ETV Bharat / city

Indian Independence Day: 'हे' आहेत 26/11 चे खरे हिरो! वाचा सविस्तर

author img

By

Published : Aug 9, 2022, 4:20 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:28 PM IST

मुंबईच्या इतिहासातील २६ नोव्हेंबर २००८ हा एक काळा दिवस! संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. ( 26/11 terrorist attack on Mumbai ) या हल्ल्यात मुंबईसह महाराष्ट्राला वाचवणारे पोलीस अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले. वाचा सविस्तर कोण आहेत हे खरे हीरो-

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. या हल्ल्याचा प्रतिकार करताना देशाने अनेक लढवय्ये योद्धे गमावले. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्राने चार पोलीस अधिकारी असणारे रत्न गमावले.... कोण आहेत हे मुंबईला वाचवणारे लढवय्ये खरे हिरो? वाचा सविस्तर-

हेमंत करकरे
हेमंत करकरे

हेमंत करकरे - २६/११च्या त्या रात्री मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांना क्राइम ब्रांचने मुंबईवर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच हेमंत करकरे लगेचच घरातून निघाले. अजमल कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत होते. या गोळीबाराची माहिती मिळताच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तिथे पोहचले. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंची गाडी समोरुन दिसताच त्यांनी गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. करकरे यांनी छत्रपती टर्मिनल रेल्वे स्‍टेशनवर दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. यात तीन दहशतवादी मारले गेले. याच गोळीबारात अजमल कसाब जखमी झाला होता. पुढे करकरे यांच्या व्युहरचनेमुळे कसाबला पकडण्‍यात पोलिसांना यश आले. (2009)साली हेमंत करकरे यांना अशोक चक्राने सन्मानित करण्‍यात आले.

----------------------------------------------------------------------

तुकाराम ओंबाळे
तुकाराम ओंबाळे

तुकाराम ओंबाळे - मुंबई पोलीस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे ( Tukaram Ombale ) यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते. ओंबाळे हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा (२००८)मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबाळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबाळे यांना जाते. ओंबळे हे मुंबई पोलीसात साहाय्यक पोलीस निरीक्षक होते. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात त्यांची तुकडी सशस्त्र नव्हती. अत्यंत तुटपुंज्या शस्त्रांच्या मदतीने त्यांच्या तुकडीने दोनपैकी एका अतिरेक्यास ठार मारले. अजमल कसाब या अतिरेक्यास पकडताना तुकाराम ओंबाळे यांचा मृत्यू झाला. निःशस्त्र असलेल्या ओंबाळे यांनी जखमी अजमल कसाबची बंदूक धरून त्याला अटक करण्यास अधिकाऱ्यांना मदत केली. पण त्याचवेळी कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा अंत झाला. हल्ल्याच्या दिवशी तुकाराम ओंबाळे हे रात्रीच्या पहाऱ्यावर होते. २७ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री १२:३० वाजता त्यांनी घरी शेवटचा फोन केला होता. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच ते गिरगाव चौपाटीकडे धावले. चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला. कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबाळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबाळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबाळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर पकडले. तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबाळेंना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

--------------------------------------------------------

विजय साळसकर
विजय साळसकर

विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले विजय साळसकर ( Vijay Salaskar ) २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. कामा रुग्णालयाच्या बाहेर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ते पुढे गेले. मात्र, शत्रूएवढी त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. तरीही त्यांनी बहाद्दुरपणे दहशतवाद्यांशी दोन हात करीत मुकाबला केला. साळसकर यांच्यासह एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे यांच्यासह 14 पोलीस अधिकारी मारले गेले होते. साळसकर मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. साळसकर यांनी आपल्या पोलीस दलातील कारकिर्दीत 80 गुंडांना कंठस्नानी घातले होते. यातील 61 जणांना एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. आपल्या मृत्यूच्या आधी साळसकर यांनी (anty extortion cell)मध्ये ईंचार्ज होते. मुंबई हल्ल्यात त्यांना आलेल्या वीरमरणामुळे शहीद साळसकर यांना मरणोत्तर 26 जानेवरी 2009 रोजी अशोक च्रकाने सम्मानित करण्यात आले. 26/11 मुंबई हल्‍ल्‍यात शहीद झालेले एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांनी डॉन अरुण गवळी याच्‍या गँगचा सफाया केला होता. त्‍यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. पुढे 1997 मध्ये 15 दिवसातच गवळीचे टॉपचे तीन शूटर्स गणेश शंकर भोसले, सदा पावले व विजय तांडेल यांना एनकाउंटरमध्ये मारले होते. त्यानंतर गवळीचे साम्राज्य नष्ट करताना दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव, बंड्या आडीवडेकर यांना एनकाउंटरमध्ये मारले. दरम्‍यान, एक एनकाउंटर करताना एका 18 वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. माजी पोलीस आयुक्‍त राकेश मारिया यांच्‍या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते.

