारींच्या नवीन पुस्तकात मनमोहन सरकारवर टीका

Last Updated : Nov 26, 2021, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.