ETV Bharat / business

सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन

author img

By

Published : Oct 10, 2019, 1:38 PM IST

Updated : Oct 10, 2019, 5:13 PM IST

निर्मला सीतारामन यांनी पीएमसीच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असल्याचेही सांगितले. पीएमसीच्या खातेदांराचा पैसा त्यांना कधी मिळेल, हे नक्की सांगणे शक्य नाही. कारण त्याबाबत आरबीआय काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निर्मला सीतारामन

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेविषयी (पीएमसी) सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पीएमसी सहकारी बँक असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक त्याबाबत व्यवस्थापन करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

पीएमसीच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पीएमसीच्या खातेदांराचा पैसा त्यांना कधी मिळेल, हे नक्की सांगणे शक्य नाही. कारण त्याबाबत आरबीआय काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या खातेदारांशीही चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता विविध क्षेत्रातील अडचणी समजून घेऊन आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी कायद्यात बदल करू, असे त्यांनी आश्वासन दिले. पुढे त्या म्हणाल्या, मी वित्त मंत्रालयाच्या सचिवांना ग्रामीण विकास मंत्रालय आणि शहर विकास मंत्रालयाबरोबर काम करायला सांगितले आहे. जे काही घडत आहे, त्याबाबत अभ्यास करण्यासाठी सूचविले आहे.
पीएमसीच्या अडचणीत सापडलेल्या खातेदारांबाबत आरबीआयच्या गव्हर्नरांशी तातडीने चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. पीएमसी बँकेच्या घोट्याळ्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना बँकेतून फक्त २५ हजार रुपये काढता येतात. त्यामुळे उपचार, लग्न समारंभ इत्यादी कार्यासाठी लागणारा पैसा कोठून आणावा, असा बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला आहे.

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेविषयी (पीएमसी) सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पीएमसी सहकारी बँक असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक त्याबाबत व्यवस्थापन करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

पीएमसीच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पीएमसीच्या खातेदांराचा पैसा त्यांना कधी मिळेल, हे नक्की सांगणे शक्य नाही. कारण त्याबाबत आरबीआय काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकेच्या खातेदारांशीही चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता विविध क्षेत्रातील अडचणी समजून घेऊन आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी कायद्यात बदल करू, असे त्यांनी आश्वासन दिले. पुढे त्या म्हणाल्या, मी वित्त मंत्रालयाच्या सचिवांना ग्रामीण विकास मंत्रालय आणि शहर विकास मंत्रालयाबरोबर काम करायला सांगितले आहे. जे काही घडत आहे, त्याबाबत अभ्यास करण्यासाठी सूचविले आहे.
पीएमसीच्या अडचणीत सापडलेल्या खातेदारांबाबत आरबीआयच्या गव्हर्नरांशी तातडीने चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पीएमसी बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्यासाठी भाजप कार्यालयासमोरच ग्राहकांचा गोंधळ

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या ग्राहकांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. पीएमसी बँकेच्या घोट्याळ्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना बँकेतून फक्त २५ हजार रुपये काढता येतात. त्यामुळे उपचार, लग्न समारंभ इत्यादी कार्यासाठी लागणारा पैसा कोठून आणावा, असा बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला आहे.

Intro:Body:

Dummy


Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.