ETV Bharat / city

'महा' विधानसभा निवडणूक 2019 : प्रचाराची धुळवड अन् राजकारण

author img

By

Published : Oct 20, 2019, 5:17 PM IST

गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचे धुमशान सुरू होते. बंडखोरी, नाराजी, आरोप - प्रत्यारोप, सभा, र‌ॅली, भाषणे यांच्या धुळवडीनंतर आता खरी लढाई जनतेच्या दरबारात गेली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

मुंबई - सोमवारी महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी असेल. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली होती. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला, दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली होती. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच अनेक ठिकाणी सभांचा धुराळा उडाला होता. त्यात सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांचाही समावेश होता.

हेही वाचा... महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

दिग्गजांच्या सभांचा धुमाकुळ

सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची रणधुमाळी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी दिवस-रात्र मेहनत करुन प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठिकठिकाणच्या उमेदवारांसाठी सभांचा झंझावात पाहायला मिळाला आहे. यावेळी त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर, प्रबळ विरोधी पक्षनेत्यासाठी मतदान करा असा वेगळाच पॅटर्न त्यांनी अवलंबला. महिनाभर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजुला पडलेत.

हेही वाचा... प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! सभा, रॅली, पदयात्रेने होणार समारोप

युती झाली मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी

निवडणूक घोषीत झाल्यानंतर सुरूवातील सर्वात जास्त चर्चा ही युती होणार की नाही याचीच झाली. अखेरीस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणाला युतीचं गणीत समोर आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात 124 जागेवर शिवसेना आणि 164 जागेवर भाजपने आपले उमेदवार उभे केले. मात्र युतीच्या घोषणेला विरोध झाल्याने सेना भाजपला इनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ कणकवलीत भाजपमध्ये गेलेल्या नितेश राणे विरोधात शिवसेने आपला अधिकृत उमेदवार दिला आहे. असा अनेक ठिकाणी युतीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र संपूर्ण प्रचारा दरम्याण शिवसेना आणि भाजपने युती सरकारसाठी मते मागितल्याने युतीला याचा फायदा होऊ शकतो.

आघाडीचं ठरलं मात्र अनेक ठिकाणी बिघाडी

एकीकडे युतीच्या बाबत साशंकता असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्टरवादीने आघाडीचा फॉर्म्युला लवकर जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीला आघाडीतील अनेक पक्षांनी जागावाटपा बाबत कुरकुर केली, नंतर मात्र प्रचारात सर्व एकत्र आल्याचे दिसून आले. मात्र अनेक ठिकाणी आघाडीच्या मित्र पक्षांतही बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. तसेच प्रचारा दरम्यान काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी सक्रीय असलेली दिसली. शरद पवारांनी पायाला भिंगरी लावून अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

हेही वाचा... EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

मनसे, वंचित आणि एमआयएमचे एकला चलो रे..

कोणाचीही टाळी न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम पक्षांनी आपले उमेदवार देत, प्रचारात रंगत आणली. प्रामुख्याने वंचितने बहुसंख्य ठिकाणी उमेदवार देत निवडणूकीत रंगत भरली आहे. तर राज ठाकरेंनीही विरोधी पक्षासाठी मकतदान मागत एक नवा डाव यावेळी टाकलेला दिसत आहे.

बंडखोरांमुळे अनेक मतदारसंघांचे भविष्य ठरले जाणार

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी 75 मतदारसंघांचे भविष्य हे बंडखोर उमेदवारांच्या हातात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या आकडेवारीतून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या पक्षांनाच याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक बंडखोरी झाली ती भाजपमध्ये. राज्यात भाजपच्या 38 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या 23 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनुक्रमे 9, 4 इतक्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. यामुळे नेत्यांची भाऊगर्दी झालेल्या या पक्षात युतीनंतर, उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचा रस्ता पकडला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या अधिक नसली तरी, काही मतदारसंघात त्यांनाही या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर'

3237 उमेदवार अन् 8 कोटी मतदार

सोमवारी राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार मतदान करतील. यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, अपंग लोकांचा समावेश आहे. एकूण मतदारांपैकी 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750 मतदार पुरुष आहेत, 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 मतदार महिला आहेत, तर 2 हजार 634 मतदार तृतीयपंथी आहेत. यापैकी 3 लाख 96 हजार मतदार अपंग आहेत.

