ETV Bharat / city

BMC Shivsena Corporator : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुंबईतील शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ!

author img

By

Published : Jun 24, 2022, 6:55 PM IST

Updated : Jun 24, 2022, 7:11 PM IST

राज्यातील सत्ता गेल्यास त्याचा फटका शिवसेनेनला बसणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील ( Mumbai Municipal Corporation ) सत्ता जाऊ शकते, अशी शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. तर यावर शिवसेनेकडून ( BMC Shivsena Corporator ) बोलण्यास नकार देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ पाहायला मिळत आहे.

BMC
BMC

मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील सत्ता शिवसेनेच्या ताब्यातून जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ता गेल्यास त्याचा फटका शिवसेनेनला बसणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील ( Mumbai Municipal Corporation ) सत्ता जाऊ शकते, अशी शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. तर यावर शिवसेनेकडून ( BMC Shivsena Corporator ) बोलण्यास नकार देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पत्रकार

महापालिकेत शिवसेनेची सत्ता : मुंबई महानगरपालिकेचा ३९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. यासाठी महापालिकेवर सर्वच पक्षांना आपली सत्ता असावी असे वाटते. मुंबई महानगरपालिकेवर तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ सत्ता आहे. या कालावधीत भाजपा शिवसेनेचा मित्रपक्ष राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने वेगळी लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेतील महापौर पद शिवसेनेकडे राहावे यासाठी मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. तसेच अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे संख्याबळ ९७ इतके झाले होते. २०१७ मध्ये निवडणूक झालेल्या महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला असल्याने पालिकेवर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ९ ची वाढ करून २३६ प्रभाग केले आहेत. सर्वाधिक नगरसेवक ज्या पक्षाचे असतील त्यांचा महापौर पालिकेवर बसणार असून त्या पक्षाची सत्ता पालिकेत येईल.



शिवसेना - भाजपा वाद : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मित्र पक्ष भाजपाची सत्ता होती. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर दोन्ही पक्षांनी २०१७ ची निवडणूक वेगळी लढवली होती. २०१७ च्या निवडणुकीच्या आधीपासून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला होता. गेले पाच वर्षे मुंबई महापालिकेत हा आक्रमक पवित्रा ठेवला होता. गेल्या याचा वर्षात पालिकेतील अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत भाजपाने पालिका मुख्यालयात, महापौर कार्यालयासमोर अनेक आंदोलने केली आहेत.


राज्यात राजकीय भूकंप : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांच्यासोबत ४० हुन अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मुंबईमधील यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांचा सहभाग आहे. एकनाथ शिंदे भाजपासोबत जाणार आहेत. यामुळे या चार आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात त्याचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे येत्या पालिका निवडणुकीत संख्याबळ कमी होऊन शिवसेनेची सत्ता जाऊ शकते. राज्यात सत्ता असली तर शिवसेनेला महापालिकेतील सत्ता वाचवता येऊ शकते. अन्यथः शिवसेनेला पालिकेतील सत्ता सोडावी लागेल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी दिली. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. तर शिवसेनेच्या दुसऱ्या एक प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर आता प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे सांगितले.


शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या


वर्ष - नगरसेवकांची संख्या
१९९७ - १०३
२००२ - ९७
२००७ - ८४
२०१२ - ७५
२०१७ - ९७

हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर गेले २५ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील सत्ता शिवसेनेच्या ताब्यातून जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ता गेल्यास त्याचा फटका शिवसेनेनला बसणार असून त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील ( Mumbai Municipal Corporation ) सत्ता जाऊ शकते, अशी शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. तर यावर शिवसेनेकडून ( BMC Shivsena Corporator ) बोलण्यास नकार देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर शिवसेना नगरसेवकांमध्ये खळबळ पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पत्रकार

महापालिकेत शिवसेनेची सत्ता : मुंबई महानगरपालिकेचा ३९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. यासाठी महापालिकेवर सर्वच पक्षांना आपली सत्ता असावी असे वाटते. मुंबई महानगरपालिकेवर तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ सत्ता आहे. या कालावधीत भाजपा शिवसेनेचा मित्रपक्ष राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने वेगळी लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेतील महापौर पद शिवसेनेकडे राहावे यासाठी मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. तसेच अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे संख्याबळ ९७ इतके झाले होते. २०१७ मध्ये निवडणूक झालेल्या महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला असल्याने पालिकेवर आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग होते. त्यात उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने ९ ची वाढ करून २३६ प्रभाग केले आहेत. सर्वाधिक नगरसेवक ज्या पक्षाचे असतील त्यांचा महापौर पालिकेवर बसणार असून त्या पक्षाची सत्ता पालिकेत येईल.



शिवसेना - भाजपा वाद : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि मित्र पक्ष भाजपाची सत्ता होती. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यावर दोन्ही पक्षांनी २०१७ ची निवडणूक वेगळी लढवली होती. २०१७ च्या निवडणुकीच्या आधीपासून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला होता. गेले पाच वर्षे मुंबई महापालिकेत हा आक्रमक पवित्रा ठेवला होता. गेल्या याचा वर्षात पालिकेतील अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत भाजपाने पालिका मुख्यालयात, महापौर कार्यालयासमोर अनेक आंदोलने केली आहेत.


राज्यात राजकीय भूकंप : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांच्यासोबत ४० हुन अधिक आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मुंबईमधील यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांचा सहभाग आहे. एकनाथ शिंदे भाजपासोबत जाणार आहेत. यामुळे या चार आमदारांच्या विधानसभा क्षेत्रात त्याचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे येत्या पालिका निवडणुकीत संख्याबळ कमी होऊन शिवसेनेची सत्ता जाऊ शकते. राज्यात सत्ता असली तर शिवसेनेला महापालिकेतील सत्ता वाचवता येऊ शकते. अन्यथः शिवसेनेला पालिकेतील सत्ता सोडावी लागेल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनिल शिंदे यांनी दिली. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. तर शिवसेनेच्या दुसऱ्या एक प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर आता प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे सांगितले.


शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या


वर्ष - नगरसेवकांची संख्या
१९९७ - १०३
२००२ - ९७
२००७ - ८४
२०१२ - ७५
२०१७ - ९७

हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

Last Updated : Jun 24, 2022, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.