ETV Bharat / business

व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला एजीआरचे दिले २,५०० कोटी रुपये

author img

By

Published : Feb 20, 2020, 4:56 PM IST

व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३ हजार कोटी रुपये थकित आहेत. व्होडाफोन आयडियाचे चेअरमन के. एम. बिर्ला आणि एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. दोन्ही उद्योजकांनी दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली आहे.

Vodafone Idea
व्होडाफोन आयडिया

नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी केंद्रीय दूरसंचार विभागाला आज १ हजार कोटी रुपये दिले आहेत. नुकतेच व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी दूरसंचार विभागाला २,५०० कोटी रुपये दिले आहेत.

शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने कंपनीने दूरसंचार विभागाचे आज पैसे दिले आहेत. याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही. व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३ हजार कोटी रुपये थकित आहेत. व्होडाफोन आयडियाचे चेअरमन के. एम. बिर्ला आणि एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. दोन्ही उद्योजकांनी दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली आहे.

हेही वाचा-'जीएसटी हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा'

सरकारने एजीआर शुल्काबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. बिर्ला आणि मित्तल यांनी दूरसंचार सचिव अंशु प्रकाश यांची भेट घेत उद्योग टिकविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. सरकारने दिलासा दिला नाही तर उद्योग टिकविणे अवघड होईल, असे व्होडाफोन आयडियाने यापूर्वी जाहीर म्हटले होते.

हेही वाचा-मंदावलेल्या आर्थिक स्थितीचा आणि कोरोनाचा 'या' सरकारी कंपनीवर परिणाम नाही

नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी केंद्रीय दूरसंचार विभागाला आज १ हजार कोटी रुपये दिले आहेत. नुकतेच व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी दूरसंचार विभागाला २,५०० कोटी रुपये दिले आहेत.

शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने कंपनीने दूरसंचार विभागाचे आज पैसे दिले आहेत. याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही. व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३ हजार कोटी रुपये थकित आहेत. व्होडाफोन आयडियाचे चेअरमन के. एम. बिर्ला आणि एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. दोन्ही उद्योजकांनी दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली आहे.

हेही वाचा-'जीएसटी हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा'

सरकारने एजीआर शुल्काबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. बिर्ला आणि मित्तल यांनी दूरसंचार सचिव अंशु प्रकाश यांची भेट घेत उद्योग टिकविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. सरकारने दिलासा दिला नाही तर उद्योग टिकविणे अवघड होईल, असे व्होडाफोन आयडियाने यापूर्वी जाहीर म्हटले होते.

हेही वाचा-मंदावलेल्या आर्थिक स्थितीचा आणि कोरोनाचा 'या' सरकारी कंपनीवर परिणाम नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.