ETV Bharat / city

Cyrus Mistry Funeral Today : सायरस मिस्त्री अनंतात विलीन; वरळीत झाले अंत्यसंस्कार

author img

By

Published : Sep 6, 2022, 7:13 AM IST

Updated : Sep 6, 2022, 12:56 PM IST

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहेत. सायरस यांच्यावर आज मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कसा झाला मृत्य? : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते.

कारची फॉरेन्सिक तपासणी : अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय आहे हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि त्याच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे झाली याचा शोध घेतला जात आहे.

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात आहेत. सायरस यांच्यावर आज मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कसा झाला मृत्य? : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते.

कारची फॉरेन्सिक तपासणी : अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय आहे हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि त्याच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे झाली याचा शोध घेतला जात आहे.

Last Updated : Sep 6, 2022, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.