ETV Bharat / city

बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Aug 31, 2019, 1:16 PM IST

हातात बांगडया भरा, असे म्हणत एखादाला कमजोर दाखवण्याचे दिवस आता नाहित, कारण बांगड्या भरणारे हात आता कमजोर राहिलेले नाहीत, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केले आहे.

आदित्य ठाकरे

औरंगाबाद - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा सध्या औरंगाबादेत आली आहे. यावेळी एका सभेदरम्यान उपस्थित महिलांना संबोधित करत असताना ठाकरे यांनी, बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत, ते सक्षम आहेत, असे विधान केले आहे.

औरंगाबाद येथे जन आशीर्वाद यात्रेत उपस्थीत महिलांना संबोधीत करताना आदित्य ठाकरे

हेही वाचा... जनआशिर्वाद यात्रा : आदित्य ठाकरेंचे बुलडाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून स्वागत

बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे - ठाकरे

औरंगाबादचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महिलांना 101 शिलाई मशीनचे मोफत वाटप केले. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना आदित्य यांनी आज संपूर्ण देश खऱ्या अर्थाने महिला चालवत आहेत. त्यामुळे पूर्वी एखाद्याला कमजोर दाखवण्यासाठी बांगड्या देण्याची जी पद्धत होती, ती आता बदलायला पाहिजे. कारण बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे. असे बोलत ठाकरे यांनी महिला मेळाव्यातील उपस्थित महिलांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा... मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे औरंगाबादेत जंगी स्वागत

नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलोय - आदित्य ठाकरे

लोकांचे दुःख, अपेक्षा समजून घेण्यासाठी आपण बाहेर पडलो आहे. राज्यात कर्जमुक्ती, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न सोडवून नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलो असल्याचे आदित्य यांनी या महिला मेळाव्यात सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे, त्याचेच आभार मानण्यासाठी ही यात्रा असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा... आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी?​​​​​​​

औरंगाबाद - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा सध्या औरंगाबादेत आली आहे. यावेळी एका सभेदरम्यान उपस्थित महिलांना संबोधित करत असताना ठाकरे यांनी, बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत, ते सक्षम आहेत, असे विधान केले आहे.

औरंगाबाद येथे जन आशीर्वाद यात्रेत उपस्थीत महिलांना संबोधीत करताना आदित्य ठाकरे

हेही वाचा... जनआशिर्वाद यात्रा : आदित्य ठाकरेंचे बुलडाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून स्वागत

बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे - ठाकरे

औरंगाबादचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महिलांना 101 शिलाई मशीनचे मोफत वाटप केले. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना आदित्य यांनी आज संपूर्ण देश खऱ्या अर्थाने महिला चालवत आहेत. त्यामुळे पूर्वी एखाद्याला कमजोर दाखवण्यासाठी बांगड्या देण्याची जी पद्धत होती, ती आता बदलायला पाहिजे. कारण बांगड्या हे आता शक्तीचे प्रतिक बनले आहे. असे बोलत ठाकरे यांनी महिला मेळाव्यातील उपस्थित महिलांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा... मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे औरंगाबादेत जंगी स्वागत

नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलोय - आदित्य ठाकरे

लोकांचे दुःख, अपेक्षा समजून घेण्यासाठी आपण बाहेर पडलो आहे. राज्यात कर्जमुक्ती, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न सोडवून नवे राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी मी आलो असल्याचे आदित्य यांनी या महिला मेळाव्यात सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे, त्याचेच आभार मानण्यासाठी ही यात्रा असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा... आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी?​​​​​​​

Intro:हातात बांगडया भरा अस म्हणत एखादा कमजोर असल्याचं पण दाखवतो, मात्र बांगड्या भरणारे हात सक्षम असतात पूर्ण देश चालवतात म्हणून या वाक्याचा अर्थ आता बदलला पाहिजे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या महिला मेळाव्यात उपस्थित महिलांची मन जिंकणाचा प्रयत्न केला. औरंगाबादचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांच्याहस्ते महिलांना 101 शिलाई मशीनचे मोफत वाटप केले.Body:शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज औरंगाबादेत आली, औरंगाबादेत त्यांचा सकाळचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती ,लोक उन्हात बसले होते आणि आदित्य ठाकरे यांचा स्टेज सावलीत होता मात्र कार्यक्रमाला येताच लोक उन्हात बसले असतांना मी सावलीत बसू शकत नाही असं म्हणत आदित्य ठाकरे स्टेजवरून खाली उतरले आणि लोकांमध्ये जाऊन त्यांनी कार्यक्रमाचा पूर्ण भाषण केलं.
Conclusion:यावेळी लोकांचे दुःख ,अपेक्षा समजून घेण्यासाठी बाहेर पडलो आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं, राज्यात कर्जमुक्ती, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न सोडवून नवं राज्य घडवण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आल्याचं आदित्य ठाकरे यांनी महिला मेळाव्यात सांगितलं. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं आहे, त्याचेच आभार मानण्यासाठी ही यात्रा असल्याचं आदित्य म्हणाले.
Byte - आदित्य ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.