ETV Bharat / business

असाही नियम! टोल नाक्यावर वाहनांची १०० मीटर रांग असेल तर टोल नाही!

author img

By

Published : May 26, 2021, 9:02 PM IST

एनएचएआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार टोलनाक्यावर १०० मीटरहून अधिक वाहनांची गर्दी करता येणार नाही. फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होत असताना टोलनाक्यावर वाहनांना वाट पाहावी लागणार नसल्याचे एनएचएआयने म्हटले आहे.

टोल नाका
टोल नाका

नवी दिल्ली- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार वाहनांना अत्यंत गर्दीच्या काळातही टोलनाक्यावर १० सेकंदाहून कमी वेळ लागणार आहे. त्यासाठी एनएचएआयने टोल नाक्यांसाठी सूचना दिल्या आहेत.

एनएचएआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार टोलनाक्यावर १०० मीटरहून अधिक वाहनांची गर्दी करता येणार नाही. फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होत असताना टोलनाक्यावर वाहनांना वाट पाहावी लागणार नसल्याचे एनएचएआयने म्हटले आहे. जर कोणत्या कारणाने १०० मीटरहून अधिक वाहनांची रांग असेल तर १०० मीटरहून कमी अंतर येईपर्यंत वाहनांकडून टोल आकारण्यात येणार नाही. त्या वाहनांना टोल न घेता जाण्याची परवानमी मिळणार आहे. या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी टोल प्लाझा ऑपरेटवर असणार आहे.

हेही वाचा-'ही' चारचाकी खरेदीनंतर पसंत नाही पडली, तर ३० दिवसानंतर पैसे परत!

सोशल डिस्टन्सिंग ही नवीन सामान्य स्थिती

फेब्रुवारी २०२१ मध्ये टोलनाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एनएचएआयने म्हटले, की सोशल डिस्टन्सिंग ही नवीन सामान्य स्थिती झाली आहे. कमीत कमी चालक आणि टोल ऑपरेटर्शी संपर्क येण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशांकडून फास्टॅगकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा-नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

काय आहे फास्टॅग ?
फास्टॅग ही टोल भरण्याची प्रीपेड सुविधा असलेला पास आहे. यामध्ये वाहनावर लावण्यात आलेल्या स्टीकरमुळे स्वयंचलितपणे टोलचे पैसे घेतले जातात. या सुविधेमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज लागत नाही.

नवी दिल्ली- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनानुसार वाहनांना अत्यंत गर्दीच्या काळातही टोलनाक्यावर १० सेकंदाहून कमी वेळ लागणार आहे. त्यासाठी एनएचएआयने टोल नाक्यांसाठी सूचना दिल्या आहेत.

एनएचएआयच्या मार्गदर्शक सूचनानुसार टोलनाक्यावर १०० मीटरहून अधिक वाहनांची गर्दी करता येणार नाही. फास्टॅगची १०० टक्के अंमलबजावणी होत असताना टोलनाक्यावर वाहनांना वाट पाहावी लागणार नसल्याचे एनएचएआयने म्हटले आहे. जर कोणत्या कारणाने १०० मीटरहून अधिक वाहनांची रांग असेल तर १०० मीटरहून कमी अंतर येईपर्यंत वाहनांकडून टोल आकारण्यात येणार नाही. त्या वाहनांना टोल न घेता जाण्याची परवानमी मिळणार आहे. या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी टोल प्लाझा ऑपरेटवर असणार आहे.

हेही वाचा-'ही' चारचाकी खरेदीनंतर पसंत नाही पडली, तर ३० दिवसानंतर पैसे परत!

सोशल डिस्टन्सिंग ही नवीन सामान्य स्थिती

फेब्रुवारी २०२१ मध्ये टोलनाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एनएचएआयने म्हटले, की सोशल डिस्टन्सिंग ही नवीन सामान्य स्थिती झाली आहे. कमीत कमी चालक आणि टोल ऑपरेटर्शी संपर्क येण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशांकडून फास्टॅगकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा-नवीन डिजीटल कायदा; अंमलबजावणीचा अहवाल द्या, केंद्राचे सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

काय आहे फास्टॅग ?
फास्टॅग ही टोल भरण्याची प्रीपेड सुविधा असलेला पास आहे. यामध्ये वाहनावर लावण्यात आलेल्या स्टीकरमुळे स्वयंचलितपणे टोलचे पैसे घेतले जातात. या सुविधेमुळे वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज लागत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.