ETV Bharat / city

Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray : दिशाहीन घोषणा करू नका, खा. जलील यांचे उद्धव ठाकरेंना सभेपूर्वी पत्र

author img

By

Published : Jun 6, 2022, 1:20 PM IST

औरंगाबादमध्ये ( Aurangabad ) बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल होईल अशा कोणत्याही घोषणा करू नये. तर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रलंबित असलेली मुलभूत सुविधेची कामे, प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही? यावर भाष्य करावे, असे आवाहन एमआयएम ( MIM ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना दीर्घ पत्र लिहीले आहे.

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये ( Aurangabad ) आठ जून रोजी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) धार्मिक मुद्दे, मंदिर-मशीद, हिंदू-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टीका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभूल करू नये. औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रलंबित असलेली मुलभूत सुविधेची कामे, प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही? याबाबत खुलासा करावा, अशी मागणी एमआयएम ( MIM ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.


दिशाहीन घोषणा नको - नविन दिशाहीन घोषणा करण्याऐवजी यापूर्वी घोषित केलेल्या विकासाच्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. यापूर्वी घोषित करण्यात आलेली विकास कामे, योजना व प्रकल्प पूर्ण होणार आहे किंवा नाही? होणार असले तर कधी होणार? त्याचा कालबध्द कार्यक्रम, विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्यास संबंधितांविरुध्द कारवाई होईल किंवा नाही? या विषयावरच खुलासा करावा. ही सर्व औरंगाबादकरांची मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री या नात्याने आपण औरंगाबादकरांच्या अपेक्षेचा मान राखून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे निदर्शनास आणून देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र
Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र
Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र


