ETV Bharat / city

'आरे'प्रकरणी पर्यावरणप्रेमींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; कारशेड आता दुसरीकडे हलवण्याची प्रतीक्षा

काल झालेल्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे व ही स्थगिती असेपर्यंत झाडाचे एक पानही कापू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

author img

By

Published : Nov 30, 2019, 4:56 PM IST

AAREY CAR SHADE
पर्यावरणप्रेमी

मुंबई- राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. यामुळे मेट्रो कारशेडचे काम थांबले आहे. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

आरे प्रकरणाला स्थगिती मिळाल्यानंतर पर्यावरणप्रेमींंच्या प्रतिक्रिया घेताना 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी


मेट्रो कारशेड आरे वसाहतीमध्ये होऊ नये यासाठी मोठा संघर्ष दोन महिन्यांपूर्वी उभा राहिला होता. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कोणाला खबर लागण्याआधीच रात्रीच्या रात्री मेट्रो प्रशासनाने हजारो झाडे कापली होती. या ठिकाणी 144 कलम सुद्धा लागू करण्यात आले होते. विरोध करणाऱ्या 29 जणांना अटक केली गेली होती. आम्ही सरकारमध्ये आल्यास हे कारशेड होऊ देणार नाही, असे शिवसेनेने सांगितले होते. दिलेला शब्द हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. काल झालेल्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे व ही स्थगिती असेपर्यंत झाडाचे एक पानही कापू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमींनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. परंतु, जर हा निर्णय लवकर झाला असता तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती.


खूप चांगला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 2016पासून आम्ही या कारशेडच्या विरोधात आंदोलन करत आहोत. आमचा मेट्रोला विरोध नाही फक्त पर्यावरणाची हानी होऊ नये ही आमची मागणी आहे. तसेच जे गुन्हे आंदोलकावर दाखल केले आहेत ते पाठी घ्यावे अशी अशी आमची मागणी आहे. महानगरपालिका आणि वनखाते आरे येथील पिकनिक पाँईंट समोर 200 एकर वरती इंटरनॅशनल प्राणी संग्रहालय तयार करणार आहे, त्याला पण स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे असे काँग्रेसचे सुनील कुंभारे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, निर्णय घ्यायला उशीर झाला जर अगोदरच स्थगिती दिली असती तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती. कारशेड दुसरीकडे हलवावे, अशी आमची मागणी कायम आहे असे पर्यावरण प्रेमीनी सांगितले.

मुंबई- राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. यामुळे मेट्रो कारशेडचे काम थांबले आहे. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

आरे प्रकरणाला स्थगिती मिळाल्यानंतर पर्यावरणप्रेमींंच्या प्रतिक्रिया घेताना 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी


मेट्रो कारशेड आरे वसाहतीमध्ये होऊ नये यासाठी मोठा संघर्ष दोन महिन्यांपूर्वी उभा राहिला होता. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कोणाला खबर लागण्याआधीच रात्रीच्या रात्री मेट्रो प्रशासनाने हजारो झाडे कापली होती. या ठिकाणी 144 कलम सुद्धा लागू करण्यात आले होते. विरोध करणाऱ्या 29 जणांना अटक केली गेली होती. आम्ही सरकारमध्ये आल्यास हे कारशेड होऊ देणार नाही, असे शिवसेनेने सांगितले होते. दिलेला शब्द हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. काल झालेल्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आहे व ही स्थगिती असेपर्यंत झाडाचे एक पानही कापू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमींनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. परंतु, जर हा निर्णय लवकर झाला असता तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती.


खूप चांगला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 2016पासून आम्ही या कारशेडच्या विरोधात आंदोलन करत आहोत. आमचा मेट्रोला विरोध नाही फक्त पर्यावरणाची हानी होऊ नये ही आमची मागणी आहे. तसेच जे गुन्हे आंदोलकावर दाखल केले आहेत ते पाठी घ्यावे अशी अशी आमची मागणी आहे. महानगरपालिका आणि वनखाते आरे येथील पिकनिक पाँईंट समोर 200 एकर वरती इंटरनॅशनल प्राणी संग्रहालय तयार करणार आहे, त्याला पण स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे असे काँग्रेसचे सुनील कुंभारे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, निर्णय घ्यायला उशीर झाला जर अगोदरच स्थगिती दिली असती तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती. कारशेड दुसरीकडे हलवावे, अशी आमची मागणी कायम आहे असे पर्यावरण प्रेमीनी सांगितले.

Intro:मुंबई। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरेतील मेट्रो कार शेड ला स्थगिती दिली. यामुळे मेट्रो कार शेड चे काम थांबले आहे. या निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. पर्यावरणप्रेमींशी बातचीत केली आहे... आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...Body:मेट्रो कार शेड आरे वसाहतीमध्ये होऊ नये यासाठी मोठा संघर्ष दोन महिन्यापूर्वी उभा राहिला होता. न्यायालयाच्या निकाल आल्यानंतर कोणाला खबर लागण्याआधीच रात्रीच्या रात्री मेट्रो प्रशासनाने हजारो झाडे कापली होती याठिकाणी 144 कलम सुद्धा लागू केले गेले होते. विरोध करणाऱ्या 29 जणांना अटक केली गेली होती. आम्ही सरकारमध्ये आल्यास हे कारशेड होऊ देणार नाही, असे शिवसेनेने सांगितले होते. दिलेला शब्द हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला आहे. काल झालेल्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कार शेडला स्थगिती दिली आहे व ही स्थगिती असेपर्यंत झाडाचे एक पानही कापू देणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयानंतर पर्यावरण प्रेमींनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. परंतु जर हा निर्णय लवकर झाला असता तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती.

खूप चांगला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 2016 पासून आम्ही या कारशेडच्या विरोधात आंदोलन करत आहोत. आमचा मेट्रोला विरोध नाही फक्त पर्यावरणाचा हानी होऊ नये ही आमची मागणी आहे. तसेच जे गुन्हे आंदोलकावर दाखल केले आहेत ते पाठी घ्यावे अशी अशी आमची मागणी आहे. महानगरपालिका आणि वनखाते आरे येथील पिकनिक पॉईंट समोर 200 एकर वरती इंटरनॅशनल प्राणी संग्रहालय तयार करणार आहे, त्याला पण स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे असे काँग्रेसचे सुनील कुंभारे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र निर्णय घ्यायला उशीर झाला जर अगोदरच स्थगिती दिली असती तर हजारो झाडांची कत्तल झाली नसती. कारशेड दुसरीकडे हलवावे, अशी आमची मागणी कायम आहे असे पर्यावरण प्रेमीनी सांगितले.

बाईट

चैताली, पर्यावरण प्रेमी

श्याम भोईर, स्थानिक रहिवाशी

सुनील कुंभारे , स्थानिक कॉंग्रेस नेते
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.