मुंबई - सायरस मिस्त्री आणि टाटा सन्समधील वादाला नाट्यमय वळण मिळाले आहे. टाटा सन्सचे पुन्हा चेअरमन पद स्वीकारण्यासाठी इच्छा नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात एनसीएलएटीच्या निकालाविरोधात टाटा सन्स, रतन टाटा आणि टीसीएस कंपनीने आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी होण्यापूर्वीच मिस्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
सायरस मिस्त्री रविवारी सायंकाळी बोलताना म्हणाले, टाटा ग्रुपच्या हितासाठी चेअरमन पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वैयक्तिक इच्छेहून अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-प्राप्तिकरदात्यांसाठी 'या' आहेत नव्या वर्षातील महत्त्वाच्या तारखा
चुकीच्या माहितीच्या मोहिमेला दूर करण्यासाठी मी टाटा सन्स, टीसीएस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टाटा इंडस्ट्रीजचे चेअरमन पद स्वीकारणार नाही. मात्र, कमी संख्येतील समभागधारक (शेअरहोल्डर) आणि संचालक मंडळावर सदस्य म्हणून असलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण : टीसीएसचे एनसीएलएटी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल