ETV Bharat / business

रतन टाटांना दिलासा; अब्रूनुकसानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

टाटा सन्सच्या मंडळावर संचालक असलेले नुस्ली वाडिया हे 2016 मध्ये संचालक मंडळामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयात रतन टाटा व एन चंद्रशेखरन यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता.

author img

By

Published : Jul 22, 2019, 5:17 PM IST

रतन टाटा

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा व विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फेटाळून लावली.

टाटा सन्सच्या मंडळावर संचालक पदावर असलेले नुस्ली वाडिया हे 2016 मध्ये संचालक मंडळामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयात रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावर 2018 साली रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्यासमवेत संचालक पदावरील इतर व्यक्तींच्या विरोधात दिवाणी न्यायालयाने समन्स बजाविले होते. या विरोधात टाटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाची कारवाई रद्द केली आहे.


नुस्ली वाडिया हे 2016 पर्यंत टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळात होते. नुस्ली वाडिया हे सायरस मिस्त्री यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. नस्ली वाडिया व टाटामधील हा कॉर्पोरेट वाद असल्याचे त्यांनी न्यायलायच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अब्रूनुकसानीची याचिका रद्द केली आहे.

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा व विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फेटाळून लावली.

टाटा सन्सच्या मंडळावर संचालक पदावर असलेले नुस्ली वाडिया हे 2016 मध्ये संचालक मंडळामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयात रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यावर 2018 साली रतन टाटा व एन. चंद्रशेखरन यांच्यासमवेत संचालक पदावरील इतर व्यक्तींच्या विरोधात दिवाणी न्यायालयाने समन्स बजाविले होते. या विरोधात टाटाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाची कारवाई रद्द केली आहे.


नुस्ली वाडिया हे 2016 पर्यंत टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळात होते. नुस्ली वाडिया हे सायरस मिस्त्री यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. नस्ली वाडिया व टाटामधील हा कॉर्पोरेट वाद असल्याचे त्यांनी न्यायलायच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अब्रूनुकसानीची याचिका रद्द केली आहे.

Intro:मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान टाटा सन्स चे माजी अध्यक्ष रतन टाटा , व सध्या या पदावर काम करीत असलेले विद्यमान अध्यक्ष एन. चांद्रशेखरन यांच्या विरोधात माणहणीचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. टाटा सन्स मध्ये बोर्ड संचालक पदावरील रक असलेले नसली वाडिया यांनी 2016 संचालक बोर्डातून बाहेर पडल्यानंतर माणहणीचा दावा मुंबईतील दिवाणी न्यायालयात केला होता. याला अनुसरून 2018 साली रतन टाटा व एन चांद्रशेखरन यांच्या समवेत संचालक पदावरील इतर व्यक्तींच्या विरोधात दिवाणी न्यायालयाने समन्स बजाविले होते. मात्र या विरोधात टाटा कडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, मुंबई उच्च न्यायालयाकडून दिवाणी कोर्टाची कारवाई रद्द केली आहे.Body:नसली वाडिया हे 2016 पर्यँत टाटा ग्रुप च्या काही कंपनीच्या संचालक मंडळात होते. नसली वाडिया हे सायरस मिस्त्री यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमुर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील अभिषेख मनू सिंघवी यांनी युक्तिवाद करीत , नसली वाडिया व टाटा मधील हा कॉर्पोरेट वाद असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.