ETV Bharat / city

Cyrus Mistry accident मर्सिडीज कारच्या तपासणीसाठी हाँगकाँगमधील तज्ज्ञांचे पथक मुंबईत दाखल

author img

By

Published : Sep 12, 2022, 10:27 PM IST

Updated : Sep 14, 2022, 9:47 AM IST

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ( Palghar SP Balasaheb Patil ) सांगितले की, तीन तज्ञांचे पथक हाँगकाँगहून मुंबईत आले आहे. ते मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणीचे काम सुरू करतील. या टीममधील सदस्य त्यांच्या क्षेत्रातील तांत्रिक तज्ञ आहेत.

Cyrus Mistry accident
सायरस मिस्त्री अपघात

मुंबई- गेल्या आठवड्यात टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र ठार झालेल्या कारची पाहणी करण्यासाठी हाँगकाँगमधील मर्सिडीज-बेंझ अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी मुंबईत आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, तीन तज्ञांचे पथक हाँगकाँगहून मुंबईत आले आहे. ते मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणीचे काम सुरू करतील. या टीममधील सदस्य त्यांच्या क्षेत्रातील तांत्रिक तज्ञ आहेत. पुढे ते म्हणाले की, रस्ता अपघातात सापडलेली कार ठाण्यातील मर्सिडीज बेंझ युनिटमध्ये ठेवण्यात आली आहे. ही टीम मर्सिडीज बेंझ कंपनीला अहवाल सादर करणार आहे. कार अपघाताबाबतच्या सर्व निष्कर्षांसह अंतिम अहवाल कार कंपनी दोन दिवसांनी पोलिसांना सादर करेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सायरस मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे 4 सप्टेंबर रोजी मुंबईच्या शेजारच्या पालघर जिल्ह्यातील पुलावरील रोड डिव्हायडरला त्यांच्या मर्सिडीज कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील इतर दोन प्रवासी, अनाहिता पांडोळे (55) आणि त्यांचे पती डॅरियस पांडोळे (60) जखमी झाले. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मिस्त्री आणि इतर तिघांना घेऊन जाणाऱ्या मर्सिडीज कारचे ब्रेक क्रॅश होण्याच्या पाच सेकंद आधी लावले होते, असे लक्झरी कार कंपनीने गेल्या आठवड्यात पालघर पोलिसांना सादर केलेल्या अंतरिम अहवालात म्हटले होते. प्रथमदर्शनी तपासात ड्रायव्हरच्या (अनाहिता पांडोळे) भरधाव वेगामुळे कार अपघात झाल्याचे दिसून आले.

मर्सिडीझ बेंझ कंपनी उलगडणार गुढसायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताचे गूढ आता मर्सिडीच बेंझ कंपनी उलगडणार आहे. त्यासाठी कंपनीने या कारमधील महत्वाची डाटा चिप मिळवली आहे (decrypted data of chip). विमानामध्ये ज्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स असतो. त्याप्रमाणेच या ( decrypted data of chip ) चिपचे कार्य चालते अशी माहिती मिळत आहे. मर्सिडीज-बेंझच्या एका टीमने, ज्याची कार रोड डिव्हायडरवर आदळून उद्योगपती सायरस मिस्त्री आणि अन्य एक प्रवासी ठार झाले, त्यांनी वाहनाचा डेटा गोळा केला आहे ( Cyrus Mistry car accident ). हा डाटा असलेली चिप पुढील ( Mercedes will reveal the mystery ).विश्लेषणासाठी डिक्रिप्ट केला जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कारच्या टायरचा दाब आणि ब्रेक फ्लुइडची पातळी यासारख्या इतर तपशीलांचीही चौकशी केली जाईल, असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी यापूर्वी सांगितले.