एमआयएम पक्षाने विचारलेले १५ प्रश्न -

  1. औरंगाबाद शहराला मुबलक व वेळेवर पाणी मिळणार आहे किंवा नाही ? पाणी मिळणार असेल तर अचूक महिना आपण जाहीर करावा.
  2. औरंगाबादला मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे परत आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती जाहीर करून क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी निधीचे नियोजन कसे करण्यात आले आहे, कृपया त्याची माहिती जाहीर करावी.
  3. औरंगाबाद येथे मंजूर झालेले एम्स् इन्सटिट्यूट (All India Institute of Medical Science - AIIMS) कधी पूर्ण होणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करावा.
  4. औरंगाबाद येथे मंजूर झालेले International Institute of Planing & Architecture कधी सुरू होणार आहे ? कृपया त्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
  5. औरंगाबाद विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरू होणार आहे किंवा नाही? कृपया याचा खुलासा करून आखाती देशाकरिता विमानसेवा कधी सुरू होणार आहे याची तारीख जाहीर करावी. तसेच हज व उमराह यात्रेकरुंसाठी औरंगाबादहून थेट विमानसेवा कधी सुरू होणार आहे? कृपया याचा सुध्दा खुलासा करावा.
  6. औद्योगिक परिसरात उद्योगांना चालना देण्यासाठी नव्याने सर्व सोयीसुविधायुक्त ऑरिक सिटी उभारण्यात आलेली आहे. त्याठिकाणी नविन कंपन्या येणार आहेत किंवा नाही? कृपया याचा खुलासा करावा. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला राज्याचे उद्योगमंत्री हेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. दावोस स्वित्झर्लंड येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी व उद्योगपती यांच्या सोबत चर्चा करुन पहिल्याच दिवशी विविध २३ हून जास्त देशातील कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. राज्यात हजारो कोटीची गुंतवणूक होऊन लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आला होते. त्यापैकी ऑरिक सिटी येथे किती कंपन्यांचे काम सुरू झाले ? किती गुंतवणूक झाली? तसेच किती युवकांना रोजगार मिळाला? विशेष म्हणजे दावोस येथून शहरासाठी काय आणले? कृपया त्याचा खुलासा करावा.
  7. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विकासाकरीता किती निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे अथवा नियोजित करण्यात आले आहे ? तसेच राज्यातील हजारो हेक्टर वक्फ मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी कृपया आपले धोरण जाहीर करावे.
  8. औरंगाबाद येथील सफारी पार्क पूर्ण होण्यासाठी आणखी किती दशके लागणार ? कृपया खुलासा करण्यात यावा.
  9. औरंगाबाद शहरात मागील ३० ते ४० वर्षात आरक्षित जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द कधी होणार? औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत शहर विकास आराखड्यातील हरित पट्ट्यात व आरक्षित जागेवर विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करण्याची परवानगी कधी मिळणार? कृपया जाहीर करण्यात यावा.
  10. सातारा-देवळाई भागात भुमिगत मलनि:सारणासाठी निधी कधी उपलब्ध होणार? परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा कधी मिळणार ? कृपया याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
  11. औरंगाबाद – शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणीवाढ लवकरच होणार असल्याचे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जाहीर केले होते. ते कधी होणार? कृपया जाहीर करावे.
  12. दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आपण भाषणात भाविकांसाठी शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते, ते कधी होणार? कृपया खुलासा करावा.
  13. औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या, औरंगाबाद महानरगपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर शासकीय विभाग व आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना शासन निर्णय, परिपत्रक व कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी व इतर योजनांचा लाभ मिळणार आहे किंवा नाही? याचा खुलासा करून कामगारांची आर्थिक पिळवणूक व कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय कार्यालय, विभाग व आस्थानांविरुद्ध केलेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी.
  14. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना निवासी वसाहती, व्यावसायिक प्रतिष्ठान, उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी नाल्यांतून उघड्यावरून वाहू नये म्हणुन ४६४ कोटीची निविदा मंजुर करुन भूमिगत गटार योजना राबविण्याचा संपुर्ण ठेका खिल्लारी कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आला होता. परंतु योजना पूर्ण न करता तत्कालीन सत्ताधारी यांच्यासोबत संगणमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. सबब प्रकरणी संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करुन नागरीकांचे पैसे हडपणाNयाकडून वसुली करण्यात आली आहे विंâवा नाही ? कृपया खुलासा करावा.
  15. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असताना शहर विकासाचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन शिवसेना – भाजपा सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार करण्यासाठी सर्वसाधारण सभेला अधिकार नसतांना आराखड्यात सर्व नियम डावलुन सोयीनुसार बदल केले. त्यामुळे संपुर्ण आराखडाच रद्द झाला होता. तत्कालीन शिवसेना व भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी आर्थिक तडजोड करुन केलेल्या महाभ्रष्टाचारामुळे शहराच्या विकासाला चांलगीच खीळ बसून शहराचे वाटोळे होऊन संपूर्ण शहर २० वर्ष मागे गेले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या हजारो कोटीच्या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व संबंधितांविरुध्द आपण कायदेशिर कारवाई करणार आहे किंवा नाही ? कृपया आपण याचा जाहीररित्या खुलासा करावा.

इम्तियाज जलील बोलका शंख - खा. इम्तियाज जलील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये बहुतांश मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहेत. खासदार म्हणून त्यांनी कधी मागणी केली का? आवाज उठवला का? असे प्रश्न शिवसेना प्रवक्ते आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केले. जलील म्हणजे बोलका शंख आहे, अशी टिका त्यांनी केली. तर शहरात लावलेल्या बॅनरवरून मनसे पक्षातर्फे राज ठाकरे यांच्या पोस्टरची कॉपी केली असा आरोप केला जातोय. मात्र, मनसे हाच आमची कॉपी आहे. त्यांची कॉपी आम्ही काय करणार अशी टीका सेना आ. अंबादास दानवे यांनी केली.


