ETV Bharat / city

Navneet Rana On Umesh Kolhe Murder : हिंदुत्व विचाराच्या आड येणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी - खासदार नवनीत राणा

author img

By

Published : Jul 3, 2022, 10:01 PM IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी आज उमेश कोल्हे ( Umesh Kolhe murder case ) यांच्या कुटुंबीयांंची भेट घेतली. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) या औषध व्यावसायिकाची 21 जूनला गळ चिरुन हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा ( Nupur Sharma ) प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. याच प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत.

Those who obstruct Hindutva ideology should be severely punished - MP Navneet Rana
हिंदुत्व विचाराच्या आड येणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी - खासदार नवनीत राणा

अमरावती - आज या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्वाच्या ( Hindutva ideology ) नावावर सत्ता परिवर्तन होत आहे. आम्ही मोठ्या जोमाने आणि अभिमानाने हिंदुत्वाचा प्रसार करू. मात्र, हिंदुत्वाचा प्रसार, ( Propaganda of Hindutva ) प्रचार करणाऱ्यांच्या मधात कोणी आडकाठी आणत असेल तर त्यांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. त्यांनी आज अमरावतीत उमेश कोल्हे कुटुंबीयांंची भेट घेतली. उमेश कोल्हे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना भर चौकात शिक्षा व्हावी अशी, मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

हिंदुत्व विचाराच्या आड येणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी - खासदार नवनीत राणा
नवनीत राणा यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट - खासदार नवनीत राणा या मुंबईवरून नागपूरला आल्या होत्या. तेथून त्यांनी थेट उमेश कोल्हे यांच्या लोकमान्य कॉलनी परिसरातील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोल्हे कुटुंबीयांची परिस्थिती नाजूक आहे. उमेश कोल्हे हे अतिशय मृदू स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधल्यावर मला जाणवले असे त्या म्हणाल्या. आज कोल्हे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, त्यांची आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा - BJP National Executive in Hyderabad: हैदराबादमध्ये 'BJP'ची कार्यकारिणी; पहा काय म्हणाले 'CM' योगी

अतिशय गंभीर प्रकार - अमरावती शहरात ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली अशा अनेकांना माफी मागण्या संदर्भात धमकी मिळत आहे. शहरातील 21, 22 जणांनी आतापर्यंत पोस्ट शेअर केल्याबाबत सोशल मीडियावर माफी देखील मागितली असून हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हे अतिशय गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या आरोपीं सोबतच पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या संर्भात केंद्रिय गृहमंत्र्याकडे पोलिसांच्या उच्चस्तरीय चौकशी बाबत चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

माजी पालकमंत्र्यांवर आक्षेप - केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होत असताना अमरावतीत मात्र, हिंदुत्वावर आघात करणाऱ्या घटनेला दडपण्याचा प्रयत्न जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून केला जात होता. सत्ता जात असताना देखील हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेण्याचा केविलवाणा प्रकार अमरावती शहरात घडला असल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी खंत व्यक्त केली.

नुपूर शर्मा प्रकरणातून खून - उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) या औषध व्यावसायिकाची 21 जूनला गळ चिरुन हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. याच प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावरती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरी, देखील त्याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का?, याची सुद्धा चौकशी केली ( Umesh Kolhe Murder Case International Connection Inquiry ) जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी म्हटले आहे.