एनक्रिप्टेड डेटा गोळा केलामर्सिडीज-बेंझ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अपघातग्रस्त कारमधील एनक्रिप्टेड डेटा गोळा केला. डेटाचे विश्लेषण केले जाईल, डिक्रिप्ट केले जाईल आणि पुढील तपासासाठी पोलिसांना त्याची माहिती दिली जाणार आहे, असे मोहिते म्हणाले. कमी ब्रेक फ्लुइडमुळे ब्रेक लाइनमध्ये हवा जाते. त्यामुळे ब्रेक सॉफ्ट होतात. यामुळे स्पॉंजी ब्रेक पेडल धोकादायक ठरू शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अपघात झाला तेव्हा आलिशान कारचा वेग प्रचंड होता सायरस मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे रविवारी दुपारी पालघर जिल्ह्यात रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन प्रवासी, अनाहिता पांडोळे (55), ज्या कार चालवत होत्या. तसेच त्यांचेपती डॅरियस पांडोले (60) जखमी झालेत. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे चौघेजण गुजरातहून मुंबईला जात असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता. अतिवेग आणि चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असे सांगतात. प्रथमदर्शनी, अपघात झाला तेव्हा आलिशान कारचा वेग प्रचंड होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई- गेल्या आठवड्यात टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र ठार झालेल्या कारची पाहणी करण्यासाठी हाँगकाँगमधील मर्सिडीज-बेंझ अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी मुंबईत आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, तीन तज्ञांचे पथक हाँगकाँगहून मुंबईत आले आहे. ते मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणीचे काम सुरू करतील. या टीममधील सदस्य त्यांच्या क्षेत्रातील तांत्रिक तज्ञ आहेत. पुढे ते म्हणाले की, रस्ता अपघातात सापडलेली कार ठाण्यातील मर्सिडीज बेंझ युनिटमध्ये ठेवण्यात आली आहे. ही टीम मर्सिडीज बेंझ कंपनीला अहवाल सादर करणार आहे. कार अपघाताबाबतच्या सर्व निष्कर्षांसह अंतिम अहवाल कार कंपनी दोन दिवसांनी पोलिसांना सादर करेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सायरस मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे 4 सप्टेंबर रोजी मुंबईच्या शेजारच्या पालघर जिल्ह्यातील पुलावरील रोड डिव्हायडरला त्यांच्या मर्सिडीज कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील इतर दोन प्रवासी, अनाहिता पांडोळे (55) आणि त्यांचे पती डॅरियस पांडोळे (60) जखमी झाले. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मिस्त्री आणि इतर तिघांना घेऊन जाणाऱ्या मर्सिडीज कारचे ब्रेक क्रॅश होण्याच्या पाच सेकंद आधी लावले होते, असे लक्झरी कार कंपनीने गेल्या आठवड्यात पालघर पोलिसांना सादर केलेल्या अंतरिम अहवालात म्हटले होते. प्रथमदर्शनी तपासात ड्रायव्हरच्या (अनाहिता पांडोळे) भरधाव वेगामुळे कार अपघात झाल्याचे दिसून आले.

मर्सिडीझ बेंझ कंपनी उलगडणार गुढसायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताचे गूढ आता मर्सिडीच बेंझ कंपनी उलगडणार आहे. त्यासाठी कंपनीने या कारमधील महत्वाची डाटा चिप मिळवली आहे (decrypted data of chip). विमानामध्ये ज्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स असतो. त्याप्रमाणेच या ( decrypted data of chip ) चिपचे कार्य चालते अशी माहिती मिळत आहे. मर्सिडीज-बेंझच्या एका टीमने, ज्याची कार रोड डिव्हायडरवर आदळून उद्योगपती सायरस मिस्त्री आणि अन्य एक प्रवासी ठार झाले, त्यांनी वाहनाचा डेटा गोळा केला आहे ( Cyrus Mistry car accident ). हा डाटा असलेली चिप पुढील ( Mercedes will reveal the mystery ).विश्लेषणासाठी डिक्रिप्ट केला जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कारच्या टायरचा दाब आणि ब्रेक फ्लुइडची पातळी यासारख्या इतर तपशीलांचीही चौकशी केली जाईल, असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी यापूर्वी सांगितले.

एनक्रिप्टेड डेटा गोळा केलामर्सिडीज-बेंझ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अपघातग्रस्त कारमधील एनक्रिप्टेड डेटा गोळा केला. डेटाचे विश्लेषण केले जाईल, डिक्रिप्ट केले जाईल आणि पुढील तपासासाठी पोलिसांना त्याची माहिती दिली जाणार आहे, असे मोहिते म्हणाले. कमी ब्रेक फ्लुइडमुळे ब्रेक लाइनमध्ये हवा जाते. त्यामुळे ब्रेक सॉफ्ट होतात. यामुळे स्पॉंजी ब्रेक पेडल धोकादायक ठरू शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अपघात झाला तेव्हा आलिशान कारचा वेग प्रचंड होता सायरस मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे रविवारी दुपारी पालघर जिल्ह्यात रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन प्रवासी, अनाहिता पांडोळे (55), ज्या कार चालवत होत्या. तसेच त्यांचेपती डॅरियस पांडोले (60) जखमी झालेत. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे चौघेजण गुजरातहून मुंबईला जात असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता. अतिवेग आणि चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असे सांगतात. प्रथमदर्शनी, अपघात झाला तेव्हा आलिशान कारचा वेग प्रचंड होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Last Updated : Sep 14, 2022, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.