हेही वाचा - अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये ( Aurangabad ) आठ जून रोजी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) धार्मिक मुद्दे, मंदिर-मशीद, हिंदू-मुस्लिम, औरंगाबाद-संभाजीनगर नामांतरण आणि इतरांवर राजकीय टीका-टिपण्णीचे भाषण देऊन औरंगाबादकरांची विकासाच्या मुख्य मुद्यावरून दिशाभूल करू नये. औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रलंबित असलेली मुलभूत सुविधेची कामे, प्रकल्प व प्रस्ताव पूर्ण होणार आहे किंवा नाही? याबाबत खुलासा करावा, अशी मागणी एमआयएम ( MIM ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.


दिशाहीन घोषणा नको - नविन दिशाहीन घोषणा करण्याऐवजी यापूर्वी घोषित केलेल्या विकासाच्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. यापूर्वी घोषित करण्यात आलेली विकास कामे, योजना व प्रकल्प पूर्ण होणार आहे किंवा नाही? होणार असले तर कधी होणार? त्याचा कालबध्द कार्यक्रम, विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्यास संबंधितांविरुध्द कारवाई होईल किंवा नाही? या विषयावरच खुलासा करावा. ही सर्व औरंगाबादकरांची मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री या नात्याने आपण औरंगाबादकरांच्या अपेक्षेचा मान राखून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे निदर्शनास आणून देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र
Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र
Imtiaz Jalil letter to Uddhav Thackeray
इम्तियाज जलिल यांचे पत्र


