ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात शनिवारी २२५ रुग्णांचा मृत्यू तर ६ हजार ९५९ नवे रुग्ण

author img

By

Published : Jul 31, 2021, 10:10 PM IST

राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज (शनिवार) किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन २२५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७,४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज (शनिवार) किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन २२५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७,४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

७ हजार ४६७ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज (शनिवार) ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,९५९ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ७९१ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७६ हजार ७५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू संख्या वाढली -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -

राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलैला या महिन्यातील सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३४५
रायगड - १००
अहमदनगर - ९६५
पुणे - ५७३
पुणे पालिका - २९७
पिपरी चिंचवड पालिका - १७६
सोलापूर - ५२८
सातारा - ७९८
कोल्हापूर - ५०८
कोल्हापूर पालिका - १३१
सांगली - ६७४
सिंधुदुर्ग - १५३
रत्नागिरी - २४८
उस्मानाबाद - १८७
बीड - १९३

मुंबई - राज्यात गुरुवारी ७ हजार २४२ नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज (शनिवार) किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी १९० मृत्यू झाले होते त्यात वाढ होऊन शुक्रवारी २३१ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात किंचित घट होऊन २२५ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७,४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

७ हजार ४६७ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात आज (शनिवार) ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,९५९ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३२ हजार ७९१ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७६ हजार ७५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू संख्या वाढली -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -

राज्यात या महिन्यात १, ६ आणि १८ जुलैला कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलैला या महिन्यातील सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. त्यात आज किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३४५
रायगड - १००
अहमदनगर - ९६५
पुणे - ५७३
पुणे पालिका - २९७
पिपरी चिंचवड पालिका - १७६
सोलापूर - ५२८
सातारा - ७९८
कोल्हापूर - ५०८
कोल्हापूर पालिका - १३१
सांगली - ६७४
सिंधुदुर्ग - १५३
रत्नागिरी - २४८
उस्मानाबाद - १८७
बीड - १९३

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.