ETV Bharat / city

बुद्ध पौर्णिमा विशेष, बुद्धांचे तत्वज्ञान शिकवणारा ऐतिहासिक लेण्यांचा वारसा

author img

By

Published : May 16, 2022, 1:22 PM IST

Updated : May 16, 2022, 1:46 PM IST

औरंगाबादमध्ये ऐतिहासिक लेण्यांचा वारसा आहे. ज्यामध्ये वेरूळ लेणी, अजिंठा लेणी त्याचबरोबर औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडवलं जातं. जुन्याकाळी बुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक भिक्षुकी तीन महिन्यांच्या अभ्यासासाठी या परिसरात येत होते. लेणी परिसरात अभ्यास करून तिथेच ज्ञान प्राप्त करायचे. या ठिकाणी बुद्धाच्या जीवनातील प्रसंग ज्ञान चित्ररूपी स्वरूपात दर्शवले आहे.

बुद्ध पौर्णिमा विशेष
बुद्ध पौर्णिमा विशेष

औरंगाबाद - जिल्ह्यातील ऐतिहासिक लेण्यांना जगातील वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जातात. मात्र या लेण्या बौद्धांच्या जीवणाबाबत माहिती देणाऱ्या आणि बुद्धांचे तत्वज्ञानाची शिकवण देणाऱ्या आहेत. जुन्या काळी भिक्षुकी येथे येऊन अभ्यास करत असल्याची माहिती डॉ. संजय पाईकवार यांनी दिली. बुद्ध पूर्णिमा निमित्त पाहुयात इटीव्ही विशेष.....

बुद्ध पौर्णिमा विशेष, बुद्धांचे तत्वज्ञान शिकवणारा ऐतिहासिक लेण्यांचा वारसा
मोठ्या उत्साहात साजरी करतात बौद्ध पौर्णिमा - 16 मे रोजी बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा अस म्हणलं जात. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील पाच महत्वाच्या गॊष्टी या दिवशी घडल्या आहेत. भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. याच दिवशी त्यांची पत्नी यशोधरा यांचा जन्म देखील याच दिवशीचा आहे. त्यामुळे या दिवसाला मोठं महत्व आहे. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लेण्यांमध्ये प्राप्त होते बुद्धांची शिकवण - औरंगाबाद मध्ये ऐतिहासिक लेण्यांचा वारसा आहे. ज्यामध्ये वेरूळ लेणी, अजिंठा लेणी त्याचबरोबर औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडवलं जातं. जुन्याकाळी बुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक भिक्षुकी तीन महिन्यांच्या अभ्यासासाठी या परिसरात येत होते. लेणी परिसरात अभ्यास करून तिथेच ज्ञान प्राप्त करायचे. या ठिकाणी बुद्धाच्या जीवनातील प्रसंग ज्ञान चित्ररूपी स्वरूपात दर्शवले आहे. या ठिकाणी स्तूप आणि लेणी याच्या माध्यमातून हे ज्ञान प्राप्त केले जात होते. वेदिका, शिल्प, बोधिसत्व, बोधी शक्ती या माध्यमातून, सर्वसामान्यांना ज्ञान शिल्पकलेच्या माध्यमातून दिले जात आहे. या पूर्ण लेण्यांमध्ये पद्मपाणी, वज्रपाणी अशा अनेक रुपांनी मधून बोधिसत्व या माध्यमातून ज्ञान प्राप्त केले जाते अशिक्षित लोकांना ही शिल्पा च्या माध्यमातून ज्ञान मिळेल अशी शक्ती या लेण्यांमध्ये आहे त्यामुळे अनेक वेळा कार्यशाळेच्या माध्यमातून देखील बोधिसत्व शिकवण्याचे काम केले जाते, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.

औरंगाबाद - जिल्ह्यातील ऐतिहासिक लेण्यांना जगातील वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जातात. मात्र या लेण्या बौद्धांच्या जीवणाबाबत माहिती देणाऱ्या आणि बुद्धांचे तत्वज्ञानाची शिकवण देणाऱ्या आहेत. जुन्या काळी भिक्षुकी येथे येऊन अभ्यास करत असल्याची माहिती डॉ. संजय पाईकवार यांनी दिली. बुद्ध पूर्णिमा निमित्त पाहुयात इटीव्ही विशेष.....

बुद्ध पौर्णिमा विशेष, बुद्धांचे तत्वज्ञान शिकवणारा ऐतिहासिक लेण्यांचा वारसा
मोठ्या उत्साहात साजरी करतात बौद्ध पौर्णिमा - 16 मे रोजी बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा अस म्हणलं जात. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील पाच महत्वाच्या गॊष्टी या दिवशी घडल्या आहेत. भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. याच दिवशी त्यांची पत्नी यशोधरा यांचा जन्म देखील याच दिवशीचा आहे. त्यामुळे या दिवसाला मोठं महत्व आहे. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लेण्यांमध्ये प्राप्त होते बुद्धांची शिकवण - औरंगाबाद मध्ये ऐतिहासिक लेण्यांचा वारसा आहे. ज्यामध्ये वेरूळ लेणी, अजिंठा लेणी त्याचबरोबर औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडवलं जातं. जुन्याकाळी बुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक भिक्षुकी तीन महिन्यांच्या अभ्यासासाठी या परिसरात येत होते. लेणी परिसरात अभ्यास करून तिथेच ज्ञान प्राप्त करायचे. या ठिकाणी बुद्धाच्या जीवनातील प्रसंग ज्ञान चित्ररूपी स्वरूपात दर्शवले आहे. या ठिकाणी स्तूप आणि लेणी याच्या माध्यमातून हे ज्ञान प्राप्त केले जात होते. वेदिका, शिल्प, बोधिसत्व, बोधी शक्ती या माध्यमातून, सर्वसामान्यांना ज्ञान शिल्पकलेच्या माध्यमातून दिले जात आहे. या पूर्ण लेण्यांमध्ये पद्मपाणी, वज्रपाणी अशा अनेक रुपांनी मधून बोधिसत्व या माध्यमातून ज्ञान प्राप्त केले जाते अशिक्षित लोकांना ही शिल्पा च्या माध्यमातून ज्ञान मिळेल अशी शक्ती या लेण्यांमध्ये आहे त्यामुळे अनेक वेळा कार्यशाळेच्या माध्यमातून देखील बोधिसत्व शिकवण्याचे काम केले जाते, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.
Last Updated : May 16, 2022, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.