ETV Bharat / bharat

Ramdas Athawale : 'तुम्ही कधीही आमच्यासोबत येऊ शकता', आठवलेंची नितीश कुमारांना थेट ऑफर

author img

By

Published : Jul 29, 2023, 6:15 PM IST

नितीश कुमार हे राजकारणातील निष्णात खेळाडू मानले जातात. आता ते पुन्हा एकदा पलटी मारू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ramdas Athawale Nitish Kumar
रामदास आठवले नितीश कुमार
पहा काय म्हणाले रामदास आठवले

पाटणा : बिहारमधील महाआघाडीत सध्या नाराजीचे वातावरण आहे. विरोधी आघाडीच्या 'INDIA' या नावाने नितीश कुमार नाराज आहेत. तर मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने काँग्रेस नाराज आहे. दुसरीकडे, ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये नितीश कुमारांच्या अडथळ्यांमुळे राजद नाराज आहे. तर शिक्षक नियमावली आणि कटिहार गोळीबारामुळे डावे संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत. तेथे त्यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्याने आणखी खळबळ उडाली आहे. 'नितीश कुमार कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू नये', असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

आठवलेंची नितीश कुमारांना साद : रामदास आठवलेंनी नितीशकुमारांच्या कामांची प्रशंसा केली आहे. त्यांनी बिहारमधील चांगल्या रस्त्यांचे कौतुक केले आहे. तसेच INDIA नावाला विरोध असल्याने विरोधी पक्षांच्या बंगळुरू बैठकीतून बाहेर पडण्याच्या नितीश कुमारांच्या निर्णयाचेही आठवलेंनी कौतुक केले आहे. नितीश कुमार यांनी यापुढे मुंबईतील सभेला जाऊ नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

नितीश कुमार बंगळुरूमध्ये राहुल गांधी यांनी दिलेल्या INDIA नावाचा निषेध करत बैठकीतून बाहेर पडले. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आता मुंबईत विरोधी ऐक्याच्या बैठकीला जाऊ नये. नितीश यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. अटलजींच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री असताना माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. नितीश यांना माझा एकच प्रश्न आहे की, जेव्हा त्यांना राजदसोबत जायचे होते तेव्हा ते आमच्यासोबत का आले होते? जे आमच्यात सामील होतात ते भ्रष्टाचार मागे सोडतात. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

'जे आमच्यासोबत येतात ते भ्रष्टाचाराला मागे सोडतात' : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले म्हणाले की, '70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे जे एनडीए आघाडीचे घटक नाहीत. जे आमच्यासोबत येतात ते भ्रष्टाचाराला मागे सोडतात'. रामदास आठवले म्हणाले की, 'आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कमी लोक उरले आहेत. ते नरेंद्र मोदींवर जेवढी टीका करतील, तेवढेच आम्ही मजबूत होऊ'. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी राजकीय स्थिती व्हावी, असे ते म्हणाले. एकप्रकारे आठवले यांनी नितीश कुमार यांना राजदची साथ सोडून एनडीएमध्ये सामील होण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

नितीश कुमार नाराज आहेत? : 17 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, समन्वयक न बनवण्यावरून आणि INDIA नावावरून झालेल्या कथित वादामुळे नितीश कुमार, लालू यादव आणि तेजस्वी यादव पत्रकार परिषदेपूर्वीच निघून गेले होते. तेव्हापासून बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

हेही वाचा :

  1. Lalu Prasad Yadav : 'लढलो, लढणार आणि न घाबरता...', 75 वर्षीय लालूंचा बॅडमिंटन खेळतानाचा Video Viral
  2. Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..
  3. Nitish Kumar : नितीश कुमार नाराज? थेटच सांगितले....Watch Video

पहा काय म्हणाले रामदास आठवले

पाटणा : बिहारमधील महाआघाडीत सध्या नाराजीचे वातावरण आहे. विरोधी आघाडीच्या 'INDIA' या नावाने नितीश कुमार नाराज आहेत. तर मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने काँग्रेस नाराज आहे. दुसरीकडे, ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये नितीश कुमारांच्या अडथळ्यांमुळे राजद नाराज आहे. तर शिक्षक नियमावली आणि कटिहार गोळीबारामुळे डावे संतप्त आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत. तेथे त्यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्याने आणखी खळबळ उडाली आहे. 'नितीश कुमार कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू नये', असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

आठवलेंची नितीश कुमारांना साद : रामदास आठवलेंनी नितीशकुमारांच्या कामांची प्रशंसा केली आहे. त्यांनी बिहारमधील चांगल्या रस्त्यांचे कौतुक केले आहे. तसेच INDIA नावाला विरोध असल्याने विरोधी पक्षांच्या बंगळुरू बैठकीतून बाहेर पडण्याच्या नितीश कुमारांच्या निर्णयाचेही आठवलेंनी कौतुक केले आहे. नितीश कुमार यांनी यापुढे मुंबईतील सभेला जाऊ नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

नितीश कुमार बंगळुरूमध्ये राहुल गांधी यांनी दिलेल्या INDIA नावाचा निषेध करत बैठकीतून बाहेर पडले. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आता मुंबईत विरोधी ऐक्याच्या बैठकीला जाऊ नये. नितीश यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. अटलजींच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री असताना माझे त्यांच्याशी चांगले संबंध होते. नितीश यांना माझा एकच प्रश्न आहे की, जेव्हा त्यांना राजदसोबत जायचे होते तेव्हा ते आमच्यासोबत का आले होते? जे आमच्यात सामील होतात ते भ्रष्टाचार मागे सोडतात. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

'जे आमच्यासोबत येतात ते भ्रष्टाचाराला मागे सोडतात' : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले म्हणाले की, '70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे जे एनडीए आघाडीचे घटक नाहीत. जे आमच्यासोबत येतात ते भ्रष्टाचाराला मागे सोडतात'. रामदास आठवले म्हणाले की, 'आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कमी लोक उरले आहेत. ते नरेंद्र मोदींवर जेवढी टीका करतील, तेवढेच आम्ही मजबूत होऊ'. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी राजकीय स्थिती व्हावी, असे ते म्हणाले. एकप्रकारे आठवले यांनी नितीश कुमार यांना राजदची साथ सोडून एनडीएमध्ये सामील होण्यासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

नितीश कुमार नाराज आहेत? : 17 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, समन्वयक न बनवण्यावरून आणि INDIA नावावरून झालेल्या कथित वादामुळे नितीश कुमार, लालू यादव आणि तेजस्वी यादव पत्रकार परिषदेपूर्वीच निघून गेले होते. तेव्हापासून बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

हेही वाचा :

  1. Lalu Prasad Yadav : 'लढलो, लढणार आणि न घाबरता...', 75 वर्षीय लालूंचा बॅडमिंटन खेळतानाचा Video Viral
  2. Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..
  3. Nitish Kumar : नितीश कुमार नाराज? थेटच सांगितले....Watch Video
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.