मुंबई - सोमवारी महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर गुरूवारी 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी असेल. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली होती. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला, दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली होती. विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच अनेक ठिकाणी सभांचा धुराळा उडाला होता. त्यात सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांचाही समावेश होता.

हेही वाचा... महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

दिग्गजांच्या सभांचा धुमाकुळ

सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची रणधुमाळी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी दिवस-रात्र मेहनत करुन प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आदींनीही आपल्या प्रचार भाषणांतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ठिकठिकाणच्या उमेदवारांसाठी सभांचा झंझावात पाहायला मिळाला आहे. यावेळी त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर, प्रबळ विरोधी पक्षनेत्यासाठी मतदान करा असा वेगळाच पॅटर्न त्यांनी अवलंबला. महिनाभर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजुला पडलेत.

हेही वाचा... प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! सभा, रॅली, पदयात्रेने होणार समारोप

युती झाली मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी

निवडणूक घोषीत झाल्यानंतर सुरूवातील सर्वात जास्त चर्चा ही युती होणार की नाही याचीच झाली. अखेरीस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणाला युतीचं गणीत समोर आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात 124 जागेवर शिवसेना आणि 164 जागेवर भाजपने आपले उमेदवार उभे केले. मात्र युतीच्या घोषणेला विरोध झाल्याने सेना भाजपला इनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ कणकवलीत भाजपमध्ये गेलेल्या नितेश राणे विरोधात शिवसेने आपला अधिकृत उमेदवार दिला आहे. असा अनेक ठिकाणी युतीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र संपूर्ण प्रचारा दरम्याण शिवसेना आणि भाजपने युती सरकारसाठी मते मागितल्याने युतीला याचा फायदा होऊ शकतो.

आघाडीचं ठरलं मात्र अनेक ठिकाणी बिघाडी

एकीकडे युतीच्या बाबत साशंकता असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्टरवादीने आघाडीचा फॉर्म्युला लवकर जाहीर करत प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीला आघाडीतील अनेक पक्षांनी जागावाटपा बाबत कुरकुर केली, नंतर मात्र प्रचारात सर्व एकत्र आल्याचे दिसून आले. मात्र अनेक ठिकाणी आघाडीच्या मित्र पक्षांतही बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. तसेच प्रचारा दरम्यान काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी सक्रीय असलेली दिसली. शरद पवारांनी पायाला भिंगरी लावून अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

हेही वाचा... EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

मनसे, वंचित आणि एमआयएमचे एकला चलो रे..

कोणाचीही टाळी न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम पक्षांनी आपले उमेदवार देत, प्रचारात रंगत आणली. प्रामुख्याने वंचितने बहुसंख्य ठिकाणी उमेदवार देत निवडणूकीत रंगत भरली आहे. तर राज ठाकरेंनीही विरोधी पक्षासाठी मकतदान मागत एक नवा डाव यावेळी टाकलेला दिसत आहे.

बंडखोरांमुळे अनेक मतदारसंघांचे भविष्य ठरले जाणार

महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी 75 मतदारसंघांचे भविष्य हे बंडखोर उमेदवारांच्या हातात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या आकडेवारीतून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या पक्षांनाच याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक बंडखोरी झाली ती भाजपमध्ये. राज्यात भाजपच्या 38 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्या खालोखाल शिवसेनेच्या 23 उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनुक्रमे 9, 4 इतक्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते. यामुळे नेत्यांची भाऊगर्दी झालेल्या या पक्षात युतीनंतर, उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचा रस्ता पकडला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या अधिक नसली तरी, काही मतदारसंघात त्यांनाही या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा... राज्यातील '75' मतदारसंघांचे भविष्य ठरवणार 'बंडखोर'

3237 उमेदवार अन् 8 कोटी मतदार

सोमवारी राज्यातील 3237 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार मतदान करतील. यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, अपंग लोकांचा समावेश आहे. एकूण मतदारांपैकी 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750 मतदार पुरुष आहेत, 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 मतदार महिला आहेत, तर 2 हजार 634 मतदार तृतीयपंथी आहेत. यापैकी 3 लाख 96 हजार मतदार अपंग आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.