------------------------------------------------------------------------

आशोक कामटे
आशोक कामटे

आशोक कामटे - कामटे यांचा पुण्यातल्या जांभळीयेथे 23 फेब्रुवारी 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे 5 वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी 1985 मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तर पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टिफन्स कॉलेजमधून 1987 मध्ये पूर्ण केले. 1989 च्या बॅचमध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. ( Ashok Kamte ) कामटे यांची वेगळी ओळख म्हणजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी दशहतवाद्यांशी संवाद साधण्याचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच मुंबई हल्ला झाला तेव्हा त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले. मात्र, कामा हॉस्पिटलजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत कामटे, करकरे आणि साळस्कर हे तीन शूर अधिकारी आपण गमावले. विशेष म्हणजे त्यांनी पेरू मध्ये झालेल्या (Junior Power Lifting Championship)मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २६नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईतील गेटवे परिसरात काही दहशतवादी शिरले आणि त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. एके-४७ सारखी अद्ययावत शस्त्रे, मुंबईतील विविध ठिकाणांचे इत्थंभूत नकाशे, सॅटेलाइट फोन अशी अद्ययावत सामग्री या दहशतवाद्यांकडे होती. या गंभीर व धीरोदात्त प्रसंगाला शांत डोक्याने, प्रसंगावधान राखून ज्या पोलीस अधिकार्‍यांनी तोंड दिले, त्यांतील अशोक कामटे हे एक होते. मुंबईच्या मेट्रो परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अशोक कामटे हे हुतात्मा झाले.

हेही वाचा - बिहारमध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, भाजपसोबतची युतीही तुटली

मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. या हल्ल्याचा प्रतिकार करताना देशाने अनेक लढवय्ये योद्धे गमावले. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्राने चार पोलीस अधिकारी असणारे रत्न गमावले.... कोण आहेत हे मुंबईला वाचवणारे लढवय्ये खरे हिरो? वाचा सविस्तर-

हेमंत करकरे
हेमंत करकरे

हेमंत करकरे - २६/११च्या त्या रात्री मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांना क्राइम ब्रांचने मुंबईवर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच हेमंत करकरे लगेचच घरातून निघाले. अजमल कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत होते. या गोळीबाराची माहिती मिळताच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तिथे पोहचले. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंची गाडी समोरुन दिसताच त्यांनी गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. करकरे यांनी छत्रपती टर्मिनल रेल्वे स्‍टेशनवर दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. यात तीन दहशतवादी मारले गेले. याच गोळीबारात अजमल कसाब जखमी झाला होता. पुढे करकरे यांच्या व्युहरचनेमुळे कसाबला पकडण्‍यात पोलिसांना यश आले. (2009)साली हेमंत करकरे यांना अशोक चक्राने सन्मानित करण्‍यात आले.

