ETV Bharat / business

अर्थवाढीची चालक आहे 'भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम'

Indian Startup Ecosystem : भारतीय स्टार्टअपनं अर्थव्यवस्थेला चांगलीच बळकटी दिली आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात बोलबाला आहे. भारतीय स्टार्टअप योजनेमुळं देशात अनेक उद्योग उभे राहिले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 2:28 PM IST

Indian Startup Ecosystem
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद Indian Startup Ecosystem : सध्या भारतात स्टार्ट अप उद्योगानं अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. केंद्र सरकारनं 16 जानेवारी 2016 ला स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला. त्यामुळं अनेक उद्योग देशात सुरू करण्यात आले आहेत. अनेकत तरुण उद्योगाकडं वळल्यामुळं देशात एक इकोसिस्टीम सुरू झाली आहे. या भारतीय इकोसिस्टीमनं अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. देशात 5 एप्रिल 2016 ला स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली होती. स्टार्टअप इंडिया योजनेनुसार पात्र कंपन्यांना डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) च्या माध्यामातून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळते.

16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस : केंद्र सरकारनं देशात 16 जानेवारीला स्टार्टअपयोजा सुरू केली. त्यानंतर दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये 16 जानेवारी हादिवस स्टार्टअप दिवस म्हणून जाहीर करण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यामुळं स्टार्टअप योजनेत उद्योजकांना प्रोत्साहन देत रोजगारांच्या संधी निर्माण करता येतात.

कशी आहे भारतीय स्टार्टअप उद्योगांची स्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजना सुरू केल्यानंतर भारतीय उद्योगाला चालना मिळाल्याचा दावा करण्यात येतो. केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत योजना आणून त्यामाध्यमातून उद्योगाला मोठी चालना दिली आहे. त्यामुळंच स्टार्टअप योजनांच्या माध्यमातून देशात अनेक उद्योग उभे राहत आहेत. स्टार्टअपसाठी भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतीय उद्योग जगतानं आघाडी घेतली आहे. त्यामुळं स्टार्टअपमध्ये भारत हा तिसरा देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारच्या मदतीनं भारतीय स्टार्टअप उद्योग जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत.

जागतिक पातळीवर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम : केंद्र सरकारनं सुरू केलेल्या स्टार्टअप योजनेनुसार अनेक उद्योगांनी आपला उद्योग सुरू केला आहे. त्यामुळं जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत झाली आहे. देशात ऑक्टोबर 2023 पर्यंत 763 जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 718 स्टार्टअप उद्योग डीपीआयआयटी मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळं भारतीय स्टार्टअपनं जगात तिसरं स्थान पटकावलं आहे. गुणवत्तेतही भारतीय स्टार्टअप दुसऱ्या स्थानावर असल्याचं इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीम अहवाल 2023 नुसार स्पष्ट झालं आहे.

भारतीय स्टार्टअपसमोरील आव्हानं : कोरोनाच्या काळात जगभरातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मात्र त्यामानानं भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला नाही. मात्र भारतीय स्टार्टअपला काही प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना काळात अनेक उद्योजकांना फटका बसल्यानं अनेक स्टार्टअप बंद करण्यात आले. कोरोना काळात माल वाहतूक, पुरवठा साखळी, कर्मचारी, विपणन धोरण आदी अनेक अडथळ्यांचा सामना स्टार्टअप उद्योजकांना करावा लागला. त्यामुळं काही स्टार्टअप उद्योगांनी तग धरली नाही. स्टार्टअप उद्योग अयशस्वी होण्याचा दर तब्बल 90 टक्के आहे. त्याची कारण ंविविध आहेत. 2023 मध्ये भारतीय स्टार्टअप फंडींग 7 बिलियनवर घसरलं आहे. हे फंडीग 2022 मध्ये तब्बल 25 बिलियन होतं.

