ETV Bharat / city

औरंगाबादेत काही तासांमध्ये चार कोरोना रुग्णांचा मृत्यू!

author img

By

Published : Feb 20, 2021, 7:18 AM IST

औरंगाबाद शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील 38 वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील पाचोड येथील 75 वर्षीय बाधित महिला रुग्णावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. शहरातील चिकलठाणा परिसरातील 65 वर्षे बाधित पुरुष रुग्णावर सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते.

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून काही तासांमध्ये चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांमध्ये रुग्ण दगावण्याची मंदावलेली गती पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1250 वर पोहोचली आहे.

काही तासांमध्ये झाला चौघांचा मृत्यू....

औरंगाबाद शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील 38 वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील पाचोड येथील 75 वर्षीय बाधित महिला रुग्णावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. शहरातील चिकलठाणा परिसरातील 65 वर्षे बाधित पुरुष रुग्णावर सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील करमाद तालुक्यातील वरुड काजी परिसरात राहणाऱ्या 52 वर्षे बाधित पुरुषावर चार फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या 976 वर पोहोचली आहे.

एकूण रुग्ण संख्या 48 हजार 135....

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट सुरू झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात 156 नवीन रुग्ण आढळून आले. त्यात मनपा हद्दीतील 133 आणि ग्रामीण भागातील 23 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 602 रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 135 इतकी झाली आहे. त्यात आत्तापर्यंत 46 हजार 287 करुणा मुक्त झाले आहेत.

हेही वाचा - आजपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा, 'स्टार' खेळाडूंकडे असणार लक्ष

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून काही तासांमध्ये चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांमध्ये रुग्ण दगावण्याची मंदावलेली गती पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1250 वर पोहोचली आहे.

काही तासांमध्ये झाला चौघांचा मृत्यू....

औरंगाबाद शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागातील 38 वर्षीय बाधित पुरुष रुग्णाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील पाचोड येथील 75 वर्षीय बाधित महिला रुग्णावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. शहरातील चिकलठाणा परिसरातील 65 वर्षे बाधित पुरुष रुग्णावर सहा फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील करमाद तालुक्यातील वरुड काजी परिसरात राहणाऱ्या 52 वर्षे बाधित पुरुषावर चार फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या 976 वर पोहोचली आहे.

एकूण रुग्ण संख्या 48 हजार 135....

ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट सुरू झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात 156 नवीन रुग्ण आढळून आले. त्यात मनपा हद्दीतील 133 आणि ग्रामीण भागातील 23 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 602 रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 135 इतकी झाली आहे. त्यात आत्तापर्यंत 46 हजार 287 करुणा मुक्त झाले आहेत.

हेही वाचा - आजपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा, 'स्टार' खेळाडूंकडे असणार लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.