विदेशी ताकदिची चौकशी - विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उमेश कोल्हे यांची झालेली हत्या ही फार गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांचा खून करण्यात आला ते अतिशय निंदणीय आहे. या घटनेतील आरोपी त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड पकडला गेला आहे. तरीसुद्धा याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का? याची सुद्धा चौकशी होणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाला दरोड्याचं कारण देण्यात आले होते. तशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. परंतु, या प्रकरणात अजूनही पूर्ण चौकशी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

7 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), युसूफ खान बहादूर खान (44) आणि शेख इरफान शेख रहीन ( वय, 35 ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, अमरावती शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर, मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे होवून मारहान करण्यात सुरवात केली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने उमेश यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत, सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा - Jayant Patil : 'कदाचीत ते सत्तापालट होण्याची वाट...'; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला

अमरावती - आज या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्वाच्या ( Hindutva ideology ) नावावर सत्ता परिवर्तन होत आहे. आम्ही मोठ्या जोमाने आणि अभिमानाने हिंदुत्वाचा प्रसार करू. मात्र, हिंदुत्वाचा प्रसार, ( Propaganda of Hindutva ) प्रचार करणाऱ्यांच्या मधात कोणी आडकाठी आणत असेल तर त्यांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. त्यांनी आज अमरावतीत उमेश कोल्हे कुटुंबीयांंची भेट घेतली. उमेश कोल्हे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना भर चौकात शिक्षा व्हावी अशी, मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

हिंदुत्व विचाराच्या आड येणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी - खासदार नवनीत राणा
नवनीत राणा यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची भेट - खासदार नवनीत राणा या मुंबईवरून नागपूरला आल्या होत्या. तेथून त्यांनी थेट उमेश कोल्हे यांच्या लोकमान्य कॉलनी परिसरातील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे कुटुंबीयांचे सांत्वन केले. कोल्हे कुटुंबीयांची परिस्थिती नाजूक आहे. उमेश कोल्हे हे अतिशय मृदू स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधल्यावर मला जाणवले असे त्या म्हणाल्या. आज कोल्हे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, त्यांची आर्थिक परिस्थिती देखील हालाखीची आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा - BJP National Executive in Hyderabad: हैदराबादमध्ये 'BJP'ची कार्यकारिणी; पहा काय म्हणाले 'CM' योगी

अतिशय गंभीर प्रकार - अमरावती शहरात ज्या व्यक्तींनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली अशा अनेकांना माफी मागण्या संदर्भात धमकी मिळत आहे. शहरातील 21, 22 जणांनी आतापर्यंत पोस्ट शेअर केल्याबाबत सोशल मीडियावर माफी देखील मागितली असून हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी हे अतिशय गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या आरोपीं सोबतच पोलीस आयुक्त आरती सिंह यांची देखील उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या संर्भात केंद्रिय गृहमंत्र्याकडे पोलिसांच्या उच्चस्तरीय चौकशी बाबत चर्चा करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

माजी पालकमंत्र्यांवर आक्षेप - केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होत असताना अमरावतीत मात्र, हिंदुत्वावर आघात करणाऱ्या घटनेला दडपण्याचा प्रयत्न जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून केला जात होता. सत्ता जात असताना देखील हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेण्याचा केविलवाणा प्रकार अमरावती शहरात घडला असल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी खंत व्यक्त केली.

नुपूर शर्मा प्रकरणातून खून - उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) या औषध व्यावसायिकाची 21 जूनला गळ चिरुन हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. याच प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावरती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरी, देखील त्याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का?, याची सुद्धा चौकशी केली ( Umesh Kolhe Murder Case International Connection Inquiry ) जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी म्हटले आहे.

विदेशी ताकदिची चौकशी - विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उमेश कोल्हे यांची झालेली हत्या ही फार गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांचा खून करण्यात आला ते अतिशय निंदणीय आहे. या घटनेतील आरोपी त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड पकडला गेला आहे. तरीसुद्धा याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का? याची सुद्धा चौकशी होणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाला दरोड्याचं कारण देण्यात आले होते. तशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. परंतु, या प्रकरणात अजूनही पूर्ण चौकशी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

7 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), युसूफ खान बहादूर खान (44) आणि शेख इरफान शेख रहीन ( वय, 35 ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, अमरावती शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर, मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे होवून मारहान करण्यात सुरवात केली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने उमेश यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत, सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा - Jayant Patil : 'कदाचीत ते सत्तापालट होण्याची वाट...'; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.