----------------------------------------------------------------------

तुकाराम ओंबाळे
तुकाराम ओंबाळे

तुकाराम ओंबाळे - मुंबई पोलीस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे ( Tukaram Ombale ) यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते. ओंबाळे हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा (२००८)मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबाळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबाळे यांना जाते. ओंबळे हे मुंबई पोलीसात साहाय्यक पोलीस निरीक्षक होते. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात त्यांची तुकडी सशस्त्र नव्हती. अत्यंत तुटपुंज्या शस्त्रांच्या मदतीने त्यांच्या तुकडीने दोनपैकी एका अतिरेक्यास ठार मारले. अजमल कसाब या अतिरेक्यास पकडताना तुकाराम ओंबाळे यांचा मृत्यू झाला. निःशस्त्र असलेल्या ओंबाळे यांनी जखमी अजमल कसाबची बंदूक धरून त्याला अटक करण्यास अधिकाऱ्यांना मदत केली. पण त्याचवेळी कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा अंत झाला. हल्ल्याच्या दिवशी तुकाराम ओंबाळे हे रात्रीच्या पहाऱ्यावर होते. २७ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री १२:३० वाजता त्यांनी घरी शेवटचा फोन केला होता. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच ते गिरगाव चौपाटीकडे धावले. चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला. कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबाळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबाळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबाळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर पकडले. तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबाळेंना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.

--------------------------------------------------------

विजय साळसकर
विजय साळसकर

विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले विजय साळसकर ( Vijay Salaskar ) २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. कामा रुग्णालयाच्या बाहेर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ते पुढे गेले. मात्र, शत्रूएवढी त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. तरीही त्यांनी बहाद्दुरपणे दहशतवाद्यांशी दोन हात करीत मुकाबला केला. साळसकर यांच्यासह एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे यांच्यासह 14 पोलीस अधिकारी मारले गेले होते. साळसकर मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. साळसकर यांनी आपल्या पोलीस दलातील कारकिर्दीत 80 गुंडांना कंठस्नानी घातले होते. यातील 61 जणांना एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. आपल्या मृत्यूच्या आधी साळसकर यांनी (anty extortion cell)मध्ये ईंचार्ज होते. मुंबई हल्ल्यात त्यांना आलेल्या वीरमरणामुळे शहीद साळसकर यांना मरणोत्तर 26 जानेवरी 2009 रोजी अशोक च्रकाने सम्मानित करण्यात आले. 26/11 मुंबई हल्‍ल्‍यात शहीद झालेले एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांनी डॉन अरुण गवळी याच्‍या गँगचा सफाया केला होता. त्‍यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. पुढे 1997 मध्ये 15 दिवसातच गवळीचे टॉपचे तीन शूटर्स गणेश शंकर भोसले, सदा पावले व विजय तांडेल यांना एनकाउंटरमध्ये मारले होते. त्यानंतर गवळीचे साम्राज्य नष्ट करताना दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव, बंड्या आडीवडेकर यांना एनकाउंटरमध्ये मारले. दरम्‍यान, एक एनकाउंटर करताना एका 18 वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. माजी पोलीस आयुक्‍त राकेश मारिया यांच्‍या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते.

------------------------------------------------------------------------

आशोक कामटे
आशोक कामटे

आशोक कामटे - कामटे यांचा पुण्यातल्या जांभळीयेथे 23 फेब्रुवारी 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे 5 वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी 1985 मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तर पदव्युत्तर शिक्षण सेंट स्टिफन्स कॉलेजमधून 1987 मध्ये पूर्ण केले. 1989 च्या बॅचमध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. ( Ashok Kamte ) कामटे यांची वेगळी ओळख म्हणजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी दशहतवाद्यांशी संवाद साधण्याचे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळेच मुंबई हल्ला झाला तेव्हा त्यांना या मोहिमेवर पाठवण्यात आले. मात्र, कामा हॉस्पिटलजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत कामटे, करकरे आणि साळस्कर हे तीन शूर अधिकारी आपण गमावले. विशेष म्हणजे त्यांनी पेरू मध्ये झालेल्या (Junior Power Lifting Championship)मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २६नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईतील गेटवे परिसरात काही दहशतवादी शिरले आणि त्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. एके-४७ सारखी अद्ययावत शस्त्रे, मुंबईतील विविध ठिकाणांचे इत्थंभूत नकाशे, सॅटेलाइट फोन अशी अद्ययावत सामग्री या दहशतवाद्यांकडे होती. या गंभीर व धीरोदात्त प्रसंगाला शांत डोक्याने, प्रसंगावधान राखून ज्या पोलीस अधिकार्‍यांनी तोंड दिले, त्यांतील अशोक कामटे हे एक होते. मुंबईच्या मेट्रो परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अशोक कामटे हे हुतात्मा झाले.

हेही वाचा - बिहारमध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, भाजपसोबतची युतीही तुटली

Last Updated : Aug 9, 2022, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.