एमआयएम पक्षाने विचारलेले १५ प्रश्न -

  1. औरंगाबाद शहराला मुबलक व वेळेवर पाणी मिळणार आहे किंवा नाही ? पाणी मिळणार असेल तर अचूक महिना आपण जाहीर करावा.
  2. औरंगाबादला मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे परत आणण्यासाठी आपण केलेले प्रयत्न व त्याची सद्यस्थिती जाहीर करून क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी निधीचे नियोजन कसे करण्यात आले आहे, कृपया त्याची माहिती जाहीर करावी.
  3. औरंगाबाद येथे मंजूर झालेले एम्स् इन्सटिट्यूट (All India Institute of Medical Science - AIIMS) कधी पूर्ण होणार आहे किंवा नाही ? कृपया याचा खुलासा करावा.
  4. औरंगाबाद येथे मंजूर झालेले International Institute of Planing & Architecture कधी सुरू होणार आहे ? कृपया त्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
  5. औरंगाबाद विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरू होणार आहे किंवा नाही? कृपया याचा खुलासा करून आखाती देशाकरिता विमानसेवा कधी सुरू होणार आहे याची तारीख जाहीर करावी. तसेच हज व उमराह यात्रेकरुंसाठी औरंगाबादहून थेट विमानसेवा कधी सुरू होणार आहे? कृपया याचा सुध्दा खुलासा करावा.
  6. औद्योगिक परिसरात उद्योगांना चालना देण्यासाठी नव्याने सर्व सोयीसुविधायुक्त ऑरिक सिटी उभारण्यात आलेली आहे. त्याठिकाणी नविन कंपन्या येणार आहेत किंवा नाही? कृपया याचा खुलासा करावा. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला राज्याचे उद्योगमंत्री हेच पालकमंत्री म्हणून लाभले आहे. दावोस स्वित्झर्लंड येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी व उद्योगपती यांच्या सोबत चर्चा करुन पहिल्याच दिवशी विविध २३ हून जास्त देशातील कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. राज्यात हजारो कोटीची गुंतवणूक होऊन लाखो बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आला होते. त्यापैकी ऑरिक सिटी येथे किती कंपन्यांचे काम सुरू झाले ? किती गुंतवणूक झाली? तसेच किती युवकांना रोजगार मिळाला? विशेष म्हणजे दावोस येथून शहरासाठी काय आणले? कृपया त्याचा खुलासा करावा.
  7. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विकासाकरीता किती निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे अथवा नियोजित करण्यात आले आहे ? तसेच राज्यातील हजारो हेक्टर वक्फ मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी कृपया आपले धोरण जाहीर करावे.
  8. औरंगाबाद येथील सफारी पार्क पूर्ण होण्यासाठी आणखी किती दशके लागणार ? कृपया खुलासा करण्यात यावा.
  9. औरंगाबाद शहरात मागील ३० ते ४० वर्षात आरक्षित जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द कधी होणार? औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत शहर विकास आराखड्यातील हरित पट्ट्यात व आरक्षित जागेवर विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करण्याची परवानगी कधी मिळणार? कृपया जाहीर करण्यात यावा.
  10. सातारा-देवळाई भागात भुमिगत मलनि:सारणासाठी निधी कधी उपलब्ध होणार? परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा कधी मिळणार ? कृपया याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा.
  11. औरंगाबाद – शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणीवाढ लवकरच होणार असल्याचे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जाहीर केले होते. ते कधी होणार? कृपया जाहीर करावे.
  12. दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आपण भाषणात भाविकांसाठी शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते, ते कधी होणार? कृपया खुलासा करावा.
  13. औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या, औरंगाबाद महानरगपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इतर शासकीय विभाग व आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांना शासन निर्णय, परिपत्रक व कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी व इतर योजनांचा लाभ मिळणार आहे किंवा नाही? याचा खुलासा करून कामगारांची आर्थिक पिळवणूक व कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय कार्यालय, विभाग व आस्थानांविरुद्ध केलेल्या कार्यवाहीची माहिती जाहीर करावी.
  14. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असतांना निवासी वसाहती, व्यावसायिक प्रतिष्ठान, उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी नाल्यांतून उघड्यावरून वाहू नये म्हणुन ४६४ कोटीची निविदा मंजुर करुन भूमिगत गटार योजना राबविण्याचा संपुर्ण ठेका खिल्लारी कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आला होता. परंतु योजना पूर्ण न करता तत्कालीन सत्ताधारी यांच्यासोबत संगणमताने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता. सबब प्रकरणी संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करुन नागरीकांचे पैसे हडपणाNयाकडून वसुली करण्यात आली आहे विंâवा नाही ? कृपया खुलासा करावा.
  15. आपला पक्ष शिवसेना व भाजपाची महानगरपालिकेत सत्ता असताना शहर विकासाचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन शिवसेना – भाजपा सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार करण्यासाठी सर्वसाधारण सभेला अधिकार नसतांना आराखड्यात सर्व नियम डावलुन सोयीनुसार बदल केले. त्यामुळे संपुर्ण आराखडाच रद्द झाला होता. तत्कालीन शिवसेना व भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी आर्थिक तडजोड करुन केलेल्या महाभ्रष्टाचारामुळे शहराच्या विकासाला चांलगीच खीळ बसून शहराचे वाटोळे होऊन संपूर्ण शहर २० वर्ष मागे गेले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत झालेल्या हजारो कोटीच्या महाभ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करुन सर्व संबंधितांविरुध्द आपण कायदेशिर कारवाई करणार आहे किंवा नाही ? कृपया आपण याचा जाहीररित्या खुलासा करावा.

इम्तियाज जलील बोलका शंख - खा. इम्तियाज जलील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये बहुतांश मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहेत. खासदार म्हणून त्यांनी कधी मागणी केली का? आवाज उठवला का? असे प्रश्न शिवसेना प्रवक्ते आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केले. जलील म्हणजे बोलका शंख आहे, अशी टिका त्यांनी केली. तर शहरात लावलेल्या बॅनरवरून मनसे पक्षातर्फे राज ठाकरे यांच्या पोस्टरची कॉपी केली असा आरोप केला जातोय. मात्र, मनसे हाच आमची कॉपी आहे. त्यांची कॉपी आम्ही काय करणार अशी टीका सेना आ. अंबादास दानवे यांनी केली.


हेही वाचा - अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.