ETV Bharat / city

Ajit Pawar on Vande Mataram कार्यालयात फोनवर वंदे मातरम म्हणण्याच्या सरकारच्या निर्णयावर अजित पवारांचा टोला म्हणाले

author img

By

Published : Aug 15, 2022, 1:48 PM IST

राजशिष्टाचार मंत्री म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय Ajit Pawar on Vande Mataram over phone in office आणि शासकीय कार्यालयात आता फोनवर हॅलो नाहीतर वंदे मातरम असे म्हटले जाईल, असा निर्णय घेतला आहे. यावर अजित पवार यांनी Vande Mataram over phone in office टोला मारला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी फोन केले असता जय महाराष्ट्र असे म्हटले जात होते, प्रत्येक सरकार आपले निर्णय घेत असतात, असे ते म्हणाले.

Ajit Pawar on Vande Mataram over phone in office
वंदे मातरम फोनवर म्हणण्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई राज्यामध्ये आलेल्या एकनाथ शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाले. त्यानंतर खाते Ajit Pawar on Vande Mataram over phone in office वाटपही करण्यात आले. खाते वाटप झाल्यानंतर राजशिष्टाचार मंत्री म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय आणि शासकीय कार्यालयात आता फोनवर हॅलो नाहीतर वंदे मातरम असे म्हटले जाईल, असा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना अजित पवार Vande Mataram over phone in office म्हणाले की, प्रत्येक सरकारचे हे वेगळे विचार असतात. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी फोन केले असता जय महाराष्ट्र असे म्हटले जात होते, प्रत्येक सरकार आपले निर्णय घेत असतात.

प्रतिक्रिया देताना अजित पवार

हेही वाचा सत्तेत आल्यापासून गतिमान कारभार असून महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनवणार अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

त्यामुळे राजकारणात कोणीही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षी देशाच्या जनतेला संबोधताना राजकारणात सुरू असलेल्या घराणेशाहीवर बोट ठेवले. मात्र, देशांमध्ये लोकशाही आहे, त्यामुळे राजकारणात कोणीही येऊ शकतो. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एखाद्या तरुणाला राजकारणात यावेसे वाटत असेल तर लोकशाहीने तो त्यांना अधिकार दिला आहे. त्या व्यक्तीमध्ये जनतेतून निवडून यायची, जनतेची कामे करायची कुवत असेल तर नक्कीच राजकारणात ती व्यक्ती टिकू शकेल. मात्र, कुवत नसेल अशी व्यक्ती केवळ घराणेशाहीमुळे राजकारणात आली असेल तर त्याचा स्वीकार केला जात नाही. त्यामुळे, अशा ठिकाणी घराणेशाही म्हणता येईल. मात्र, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी राजकीय क्षेत्रात देशात आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. तसेच, देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराचे समर्थन कोणीही करणार नाही.

अजित पवारांनी केले ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत ध्वजारोहण केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. गेल्या 75 वर्ष कशामध्ये खूप काही साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, भविष्यात देशासमोर अजूनही मोठी आवाहने आहेत. सर्व समाजाला, जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन देशाला पुढे घेऊन जायला हव, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा Ambani family अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना फोनवरून धमकी मुंबई पोलिसांचा तपास सुरू

मुंबई राज्यामध्ये आलेल्या एकनाथ शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाले. त्यानंतर खाते Ajit Pawar on Vande Mataram over phone in office वाटपही करण्यात आले. खाते वाटप झाल्यानंतर राजशिष्टाचार मंत्री म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय आणि शासकीय कार्यालयात आता फोनवर हॅलो नाहीतर वंदे मातरम असे म्हटले जाईल, असा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना अजित पवार Vande Mataram over phone in office म्हणाले की, प्रत्येक सरकारचे हे वेगळे विचार असतात. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी फोन केले असता जय महाराष्ट्र असे म्हटले जात होते, प्रत्येक सरकार आपले निर्णय घेत असतात.

प्रतिक्रिया देताना अजित पवार

हेही वाचा सत्तेत आल्यापासून गतिमान कारभार असून महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनवणार अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

त्यामुळे राजकारणात कोणीही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षी देशाच्या जनतेला संबोधताना राजकारणात सुरू असलेल्या घराणेशाहीवर बोट ठेवले. मात्र, देशांमध्ये लोकशाही आहे, त्यामुळे राजकारणात कोणीही येऊ शकतो. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एखाद्या तरुणाला राजकारणात यावेसे वाटत असेल तर लोकशाहीने तो त्यांना अधिकार दिला आहे. त्या व्यक्तीमध्ये जनतेतून निवडून यायची, जनतेची कामे करायची कुवत असेल तर नक्कीच राजकारणात ती व्यक्ती टिकू शकेल. मात्र, कुवत नसेल अशी व्यक्ती केवळ घराणेशाहीमुळे राजकारणात आली असेल तर त्याचा स्वीकार केला जात नाही. त्यामुळे, अशा ठिकाणी घराणेशाही म्हणता येईल. मात्र, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी राजकीय क्षेत्रात देशात आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. तसेच, देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराचे समर्थन कोणीही करणार नाही.

अजित पवारांनी केले ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत ध्वजारोहण केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. गेल्या 75 वर्ष कशामध्ये खूप काही साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र, भविष्यात देशासमोर अजूनही मोठी आवाहने आहेत. सर्व समाजाला, जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन देशाला पुढे घेऊन जायला हव, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा Ambani family अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना फोनवरून धमकी मुंबई पोलिसांचा तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.