हेही वाचा :

  1. मोदी सरकारचा १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प, ३१ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
  2. इराण-पाकिस्तानमधील तणावामुळं शेअर बाजारात 'भूकंप'; गुंतवणुकदारांचे काही मिनिटांत बुडाले 1.5 लाख कोटी

हैदराबाद Indian Startup Ecosystem : सध्या भारतात स्टार्ट अप उद्योगानं अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेची भरभराट होत आहे. केंद्र सरकारनं 16 जानेवारी 2016 ला स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला. त्यामुळं अनेक उद्योग देशात सुरू करण्यात आले आहेत. अनेकत तरुण उद्योगाकडं वळल्यामुळं देशात एक इकोसिस्टीम सुरू झाली आहे. या भारतीय इकोसिस्टीमनं अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. देशात 5 एप्रिल 2016 ला स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली होती. स्टार्टअप इंडिया योजनेनुसार पात्र कंपन्यांना डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) च्या माध्यामातून स्टार्टअप म्हणून मान्यता मिळते.

16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस : केंद्र सरकारनं देशात 16 जानेवारीला स्टार्टअपयोजा सुरू केली. त्यानंतर दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये 16 जानेवारी हादिवस स्टार्टअप दिवस म्हणून जाहीर करण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येते. स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यामुळं स्टार्टअप योजनेत उद्योजकांना प्रोत्साहन देत रोजगारांच्या संधी निर्माण करता येतात.

कशी आहे भारतीय स्टार्टअप उद्योगांची स्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजना सुरू केल्यानंतर भारतीय उद्योगाला चालना मिळाल्याचा दावा करण्यात येतो. केंद्र सरकारनं आत्मनिर्भर भारत योजना आणून त्यामाध्यमातून उद्योगाला मोठी चालना दिली आहे. त्यामुळंच स्टार्टअप योजनांच्या माध्यमातून देशात अनेक उद्योग उभे राहत आहेत. स्टार्टअपसाठी भारत हा जगातील आघाडीचा देश आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतीय उद्योग जगतानं आघाडी घेतली आहे. त्यामुळं स्टार्टअपमध्ये भारत हा तिसरा देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारच्या मदतीनं भारतीय स्टार्टअप उद्योग जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत.

जागतिक पातळीवर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम : केंद्र सरकारनं सुरू केलेल्या स्टार्टअप योजनेनुसार अनेक उद्योगांनी आपला उद्योग सुरू केला आहे. त्यामुळं जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत झाली आहे. देशात ऑक्टोबर 2023 पर्यंत 763 जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 718 स्टार्टअप उद्योग डीपीआयआयटी मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळं भारतीय स्टार्टअपनं जगात तिसरं स्थान पटकावलं आहे. गुणवत्तेतही भारतीय स्टार्टअप दुसऱ्या स्थानावर असल्याचं इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीम अहवाल 2023 नुसार स्पष्ट झालं आहे.

भारतीय स्टार्टअपसमोरील आव्हानं : कोरोनाच्या काळात जगभरातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मात्र त्यामानानं भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला नाही. मात्र भारतीय स्टार्टअपला काही प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोना काळात अनेक उद्योजकांना फटका बसल्यानं अनेक स्टार्टअप बंद करण्यात आले. कोरोना काळात माल वाहतूक, पुरवठा साखळी, कर्मचारी, विपणन धोरण आदी अनेक अडथळ्यांचा सामना स्टार्टअप उद्योजकांना करावा लागला. त्यामुळं काही स्टार्टअप उद्योगांनी तग धरली नाही. स्टार्टअप उद्योग अयशस्वी होण्याचा दर तब्बल 90 टक्के आहे. त्याची कारण ंविविध आहेत. 2023 मध्ये भारतीय स्टार्टअप फंडींग 7 बिलियनवर घसरलं आहे. हे फंडीग 2022 मध्ये तब्बल 25 बिलियन होतं.

हेही वाचा :

  1. मोदी सरकारचा १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प, ३१ जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
  2. इराण-पाकिस्तानमधील तणावामुळं शेअर बाजारात 'भूकंप'; गुंतवणुकदारांचे काही मिनिटांत बुडाले 1.5 लाख कोटी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.