ETV Bharat / business

आर्थिक विकासदर आणखी घसरण्याची चिंता; ७२ अंशाने घसरून शेअर बाजार बंद

author img

By

Published : Nov 18, 2019, 6:05 PM IST

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांकही १०.९५ अंशाने घसरून ११,८८४.५० वर स्थिरावला.

संग्रहित - शेअर बाजार

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ७२ अंशाने घसरून ४०,२८४.१९ वर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असल्याने एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसचे शेअर घसरले. याचा परिणाम झाल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीतही घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांकही १०.९५ अंशाने घसरून ११,८८४.५० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

शेअर घसरणीत सर्वाधिक येस बँकेचे ४.०८ टक्क्यापर्यंत नुकसान झाले. बजाज ऑटो, एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, ओएनजीसी आणि टीसीएसचे शेअर २.०५ टक्क्यापर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीाय, वेदांत आणि टाटा मोटर्सचे शेअर हे ४.६० टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-'यापुढेही जगात सर्वाधिक विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था असेल'

जागतिक आर्थिक मंचावर सकारात्मक स्थिती आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी घसरणार असल्याचा अंदाज विविध अहवालामधून व्यक्त करण्यात आला. यामुळे देशाच्या भांडवली बाजारामधील चिंता वाढली आहे.

हेही वाचा-'पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आरबीआयने २ हजार कोटींची तरतूद करावी'

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ७२ अंशाने घसरून ४०,२८४.१९ वर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्था मंदावत असल्याने एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसचे शेअर घसरले. याचा परिणाम झाल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीतही घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांकही १०.९५ अंशाने घसरून ११,८८४.५० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

शेअर घसरणीत सर्वाधिक येस बँकेचे ४.०८ टक्क्यापर्यंत नुकसान झाले. बजाज ऑटो, एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी बँक, ओएनजीसी आणि टीसीएसचे शेअर २.०५ टक्क्यापर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, टाटा स्टील, सन फार्मा, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीाय, वेदांत आणि टाटा मोटर्सचे शेअर हे ४.६० टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-'यापुढेही जगात सर्वाधिक विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था असेल'

जागतिक आर्थिक मंचावर सकारात्मक स्थिती आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी घसरणार असल्याचा अंदाज विविध अहवालामधून व्यक्त करण्यात आला. यामुळे देशाच्या भांडवली बाजारामधील चिंता वाढली आहे.

हेही वाचा-'पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आरबीआयने २ हजार कोटींची तरतूद करावी'

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.