ETV Bharat / business

वुईवर्क इंडियांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

author img

By

Published : May 18, 2020, 8:09 PM IST

कोरोनाच्या महामारीचा परिणाम आणि जगभरातील व्यवसायामधून कमी झालेला महसूल या कारणांनी वुईवर्क कंपनी अडचणीत सापडली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण वीरवानी यांनी, व्यवसायातील रणनीतीमध्ये मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वुईवर्क इंडिया
वुईवर्क इंडिया

नवी दिल्ली - कोरोना आणि टाळेबंदीचा फटका खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. वुईवर्क इंडियाच्या २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ही कंपनी एकाच ठिकाणी विविध कंपन्यांना काम करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून देते.

कोरोनाच्या महामारीचा परिणाम आणि जगभरातील व्यवसायामधून कमी झालेला महसूल या कारणांनी वुईवर्क कंपनी अडचणीत सापडली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण वीरवानी यांनी, व्यवसायातील रणनीतीमध्ये मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या इमारतींमधून जास्त किंमत मिळविणे आणि खर्च कमी करणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे वीरवानी यांनी सांगितले.

हेही वाचा-केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी

कंपनीचे अमेरिकेत मुख्यालय आहे. देशभरातील ३४ ठिकाणी वुईवर्कची केंद्रे आहेत. तर देशभरात सुमारे ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी आधीपासूनच आर्थिक संकटात आहे. महामारीमुळे कंपनीच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कंपनीने जगभरातील कर्मचारी कामावरून कमी केले आहेत.

हेही वाचा-GRAPHICS : जाणून घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेले आर्थिक पॅकेज

दरम्यान, झोमॅटो, स्विग्गी या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना आणि टाळेबंदीचा फटका खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांना बसत आहे. वुईवर्क इंडियाच्या २० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. ही कंपनी एकाच ठिकाणी विविध कंपन्यांना काम करण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून देते.

कोरोनाच्या महामारीचा परिणाम आणि जगभरातील व्यवसायामधून कमी झालेला महसूल या कारणांनी वुईवर्क कंपनी अडचणीत सापडली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण वीरवानी यांनी, व्यवसायातील रणनीतीमध्ये मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या इमारतींमधून जास्त किंमत मिळविणे आणि खर्च कमी करणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे वीरवानी यांनी सांगितले.

हेही वाचा-केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी

कंपनीचे अमेरिकेत मुख्यालय आहे. देशभरातील ३४ ठिकाणी वुईवर्कची केंद्रे आहेत. तर देशभरात सुमारे ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी आधीपासूनच आर्थिक संकटात आहे. महामारीमुळे कंपनीच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कंपनीने जगभरातील कर्मचारी कामावरून कमी केले आहेत.

हेही वाचा-GRAPHICS : जाणून घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेले आर्थिक पॅकेज

दरम्यान, झोमॅटो, स्विग्गी या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.