मुंबई - प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकं दुखावले आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.