ETV Bharat / city

उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला; सचिन सावंतांचा इशारा

शिवसेनेने कितीही डरकाळ्या फोडल्या तरी म्याव-म्याव, असाच आवाज येत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

author img

By

Published : Apr 13, 2019, 9:40 PM IST

सचिन सावंत

मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खमंग ढोकळा खाऊन तुमचं मांजर झालं. कितीही डरकाळ्या फोडल्या तरी म्याव-म्याव, असाच आवाज येत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एवढेच नाही, तर उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला, असा इशाराही सावंतांनी ठाकरेंना दिला आहे.

सचिन सावंत


राहुल गांधींसारख्या नेभळट लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का ? कन्हैय्या, दाऊद यांच्यासारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचे कलम रद्द करायचे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे असेल, तर महायुतीला मतदान करा,असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.


यावेळी बोलताना सावंत म्हणाले, मोदी- शाहांच्या चरणी उद्धव ठाकरेंनी साष्टांग दंडवत घातले आहे. हा चेहरा आता लोकांना पटणार नाही. धर्मांध शक्तिविरोधात राहुल गांधी लढत आहेत. शिवसेनेचा खरा चेहरा जनताच उघडा करील, असेही सावंत यावेळी म्हणाले.

मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खमंग ढोकळा खाऊन तुमचं मांजर झालं. कितीही डरकाळ्या फोडल्या तरी म्याव-म्याव, असाच आवाज येत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एवढेच नाही, तर उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला, असा इशाराही सावंतांनी ठाकरेंना दिला आहे.

सचिन सावंत


राहुल गांधींसारख्या नेभळट लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का ? कन्हैय्या, दाऊद यांच्यासारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचे कलम रद्द करायचे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे असेल, तर महायुतीला मतदान करा,असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.


यावेळी बोलताना सावंत म्हणाले, मोदी- शाहांच्या चरणी उद्धव ठाकरेंनी साष्टांग दंडवत घातले आहे. हा चेहरा आता लोकांना पटणार नाही. धर्मांध शक्तिविरोधात राहुल गांधी लढत आहेत. शिवसेनेचा खरा चेहरा जनताच उघडा करील, असेही सावंत यावेळी म्हणाले.

Intro:Body:MH_UT_SS_Loksabha13.4.19

उध्दव आजोबा तोंड सांभाळून बोला: सचिन सावंत यांची टीका

मुंबई: नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा
खमण ढोकळा खावून तुमचं
मांजर झालयं. कितीही डरकाळ्या फोडल्या तरी म्याव- म्याव आवाज येत आहे, अशी
कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

राहुल गांधींसारख्या नेभळट लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का? कन्हैय्या, दाऊद यांसारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचं कलम रद्द करायचं आहे. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

मोदी- शहांच्या चरणी उध्दव ठाकरेंनी साष्टांग दंडवत घातले आहे. हा चेहरा आता लोकांना पटणार नाही.धर्मांध शक्तिविरोधात राहुल गांधी लढत आहे.शिवसेनेचा खरा चेहरा जनताच उघडा करील असं सावंत यांनी म्हटलं आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.